शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

अत्त दीप भव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 18:57 IST

- धर्मराज हल्लाळे महात्मा गौतम बुद्ध यांनी मानवाला स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिला आहे. अत्त दीप भव... अर्थात स्वत: स्वयंप्रकाशित बना. ...

- धर्मराज हल्लाळे

महात्मा गौतम बुद्ध यांनी मानवाला स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिला आहे. अत्त दीप भव... अर्थात स्वत: स्वयंप्रकाशित बना. आई-वडील आपल्या अपत्याला सांगतात, आम्ही तुला आयुष्यभर साथ देणार आहोत. आमचे आयुष्य संपले की आम्ही निघून जाऊ, पुढचे आयुष्य तुलाच जगायचे आहे. त्यामागे भावना असते ती आपल्या मुलाने अथवा मुलीने स्वत:च्या जीवनाचा मार्ग स्वत: निवडावा आणि तो स्वत: समृद्घ करावा. आई-वडील नक्कीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. परंतु, त्यांची सावली मुलांसाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत नाही. हे जीवनमूल्य महात्मा गौतम बुद्घांनी जगाला दिले आहे. तुम्ही इतरांकडे पाहू नका. कोणीतरी मदत करेल या भावनेने विसंबून राहू नका. स्वत:चे आयुष्य घडविण्यासाठी सज्ज व्हा. मानवकल्याणाची दृष्टी सदोदित ठेवा. अर्थात, गौतम बुद्घांनी सम्यक दृष्टी सांगितली आहे. प्रत्येकाला दु:खापासून मुक्ती हवी असते. आपण सदैव सुखाचा शोध घेत असतो. त्यासाठी एखादे छत्र आपल्याला हवे असते. आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक यांचे जीवनात नक्कीच मोल आहे. मात्र, एका विशिष्ट वेळेनंतर स्वत:चे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: पुढे आले पाहिजे. ध्येय ठरवून आयुष्य जगा. मात्र, आपले ध्येय हे उदात्त असावे. म्हणजेच सम्यक संकल्प अभिप्रेत आहे. आपले बोलणे सत्य आणि योग्य असले पाहिजे, हे सांगताना गौतम बुद्घांनी सम्यक वाणी सांगितली आहे. कर्मसिद्घांत तर प्रत्येक धर्मात सांगितला आहे. गौतम बुद्घांनीही सम्यक कर्म अर्थात जीवनमूल्यांशी निगडित सद्मार्गावरील आचरणाची अपेक्षा केली आहे. जे काही आपण मिळवतो, तेही योग्य मार्गाने मिळविले पाहिजे. संत तुकाराम म्हणतात, जोडूनिया धन, उत्तम व्यवहारे...अगदी तोच विचार बुद्घ काळापासून सांगितला जात आहे. आपली उपजीविकासुद्घा सम्यक म्हणजेच चांगल्या मार्गाने असली पाहिजे. त्याचप्रमाणे सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी सांगितली आहे. ज्याद्वारे आचरणातील दोष निघून जातील. माणूस परिपूर्ण होईल. सुख-दु:खाच्या फेऱ्यात न अडकता आनंदी जीवन जगू शकेल. अर्थात अत्त दीप भव... हे जीवनाचे मर्म असून, महात्मा गौतम बुद्ध यांनी सांगितल्याप्रमाणे आपण  स्वयंप्रकाशित होऊन स्वत:च्या जीवनातील अंधकार दूर करावाच; त्याचबरोबर समाजालाही प्रकाशमान करावे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक