शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

मनुष्याने सत्शील, स्नेहल बनावे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 7:51 AM

उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते.

मनुष्य हा सर्व प्राणिमात्रात श्रेष्ठ आहे. सर्व प्राणी-वनस्पती या सर्वांचे अवलोकन मनुष्य करतो, सृष्टीचे सौंदर्य न्हाळतो, त्याची गुणात्मकता तपासतो. अनुभव घेणे, त्या सृष्टीचा अनुभव कथन करणे ही सर्व कार्य मनुष्य करतो. कारण मनुष्य नसता तर या सृष्टीचे रहस्य कोणी जाणले नसते. मनुष्याने नेहमी चांगले जीवन व्यतीत करावे. उंच शिखरावर जाणे, कर्तृत्ववान बनणे, जीवनाचा आनंद घेणे ही कृती मनुष्य करतो. सर्वोच्च प्राणी म्हणून मनुष्याची गणना केली जाते. उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते. उत्साहवर्धक ‘मन’ जीवन जगताना चेतना प्राप्त करुन देते. ‘चेतना’ ही मनाची प्रसन्नता आहे. मनाची प्रसन्नता वाढू लागली की, घबराहट संपते. जीवनात सफलता प्राप्त होते. विशाल बुद्धीचा अनुभव करता येतो. बुद्धीच्या जोरावरच जीवनात काहीतरी क्रांती घडू शकते. मनुष्य जीवनात सुखरूपी अमृत, दु:खरूपी विष पचवता आले पाहिजे. निंदारूपी विष पचवले की सुखाच्या अनुभूतीची वाट सापडते. कारण संतांनी सांगितले आहे, निंदा आणि स्तुती ही तर मानवी मनाचे भाव आहेत. 

निंदा मानणे न मानणे यात सुख-दु:ख अवलंबून आहे. जो प्राणी विकारयुक्त आहे, कुव्यसनात आहे, अडकलेला आहे, विषयभोगातच सर्वरूप सुख आहे याची कल्पना तो करतो. सुख असो दु:ख, ह्या दोन्ही बाजू मानवी मनावर अवलंबून आहेत. मनुष्यप्राणी या दोन्ही बाजूंना कसा समजून घेतो, यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. माणूस योग्य पदाला पोहोचला की तो जगाला उपदेश करण्याचा अधिकारी बनतो. उपदेश त्याचाच लागू होतो. जो सत्शील आहे. ज्याचे आचरण आणि वाणी एकमताने चालते. तोच या जगाला उपदेश करु शकतो. त्याचाच उपदेश जगाला मान्य होतो. त्याच्या उपदेशानुसारच लोक आचरण करतात. मनुष्याने स्नेहल बनावे. मनुष्याचे जीवन अमृतमय आहे. फक्त शुद्ध आचरणाने वागले तर...

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक