शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
2
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
3
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
4
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
5
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
6
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
7
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
8
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
9
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
10
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
11
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
12
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
13
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
14
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
15
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
17
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
18
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
19
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
20
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश

अखंड आनंदाचं रहस्य... विसरून जाल दुःख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 16:52 IST

सच्चा वारकरी विठोबा रखमाईचं किंवा ग्यानबा तुकारामचं नाम घेत पंढरीच्या वाटेवर ‘आनंदात’ चाललेला असतो. तो आनंदात असतो कारण त्याला कुठंही पोचायचं नसतं.

>> रमेश सप्रे

‘आनंदायन’ या दोन शब्दात आहेत ‘आनंद’ आणि ‘अयन’, अयन शब्दाचा एक अर्थ आहे प्रवास. आपण दक्षिणायन, उत्तरायण, रामायण असे शब्द वापरतो तेव्हा हा ‘प्रवास’ अर्थच बरोबर असतो. रामाचा अयोध्येपासून लंकेपर्यंतचा वनवासातील प्रवास ते रामायण.

‘अयन’ शब्दाचा दुसरा अर्थ आहे निवास म्हणजे वसतीस्थान. जेव्हा आपण नारायण हा शब्द उच्चारतो तेव्हा हा ‘निवास’ अर्थच बरोबर असतो. ‘नार’ हे नर या शब्दाचं अनेकवचन आहे. म्हणून ‘नार’ याचा अर्थ झाला नरांचा समुदाय म्हणजेच मानवजात. सारे मानव हे ज्याचं वसतीस्थान (अयन) आहेत तो नारायण. गंमत म्हणून पाहूया ‘नार’ या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ‘पाणी’ म्हणजे पाणी हे ज्याचं निवासस्थान आहे तो नारायण. सागराच्या तळाशी शेषशय्येवर आरामात पहुडलेला (शांताकांर भुजगशयन) असा भगवान विष्णू-नारायण हा असा नार (पाणी) हेच अयन (निवासस्थान) असलेला भगवंत आहे असो.

आनंदायन म्हणजे आनंदाचा आनंददायी केलेला प्रवास नाही. कारण सर्वत्र गच्च भरून, ओसंडून वाहणारा आनंद जो मिळवण्यासाठी कोठेही जावे वा यावे लागत नाही. जिथं, जेव्हा जी कृती करताना, ज्या व्यक्ती वा वस्तूच्या सहवासात आपण असता त्यावेळी आपण सदैव आनंद अनुभवू शकतो.

इथं एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. सच्चा वारकरी विठोबा रखमाईचं किंवा ग्यानबा तुकारामचं नाम घेत पंढरीच्या वाटेवर ‘आनंदात’ चाललेला असतो. तो आनंदात असतो कारण त्याला कुठंही पोचायचं नसतं. पावलापावलाला प्रत्येक श्वासावर जे नाम चालू असतं तोच त्याचा विठ्ठल असतो नि तेच त्याचं पंढरपूर असतं. म्हणूनच प्रपंचातले सारे प्रश्न, सगळ्या अडचणी आहेत तशाच असल्या तरी तो मुक्तीचा आनंदसोहळा उपभोगत असतो. फार मोलाची गोष्ट आहे ही.

एकदा गोंदवल्याला पू. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या उपस्थितीत सत्संग चालू असतो. एकाएकी श्री महाराज सर्वांना उद्देशून प्रश्न विचारतात. ‘मला सांगा, तुमच्यात पूर्ण सुखी किंवा सर्व सुखी कोण आहे?’ अपेक्षेप्रमाणे कुणीही हात वर केला नाही. यावर श्री महाराजांनी एका साधकाला विचारलं, ‘तुमच्या दु:खाचं काय कारण आहे?’ तो उद्गारला, ‘नोकरी नाही, महाराज.’ हळहळून श्री महाराज म्हणाले, ‘नोकरी नाही म्हणजे दु:खच की हो! दुसऱ्याला विचारलं, ‘तुमच्या दु:खाचं कारण काय? नोकरी आहे ना तुम्हाला’ ‘हो, आहे की! पण मालक (बॉस किंवा साहेब) चांगले नाहीत’ यावर असून श्री महाराज म्हणाले, ‘यांना नोकरी नाही म्हणून हे दु:खी; पण हे नोकरी असूनही दु:खी. याचा अर्थ नोकरी हे सुख-दु:खाचं कारण नाही. याच प्रमाणे श्री महाराजांनी दु:खाचं कारण विचारल्यावर अनेकांनी लग्न जमत नाही. लग्न होऊनही मूल नाही, घरात मुलच मुलं (लेकुरे उदंड झाली) ...अशी ना ना प्रकारची कारणं सांगितले. ती शांतपणे ऐकून श्री महाराजांनी एक सिद्धांत सांगितला.

‘सुख-दु:ख नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. आपणच सुख-दु:खाला जन्माला घालतो नि मग स्वत: सुखी किंवा दु:खी होतो’ यातही प्रमाण असतं.

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे.’

आनंदाचे मात्र असं नसतं. काहीही असलं ती नि काहीही नसलं तरी माणूस अखंड आनंदात राहू शकतो. भागवतातील प्रसिद्ध यदू राजा नि अवधूत दत्तात्रेय यांच्यातील संवादाचा आरंभ असाच होतो. यदू राजा-- राज्य, सामर्थ्य, वैभव सारं असूनही आप्त प्रज नि सेवक, मंत्री त्यांच्याशी एकनिष्ठ असूनही तो कायम दु:खी, बेचैन असतो. याउलट अंगावर वस्त्र नसलेले, हातात भिक्षापात्र नि काखेला झोळीही नसलेले अवधूत मात्र अत्यंत आनंदात असतात. करतल भोजन नि तरुतल शयन असं असूनही परमशांत, तृप्त, समाधानी असतात. त्याचं ‘अवधूत’ नावच या आनंदात रहस्य उलगडत असतं. ‘अव’ म्हणजे अखंड वर्तमान अन् यासाठी भूतकाळातही स्मृती नि भविष्यकाळातही चिंता सतत धूत राहायला हवं. ही अखंड वर्तमानकाळातच असलेली मनाबुद्धीची ‘धूत (सतत धुवत राहत असलेली)’ अवस्था हेच अखंड आनंदाचं रहस्य आहे. खरं ‘आनंदायन’ आनंदाचं निवासस्थान आहे. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक