शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

नरकाचे दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 05:01 IST

आयुष्य काशीत व्यतित करणारे कबीर आयुष्याच्या सायंकाळी मगहरला गेले आणि येथे मृत्यू आल्यानंतर नरकाची प्राप्ती कशी होते, याचा मला अनुभव घ्यायचा आहे, अशी गर्जनाच कबीरांनी केली.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेपायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत ज्यांचा आत-बाहेर परंपरेविषयी विद्रोह ठासून भरलेला होता. जे वेशधारी संतांना आपल्या शब्दांच्या काठीने सडकून काढत होते आणि सत्यशोधनाचा खरा राजमार्ग जनता जनार्दनासमोर मांडत होते, ते संत कबीर यांच्या जन्माला येण्यात, काही काळ इथे राहण्यात आणि आयुष्याचा निरोप घेण्यातही बंडखोरीचा पीळ होता. कबीरांचा ज्या काशी क्षेत्रासी जन्मजात ऋणानुबंध होता त्या काशी क्षेत्राच्या बाबतीत हजारो लोकांची अशी अंधश्रद्धा होती की येथे ज्याचा मृत्यू होतो त्याला स्वर्गप्राप्ती होते आणि येथून अगदी पाच-सहा मैलांवरच्या मगहरमध्ये ज्याचा मृत्यू होतो तो नरकाला जातो. आयुष्य काशीत व्यतित करणारे कबीर आयुष्याच्या सायंकाळी मगहरला गेले आणि येथे मृत्यू आल्यानंतर नरकाची प्राप्ती कशी होते, याचा मला अनुभव घ्यायचा आहे, अशी गर्जनाच कबीरांनी केली. मगहरमध्ये कबीरांचे देहावसान झाल्यानंतर म्हणे त्यांच्या पार्थिवाची फुले झाली आणि जिवंतपणी जो कबीर आमचा नाही, असे म्हणणाऱ्या हिंंदू व मुस्लिमांनी ती वाटून घेतली आणि आपआपल्या धर्माप्रमाणे विधी केले? कबीर स्वर्गाला गेले की नरकाला याबाबतीत वाद सुरू राहतील; पण साºया भारतवर्षास विचारांची फुले देणाºया कबीराने स्वर्ग आणि नरकाचे अस्तित्वच नाकारले होते. ईश्वरी शक्ती एक अक्षय पुरुष आहे बाकी सारे स्वर्ग-नरकांच्या काल्पनिक येरझाºया मारणारे आहेत, असा निर्वाणीचा इशारा देताना कबीर म्हणतात,अक्षय पुरुष एक पेड हैंनिरंजन बाकी यारत्रिदेवा शाखा भयें, पात भया संसार ॥संसाराच्या रहाटगाडग्यात पुण्याची पाऊटी सरल्यानंतर देवाधिदेवसुद्धा स्वर्ग आणि पृथ्वीच्या येरझाºया मारतात आणि आमच्यासमोर मात्र नरकाचे भयावह चित्र निर्माण करतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक