शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मनाच्या एकाग्रतेमधूनच शोधाचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 06:29 IST

आपल्या सर्जनशीलतेला अथवा संशोधकवृत्तीला मारक ठरतील अशा गोष्टींपासून ते आपले मन दूर ठेवतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजएखादा शोध लागणे, त्याची योग्यता तपासणीसाठी चाचणी घेणे, हे खरे म्हणजे अनोळखी वाटेवरून चालण्यासारखे असते. प्रयोगशाळेत त्याचे मन लागते की नाही, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कोणताही शास्त्रज्ञ एखादा शोध लावतो, तेव्हा त्याचे मन त्या उपक्रमाशी एकरूप झालेले असते. रात्रंदिवस त्याच्या मनात तोच प्रयोग सुरू असतो. आपले संशोधन नवीन आणि सर्वाेत्तम कसे असेल, याच ध्येयाने तो झपाटलेला असतो. त्यामुळेच जगामध्ये उत्तम शास्त्रज्ञ तयार झाले आहेत. शास्त्रज्ञ हा स्वत:च्या संशोधनात मनापासून रममाण होतो. त्यामुळे त्याची झोप कमी होते. त्याचे संपूर्ण लक्ष आपल्या संशोधन प्रक्रियेकडे लागलेले असते. ठरावीक गोष्टी सोडल्या तर त्याचे मन त्यातच रममाण असते. आपल्या कामात त्याने स्वत:ला गुंतवून घेतलेले असते. नवीन नवीन संशोधन करून देशाच्या हितासाठी त्याचा उपयोग व्हावा हीच त्याची अपेक्षा असते. तीच त्याची देशसेवा असते. शास्त्रज्ञ हे संधीचे आणि वेळीचे सोने करतात. नियोजन आणि चिकाटी हे त्यांचे अंगभूत गुण असतात. त्यांचे मन हव्या असलेल्या माहितीचे संदर्भ शोधण्यात पटाईत असते. आपल्या सर्जनशीलतेला अथवा संशोधकवृत्तीला मारक ठरतील अशा गोष्टींपासून ते आपले मन दूर ठेवतात. कारण संशोधनाचा मोठा प्रभाव संपूर्ण जगावर तसेच कित्येक पिढ्यांवर पडणार असल्याची जाणीव त्यांना असते. त्यामुळेच आपल्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तो सतत मग्न असतो. वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्याच्या मनामध्ये उत्सुकतेचे वातावरण तयार होते. सगळेच शास्त्रज्ञ विशिष्ट रीतीने प्रयोग करीत असतात. प्रयोग करताना त्यांना वेळेचीसुद्धा मर्यादा राहात नाही. त्यांच्या वेळेनुसार ते अधिक काम करतात. ते नेहमी वेगाने काम करतात. आपल्या निर्मितीवर ते नेहमीच पूर्णपणे लक्ष ठेवून असतात. जगाला काय हवे आहे, याचा ते अंदाज घेत असतात. त्यामुळेच जगात नवे शोध लागत असतात.

विविध शोधांमुळे क्रांतिकारी बदल घडत आहे, याचे कारण शास्त्रज्ञांची जिज्ञासा, प्रयोगशीलता, चिकाटी हे गुण महत्त्वाचे असतात. संशोधन करून एखादा शोध लागला की, तो शास्त्रज्ञ लोकप्रिय होतो. त्याचे जगभर कौतुक होते. कोणताही शास्त्रज्ञ कशावरून तरी प्रेरणा घेत असतो. त्यानुसार आपल्या कृतीमध्ये बदल करीत असतो. शास्त्रज्ञ अपयशाला कंटाळत नाहीत, आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करणे सोडत नाहीत. त्यामुळे वेगवेगळी कौशल्ये असलेला कुशल संशोधकांचा एक गट तयार होतो. त्यामुळे इतरांना प्रेरणा व नवीन दिशा मिळते. शास्त्रज्ञांचे मन शांत व जिद्दी असते. एकाग्र मनामधूनच शोध लागतात.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक