शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

संस्कारांची शिदोरी भारी.. यशाची उत्तुंग भरारी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 21:04 IST

जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत.चांगल्या जीवनासाठी आयुष्यात शिस्त व चांगले संस्कार असणं गरजेचं

मोठ्या धावपळीनंतर तो कार्यालयात पोहचला त्यांची आज पहिली मुलाखत होती. तो घराबाहेर निघताना विचार करीत होता व त्याची इच्छा होती. जर आज माझी मुलाखत यशस्वी झाली तर माझ्या गावाला सोडून येथे शहरात स्थायिक होईल. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते परत झोपेपर्यंत आईवडिलांच्या रोजच्या कटकटीपासुन मुक्तता मिळेल.सकाळी झोपेतून उठलो की अगोदर अंथरूण आवरा. मग बाथरूममध्ये जा,बाथरूमच्या बाहेर निघत नाही कि मातोश्रीचे फर्मान "नळ बंद केला का ?टाँवेल जागेवर ठेवला की दिला फेकुन? नाश्ता करून घराबाहेर निघालो कि लगेच वडिलांचा आवाज"पंखा बंद केला की चालुच आहे ?"काय काय ऐकावे नुसता वैताग आला यार...नौकरी मिळाली की घर सोडून देईल व शहरात राहील......

आँफिसच्या  दरवाज्याजवळ कोणीच नव्हते , बाजूला ठेवलेल्या वाटर कूलर मधून पानी टपकत होते ,ते पाहून वडीलांचे रागावणे आठवले , म्हणून वाँटर कुलरचा नळ व्यवस्थित बंद केला गळणारे पाणी बंद केले ,समोर बोर्ड वर लीहलेले होते तुमचा इंटरव्यू वरच्या मजल्यावर आहे....

जिन्यातील लाइट चालुच होता तो बंद करून पुढे सरकलो तर रस्त्यात एक खुर्ची पडलेली होती ती जागेवर व्यवस्थित उभी केली व वरच्या मजल्यावर पोहोचलो व पाहिले की आपल्या अगोदर बसलेले उमेदवार बाँसच्या कँबिनमध्ये जात होते व लगेच बाहेर पडत होते....तेथे मुलाखत देऊन बाहेर आलेल्या उमेदवारास विचारल्यावर कळले की , बॉस फाइल पाहुन काहीच प्रश्न विचारत नाहीत आणि परत पाठवुन देत आहेत . असे समजले. माझा नंबर आला व मला मुलाखतीसाठी बोलावले. मी दरवाजा वाजवून विचारले , आत येऊ का सर ? " एस कम इन " आतुन आवाज आला . बसण्यासाठी सुचना मिळाल्यानतंर खुर्चीवर बसलो आणि माझी फाईल पुढे केली.....

फाईल मधील माझ्या कागदपत्रावर नजर मारत असताना कोणताही प्रश्न न विचारता बॉसने विचारले  "केव्हा ज्वाइन करत आहात ?"बाँसच्या या प्रश्नाने मी चक्रावलो. मला वाटले ते माझी गंमत करत आहेत. माझा चेहरा पाहून ते म्हणाले मी गंमत करीत नाही ही वास्तविकता आहे .आजच्या मुलाखतीतून कोणालाही कोणताच प्रश्न विचारला नाही. फक्त सीसीटीव्हीमध्ये मुलाखतीमध्ये आलेल्या उमेदवारांच्या हालचालीमध्ये सर्व काही पाहिले. मुलाखतीसाठी बरेच जण आले,वाँटर कुलरचे गळणारे पाणीसर्वानी पाहिले पण त्याकडे दुर्लक्ष केले. व्हतुम्ही ते बंद केले तसेच व्हरंड्यातील जळणारा लाईट कोणीच बंद केला नाही तो लाईट तुम्ही बंद केला.मध्येच ररस्त्यात पडलेली खुर्ची  तुम्ही उचलली.धन्य तुमच्या पालकांना , ज्यांनी तुम्हाला चांगले व उत्तम संस्कार केले.

कितीही हूशार असला ,चतुर असला पण संस्कारात कमी असाल तर ती व्यक्ती मैनेजमेंट आणि जीवनातील घौडदौडीत यशस्वी होऊ शकत नाही.घरी जाऊन आई वडीलांच्या गळ्यातच पडलो आणि त्यांची माफी मागून त्यांना सर्व काही सांगितले तुम्ही केलेल्या संस्कारामुळेच आज मला ही नौकरी मिळाली. आपल्या जीवनात रोज रोज लहान सहान बाबीवर बोलणारे ,नेहमी सुचना देणाऱ्या आई वडीलाकडुन मला जी शिस्त मिळाली. ती अनमोल आहे . या संस्कारक्षम शिस्तप्रिय संस्कारापुढे मी मिळवलेली पदवीची काहीच हैसियत नाही.जीवनात फक्त शिक्षणच महत्त्वाचे नाही तर त्यासोबत आई वडीलांची शिकवण व संस्कार महत्त्वाचे आहेत...

जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत.चांगल्या जीवनासाठी आयुष्यात शिस्त व चांगले संस्कार असणं गरजेचं आहे. आयुष्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी शिस्त अंगात बाणा. शिस्तीनेच समृद्धी मिळेल.या संस्कारासाठी आई वडिलांच व शिक्षकांच फार मोठ योगदान असेल तरच भावी पिढी सुखी व आनंदी  होईल .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक