शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

‘‘विनम्रता’’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 7:28 PM

मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी-चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्नीलला विचारले. ‘‘आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पहायची आहे का?’’ चॅप्लीनन उत्तर दिल कि त्याच घर खूपच लहान असून प्रार्थना करणार कोठे?

-दत्ता कोहिनकर

सकाळच्या रम्य प्रहरी केंद्रात फिरत असताना आचार्य सत्यनारायण गोएंकाजींचा एक दोहा कानावर पडला, 

जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्र‘ विनित। 

 जिस डाली को फल लगे-  झुकने कि ही रीत॥

मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी-चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्नीलला विचारले. ‘‘आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पहायची आहे का?’’ चॅप्लीनन उत्तर दिल कि त्याच घर खूपच लहान असून प्रार्थना करणार कोठे? गांधीजी म्हणाले तुम्ही सोफ्यावर बसा, आम्ही खाली बसून प्रार्थना करू. त्याचप्रमाणे त्यांनी केल सुद्धा. पुढे चॅप्लीनन लिहलय, गांधीजी व त्यांच्या साथीदारांना माझ्या पुढेच जमिनीवर बसण्याची लाज बिलकुल वाटली नाही पण मी मात्र त्यांच्यापुढे वर सोफ्यावर बसून खाली पाहताना खजिल झालो होतो. खरोखर मित्रांनो आयुष्यात महत्त्कार्य करताना विनम्र‘ता या गुणाचा विकास करावा लागतो. अहंकाराचा त्याग करावा लागतो. सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. मृत्यूपत्राच्या माध्यमातून सिकंदरने आपल्या सर्वांना एक संदेश दिला होता, ‘‘मी सिंकदर मी जग जिंकले पण खाली हाताने आलो होतो आणि खाली हातानेच परत चाललोय.’’ म्हणून कितीही पैसा, प्रतिष्ठा, सत्ता मिळवली तरी वृथा अभिमान बाळगु नका, नेहमी नम्र रहा. 

‘‘म्हणतात ना महापुरे झाडे जाती-तेथे लव्हाळे वाचती’’ महापुराच्या विरोधात उभे राहणारे वृक्ष उन्मळून पडतात. याउलट नदीपत्रातील लव्हाळ्याची पाती सकाळच्या वेळी सुर्यकिरणांनी न्हाऊन निघतात. विनयशीलतेचे महिमान सांगताना बसवेश्‍वर विचरतात. गाय आपल्या पाठीवर बसणार्‍यांना कधी दूध देईल का? ज्याला दुध हवे त्याने गाईच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे.

बहिणाबाई चौधरीच्या काही स्फुट ओव्या आहेत. एका ओवीत बाभळीचे पान केळीच्या पानाशी बोलते. 

फाट आता टराटरा-नाही दया तुफानाला ।

हाले बाभळीचे पान - बोले केळीच्या पानाला ॥

बाभळीचे पान तसे अगदी लहान, केळीचे पान तुलनेने महान सोसायट्याच्या वाराला केळीचे पान अडवू पाहते व आपला उर फोडून घेते. बाभळीचे पान वार्‍याला कौतुकाने कुरवाळते त्यामुळे वारा त्या लहानग्याला खांद्यावर घेऊन नाचतो. संत तुकाराम महाराज पण म्हणतात ना - लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा । 

हे लहानपण म्हणजे आपले अवमुल्यन नव्हे - तर हे असते सभ्यतेचे सार. सभ्यतेमुळे माणूस संयमी व शांत होतो तो नम्र‘ होतो. विद्या विनयेत शोभते. खरोखर निसर्गाला नम‘तेचे आसन आवडते. नम्र‘ माणसाच्या मागे सगळ्या शुभशक्ती उभ्या राहतात. परंतु आधुनिक युगात बर्‍याचदा सद्गुणी माणसाला लोक त्रास देतात. त्यावेळी सद्गुणांची विकृती न होता तुम्हाला जशाच तसे उत्तर देता आले पाहिजे. मेणाहून मऊ असणारे विष्णुदास प्रसंगी वज्राहून कठोर होत असतात असे तुकाराम महाराजाच्या अभंगात वाचावयास मिळते. त्यामुळे वेळप्रसंगी वज्रासारखे कठोरपण व्हा पण अंर्तमनात प्रचंड मंगलमैत्री असू द्या व विनम्रता म्हणजे लाचारी किंवा दुर्बलता नसून निष्कपट, निष्कलंक, निरागस‘ही सरलता, मनाची शुद्धता आहे ही विनम्रता आचरणात आणण्यासाठी मनाला ध्यानाची जोड द्या.

दहा दिवसाचे विपश्यना ध्यान शिबिर करा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक