शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
3
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
4
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
5
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
6
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
7
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
8
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
9
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
10
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
11
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
12
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
13
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
14
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
15
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
16
‘गोल्डन गर्ल’चं नवं टार्गेट सेट, बिहारच्या राजकारणातील तरुण चेहऱ्याने वेधलं लक्ष, कोण आहे ती?
17
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
Daily Top 2Weekly Top 5

॥ श्रीतुकाराम महाराज गाथाभाष्य॥

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 17:50 IST

एखाद्या वैद्याने कडुनिंबाचा रस पिण्यास दिला आणि तो जर रोग्याने पोटावर सारवला तर त्याचा उपयोग होणार नाही.पोटातील दु:ख वाढतच राहील

माकडें मुठीसी धरिले फुटाणे ।गुंतले ते नेणें हात तेथें ।।१।।

काय तो तयाचा लेखावा अन्याय ।हित नेणें काय आपुलें तें ।।२।।

शुकें नळिकेशीं गोवियेले पाय ।विसरोनि जाय पक्ष दोन्ही ।।३।।

तुका म्हणे एक ऐसे पशु जीव ।न चले उपाव कांहीं तेथें ।।४।।

अर्थ: एका माणसाने माकडाला पकडण्याकरिता युक्ती केली.एका निमुळत्या तोंडाच्या घागरीत फुटाणे ठेवले.सहजच एक माकड फुटाण्याच्या लोभाने तेथे आले व त्याने घागरीत हात घालून मुठीत फुटाणे धरले.पण ( फुटाणे धरल्याने मूठ फुगली आहे त्यामुळे ) हात घागरीत अडकला आहे हे त्यास कळले नाही.।।१।।यात माकडाचा तरी काय अपराध मानावा? कारण,आपले हित कशात आहे ते त्यास कळले नाही.।।२।।

एका पारध्याने पोपटाला पकडण्याकरिता एका मोठ्या नळीत दोर ओवून त्याची दोन टोके दोन झाडांना बांधली व त्या नळीवर पेरू इत्यादी खाद्य पदार्थ ठेवले. पोपट ते खाण्याच्या आशेने नळीवर बसताच,त्याच्या अंगाच्या वजनाने ती नळी एकदम फिरली.त्यामुळे त्याचे वर पाय खाली पंख असे झाले.त्यामुळे आपण जमिनीवर पडून मरू अशा कल्पनेने तो पोपट स्वत:चे पाय त्या नळिकेला अधिकच आवळून धरू लागला व आकाशात उडून जाण्यास दोन्ही पंख समर्थ असूनही भ्रमाने तो ते विसरून गेला.।।३।।*ज्ञानीअमरेंद्र श्रीतुकाराममहाराज* म्हणतात,जगात अशी काही पशूसारखी (मूर्ख) माणसे आहेत की,तेथे उपदेशाचा उपायच चालत नाही.

बोलिलों तें कांही तुमचिया हिता ।वचन नेणतां क्षमा कीजे ।।१।।

वाट दावी तया न लगे रुसावें ।अतित्याई जीवें नाश पावे ।।२।।

निंब दिला रोग तुटाया अंतरीं ।पोंभाळिता वरी आंत चरे ।।३।।

तुका म्हणे हित देखण्यासी कळे ? ।पडती आंधळे कृपामाजीं ।।४।।

अर्थ:-* मी जो काही उपदेश केला आहे तो तुमच्या कल्याणासाठी होय. माझ़्या बोलण्यातील अभिप्राय न समजल्यामुळे तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही मला क्षमा करा.।।१।।

जो मनुष्य सन्मार्ग दाखवितो त्याच्यावर रागावू नये.कारण दुराग्रही मनुष्य दुराग्रहामुळे वाईट माझ्या जाईल तर त्याच्या जीवाचाही नाश होतो.।।२।।

पोटातील रोग नाहीसा होण्याकरिता,एखाद्या वैद्याने कडुनिंबाचा रस पिण्यास दिला आणि तो जर रोग्याने पोटावर सारवला तर त्याचा उपयोग होणार नाही.पोटातील दु:ख वाढतच राहील.।।३।।

*लोकतारक श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, 'आपले हित कशात आहे' हे विचारदृष्टीच्या माणसाला कळते.पण जे विचारांध आहेत ते दु:खाच्या खड्ड्यात पडतात.।।४।।

- हभप चैतन्य कबीरबुवा - 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAdhyatmikआध्यात्मिक