शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

॥ श्रीतुकाराम महाराज गाथाभाष्य॥

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 17:50 IST

एखाद्या वैद्याने कडुनिंबाचा रस पिण्यास दिला आणि तो जर रोग्याने पोटावर सारवला तर त्याचा उपयोग होणार नाही.पोटातील दु:ख वाढतच राहील

माकडें मुठीसी धरिले फुटाणे ।गुंतले ते नेणें हात तेथें ।।१।।

काय तो तयाचा लेखावा अन्याय ।हित नेणें काय आपुलें तें ।।२।।

शुकें नळिकेशीं गोवियेले पाय ।विसरोनि जाय पक्ष दोन्ही ।।३।।

तुका म्हणे एक ऐसे पशु जीव ।न चले उपाव कांहीं तेथें ।।४।।

अर्थ: एका माणसाने माकडाला पकडण्याकरिता युक्ती केली.एका निमुळत्या तोंडाच्या घागरीत फुटाणे ठेवले.सहजच एक माकड फुटाण्याच्या लोभाने तेथे आले व त्याने घागरीत हात घालून मुठीत फुटाणे धरले.पण ( फुटाणे धरल्याने मूठ फुगली आहे त्यामुळे ) हात घागरीत अडकला आहे हे त्यास कळले नाही.।।१।।यात माकडाचा तरी काय अपराध मानावा? कारण,आपले हित कशात आहे ते त्यास कळले नाही.।।२।।

एका पारध्याने पोपटाला पकडण्याकरिता एका मोठ्या नळीत दोर ओवून त्याची दोन टोके दोन झाडांना बांधली व त्या नळीवर पेरू इत्यादी खाद्य पदार्थ ठेवले. पोपट ते खाण्याच्या आशेने नळीवर बसताच,त्याच्या अंगाच्या वजनाने ती नळी एकदम फिरली.त्यामुळे त्याचे वर पाय खाली पंख असे झाले.त्यामुळे आपण जमिनीवर पडून मरू अशा कल्पनेने तो पोपट स्वत:चे पाय त्या नळिकेला अधिकच आवळून धरू लागला व आकाशात उडून जाण्यास दोन्ही पंख समर्थ असूनही भ्रमाने तो ते विसरून गेला.।।३।।*ज्ञानीअमरेंद्र श्रीतुकाराममहाराज* म्हणतात,जगात अशी काही पशूसारखी (मूर्ख) माणसे आहेत की,तेथे उपदेशाचा उपायच चालत नाही.

बोलिलों तें कांही तुमचिया हिता ।वचन नेणतां क्षमा कीजे ।।१।।

वाट दावी तया न लगे रुसावें ।अतित्याई जीवें नाश पावे ।।२।।

निंब दिला रोग तुटाया अंतरीं ।पोंभाळिता वरी आंत चरे ।।३।।

तुका म्हणे हित देखण्यासी कळे ? ।पडती आंधळे कृपामाजीं ।।४।।

अर्थ:-* मी जो काही उपदेश केला आहे तो तुमच्या कल्याणासाठी होय. माझ़्या बोलण्यातील अभिप्राय न समजल्यामुळे तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही मला क्षमा करा.।।१।।

जो मनुष्य सन्मार्ग दाखवितो त्याच्यावर रागावू नये.कारण दुराग्रही मनुष्य दुराग्रहामुळे वाईट माझ्या जाईल तर त्याच्या जीवाचाही नाश होतो.।।२।।

पोटातील रोग नाहीसा होण्याकरिता,एखाद्या वैद्याने कडुनिंबाचा रस पिण्यास दिला आणि तो जर रोग्याने पोटावर सारवला तर त्याचा उपयोग होणार नाही.पोटातील दु:ख वाढतच राहील.।।३।।

*लोकतारक श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, 'आपले हित कशात आहे' हे विचारदृष्टीच्या माणसाला कळते.पण जे विचारांध आहेत ते दु:खाच्या खड्ड्यात पडतात.।।४।।

- हभप चैतन्य कबीरबुवा - 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAdhyatmikआध्यात्मिक