शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

॥ श्रीतुकाराम महाराज गाथाभाष्य॥

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 17:50 IST

एखाद्या वैद्याने कडुनिंबाचा रस पिण्यास दिला आणि तो जर रोग्याने पोटावर सारवला तर त्याचा उपयोग होणार नाही.पोटातील दु:ख वाढतच राहील

माकडें मुठीसी धरिले फुटाणे ।गुंतले ते नेणें हात तेथें ।।१।।

काय तो तयाचा लेखावा अन्याय ।हित नेणें काय आपुलें तें ।।२।।

शुकें नळिकेशीं गोवियेले पाय ।विसरोनि जाय पक्ष दोन्ही ।।३।।

तुका म्हणे एक ऐसे पशु जीव ।न चले उपाव कांहीं तेथें ।।४।।

अर्थ: एका माणसाने माकडाला पकडण्याकरिता युक्ती केली.एका निमुळत्या तोंडाच्या घागरीत फुटाणे ठेवले.सहजच एक माकड फुटाण्याच्या लोभाने तेथे आले व त्याने घागरीत हात घालून मुठीत फुटाणे धरले.पण ( फुटाणे धरल्याने मूठ फुगली आहे त्यामुळे ) हात घागरीत अडकला आहे हे त्यास कळले नाही.।।१।।यात माकडाचा तरी काय अपराध मानावा? कारण,आपले हित कशात आहे ते त्यास कळले नाही.।।२।।

एका पारध्याने पोपटाला पकडण्याकरिता एका मोठ्या नळीत दोर ओवून त्याची दोन टोके दोन झाडांना बांधली व त्या नळीवर पेरू इत्यादी खाद्य पदार्थ ठेवले. पोपट ते खाण्याच्या आशेने नळीवर बसताच,त्याच्या अंगाच्या वजनाने ती नळी एकदम फिरली.त्यामुळे त्याचे वर पाय खाली पंख असे झाले.त्यामुळे आपण जमिनीवर पडून मरू अशा कल्पनेने तो पोपट स्वत:चे पाय त्या नळिकेला अधिकच आवळून धरू लागला व आकाशात उडून जाण्यास दोन्ही पंख समर्थ असूनही भ्रमाने तो ते विसरून गेला.।।३।।*ज्ञानीअमरेंद्र श्रीतुकाराममहाराज* म्हणतात,जगात अशी काही पशूसारखी (मूर्ख) माणसे आहेत की,तेथे उपदेशाचा उपायच चालत नाही.

बोलिलों तें कांही तुमचिया हिता ।वचन नेणतां क्षमा कीजे ।।१।।

वाट दावी तया न लगे रुसावें ।अतित्याई जीवें नाश पावे ।।२।।

निंब दिला रोग तुटाया अंतरीं ।पोंभाळिता वरी आंत चरे ।।३।।

तुका म्हणे हित देखण्यासी कळे ? ।पडती आंधळे कृपामाजीं ।।४।।

अर्थ:-* मी जो काही उपदेश केला आहे तो तुमच्या कल्याणासाठी होय. माझ़्या बोलण्यातील अभिप्राय न समजल्यामुळे तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही मला क्षमा करा.।।१।।

जो मनुष्य सन्मार्ग दाखवितो त्याच्यावर रागावू नये.कारण दुराग्रही मनुष्य दुराग्रहामुळे वाईट माझ्या जाईल तर त्याच्या जीवाचाही नाश होतो.।।२।।

पोटातील रोग नाहीसा होण्याकरिता,एखाद्या वैद्याने कडुनिंबाचा रस पिण्यास दिला आणि तो जर रोग्याने पोटावर सारवला तर त्याचा उपयोग होणार नाही.पोटातील दु:ख वाढतच राहील.।।३।।

*लोकतारक श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, 'आपले हित कशात आहे' हे विचारदृष्टीच्या माणसाला कळते.पण जे विचारांध आहेत ते दु:खाच्या खड्ड्यात पडतात.।।४।।

- हभप चैतन्य कबीरबुवा - 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAdhyatmikआध्यात्मिक