शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

अत्त दीप भव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 18:57 IST

- धर्मराज हल्लाळे महात्मा गौतम बुद्ध यांनी मानवाला स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिला आहे. अत्त दीप भव... अर्थात स्वत: स्वयंप्रकाशित बना. ...

- धर्मराज हल्लाळे

महात्मा गौतम बुद्ध यांनी मानवाला स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिला आहे. अत्त दीप भव... अर्थात स्वत: स्वयंप्रकाशित बना. आई-वडील आपल्या अपत्याला सांगतात, आम्ही तुला आयुष्यभर साथ देणार आहोत. आमचे आयुष्य संपले की आम्ही निघून जाऊ, पुढचे आयुष्य तुलाच जगायचे आहे. त्यामागे भावना असते ती आपल्या मुलाने अथवा मुलीने स्वत:च्या जीवनाचा मार्ग स्वत: निवडावा आणि तो स्वत: समृद्घ करावा. आई-वडील नक्कीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. परंतु, त्यांची सावली मुलांसाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत नाही. हे जीवनमूल्य महात्मा गौतम बुद्घांनी जगाला दिले आहे. तुम्ही इतरांकडे पाहू नका. कोणीतरी मदत करेल या भावनेने विसंबून राहू नका. स्वत:चे आयुष्य घडविण्यासाठी सज्ज व्हा. मानवकल्याणाची दृष्टी सदोदित ठेवा. अर्थात, गौतम बुद्घांनी सम्यक दृष्टी सांगितली आहे. प्रत्येकाला दु:खापासून मुक्ती हवी असते. आपण सदैव सुखाचा शोध घेत असतो. त्यासाठी एखादे छत्र आपल्याला हवे असते. आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक यांचे जीवनात नक्कीच मोल आहे. मात्र, एका विशिष्ट वेळेनंतर स्वत:चे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: पुढे आले पाहिजे. ध्येय ठरवून आयुष्य जगा. मात्र, आपले ध्येय हे उदात्त असावे. म्हणजेच सम्यक संकल्प अभिप्रेत आहे. आपले बोलणे सत्य आणि योग्य असले पाहिजे, हे सांगताना गौतम बुद्घांनी सम्यक वाणी सांगितली आहे. कर्मसिद्घांत तर प्रत्येक धर्मात सांगितला आहे. गौतम बुद्घांनीही सम्यक कर्म अर्थात जीवनमूल्यांशी निगडित सद्मार्गावरील आचरणाची अपेक्षा केली आहे. जे काही आपण मिळवतो, तेही योग्य मार्गाने मिळविले पाहिजे. संत तुकाराम म्हणतात, जोडूनिया धन, उत्तम व्यवहारे...अगदी तोच विचार बुद्घ काळापासून सांगितला जात आहे. आपली उपजीविकासुद्घा सम्यक म्हणजेच चांगल्या मार्गाने असली पाहिजे. त्याचप्रमाणे सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी सांगितली आहे. ज्याद्वारे आचरणातील दोष निघून जातील. माणूस परिपूर्ण होईल. सुख-दु:खाच्या फेऱ्यात न अडकता आनंदी जीवन जगू शकेल. अर्थात अत्त दीप भव... हे जीवनाचे मर्म असून, महात्मा गौतम बुद्ध यांनी सांगितल्याप्रमाणे आपण  स्वयंप्रकाशित होऊन स्वत:च्या जीवनातील अंधकार दूर करावाच; त्याचबरोबर समाजालाही प्रकाशमान करावे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक