शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

भाव तेथे देव! ईश्वरप्राप्ती हेच मानवी जीवनाचे ध्येय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 12:35 IST

एखाद्या चांगल्या मित्राबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपल्याला चांगली माहिती झाली, त्याच्याबद्दलचे चांगले गुण व स्वभाव समजला तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक प्रकारचा आदरभाव निर्माण होतो.

एखाद्या चांगल्या मित्राबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपल्याला चांगली माहिती झाली, त्याच्याबद्दलचे चांगले गुण व स्वभाव समजला तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक प्रकारचा आदरभाव निर्माण होतो. म्हणजे त्याचा पूर्ण परिचय झाल्यावर आपण त्याच्याशी कसे वागतो त्यावरून त्याच्या प्रामाणिकपणाची भावना आपल्या लक्षात येते. त्या व्यक्तीच्या मनाचा भाव पाहता येतो. थोडक्यात नवीन भाव असा निर्माण होतो. व्यक्ती-व्यक्तींच्या मनात याचे उदाहरण पाहता येईल. कारण मनाच्या स्वभावानुसार भाव बदल राहातो. भाव हा मुळातच स्वभावत: बुद्धीचा असतो. आपल्या घरात अनेक व्यक्ती आहेत. तरीपण एकमेकांबद्दलचा उपजत भाव असतो. पहिल्या ज्या उपजत भावाने ज्या अपेक्षा मनात उत्पन्न झाल्या असतील, त्याप्रमाणे भाव टिकतो.

‘भाव तेथे देव’ म्हणजे अनन्यभाव असल्याशिवाय आपल्या कर्तृत्वाचा सुगंध दरवळत नाही. साधकावस्था असताना भक्तांचा पण एकनिष्ठ भाव असतो. तो सर्वस्व एका परमेश्वरावर भाव ठेवून तोच माझा पाठीराखा आहे, तो सुखाचे सार आहे, त्यालाच आमचे सुख-दु:ख सांगू, ही भावना त्यांच्या मनात असते. व्यावहारिक माणसाप्रमाणे साधकाचा भाव बदलत नाही. व्यवहारामध्ये पती-पत्नीचे पहिले प्रेम पुढे ओसरते किंवा वाढते तसे साधकाचे नसते. त्याच्याकडे विश्वासाची परिणती असते. साधकाकडे प्रेम, कृतज्ञता, पूज्यभाव, शरणागती असते. साधकाचा भाव हळूहळू स्थिर होतो. जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत धीर धरणे हे त्याच्या दृढतेवर अवलंबून असते. साधक देहादी प्रपंचात सापडत नाही. म्हणून मनाला वारंवार जागृती देऊन भाव दृढ व स्थिर ठेवतो. व्यावहारिक माणसाचा भाव कमी-अधिक होत राहतो. प्रत्येकाने चिंतामुक्त, दु:खमुक्त व्हायचे असले तर स्थिर भाव ठेवावा. साधकावस्थेत जीवन जगावे. हेच साधन मोक्ष किंवा ईश्वरप्राप्तीचे होय. ईश्वरप्राप्ती हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे याची जाणीव ठेवली पाहिजे.

प्रपंच व परमार्थ या दोन्ही ठिकाणी देवच सहकारी आहे. हा साधकाचा दृढ विश्वास असतो. म्हणून संतांनी म्हटले आहे, ‘‘आमुची विश्रांती। तुमचे चरण कमळापती । हेचि एक जाणे । काया वाचा आणि मने’’ ही भावावस्था साधकाची असते. त्यातच त्यांचे सुख सामावलेले असते. निर्भयता, सुख, स्थैर्य, विश्राम हे देवापासूनच मिळतात, हा विश्वास त्यांच्या मनात दृढ असतो. तेच ते जपतात. त्यातूनच त्यांना समाधान मिळते. साधकाची भावावस्था स्थिर असते. तोच त्यांचा एकनिष्ठ भाव असतो.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक