शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

जीवन जगण्यासाठी मनाचाच आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 8:54 AM

माणसाने मनाचे मानस शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजूनपर्यंत करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींनी केला.

माणसाने मनाचे मानस शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजूनपर्यंत करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींनी केला. परंतु मनाचा मुख्य ठावठिकाणा कुणालातरी सापडला का, हा प्रश्न नेहमी आपल्या मनात घोळत राहतो. आपल्याला उगीचच मनाचे कंगोरे शोधण्याची सवय असते. आपल्या भाव-भावना, वासना, स्मृती, कल्पना, बुद्धी, जाणिवा यांच्याद्वारे आपण मनाचा विचार करतो. आपण एखाद्याच्या कृतीतून त्याच्या मनाची कल्पना करतो. त्याचे मन चांगले की वाईट, त्याच्या भावना काय असतील, त्याची आंतरिक शक्ती काय असेल, ही सर्व कल्पना मनावर आधारित असते. एखादी कृती जशी घडते तसा माणूस माणसाचे निरीक्षण करतो. ते निरीक्षण करण्यासाठी मनाचीच तर आवश्यकता असते. मनाची उजळणी आंतरिक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची असते.

एखाद्या व्यक्तीने मानसिक टेन्शन घेतले. तो सतत त्याच विचारात राहातो. तर आपण त्याला मनोरुग्ण असे म्हणतो. मनोरुग्ण म्हणजे त्याच्या मनात सतत त्याच गोष्टींचा विचार येतो. मनोवैज्ञानिकांनीसुद्धा मनोरुग्णाला समजून त्यावर उपाय सांगायची पद्धती अवलंबिली आहे. समजा, एखाद्याला भुतांनी झपाटले म्हणजे काय- तो सतत त्या भुतांनी झपाटल्याचीच कल्पना करतो. भूत हीच मुळात भयावह कल्पना वाटते. मनाच्या कल्पना अनेक आहेत. कोणत्याही गोष्टीचा प्रथमत: मनावर प्रभाव पडतो अन् मग ते मन त्यात गुंतत असते. कारण सर्वांच्या मनात भूत नावाची कल्पना घट्ट होऊन जाते. मग त्याच्या मानसिकतेत सतत त्याचाच विचार येतो. जीवन जगताना मनाचाच आधार घ्यावा लागतो. त्या मनाला तुम्ही काहीपण समजा पण ते आहे. त्यानुसारच ह्या सृष्टीचा खेळ चालला आहे. सृष्टीचे भवितव्य हे मनाशी किंवा दैवीमानवावरच अवलंबून आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक