शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

खरं दारिद्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 05:50 IST

दारिद्र्य आणि गरिबी याचा कुठेही सुतराम संबंध नसतो.

विजयराज बोधनकरदारिद्र्य आणि गरिबी याचा कुठेही सुतराम संबंध नसतो. उलट मनात सतत नकारात्मक विचार येत राहणं हेच खरं त्या मनबुद्धीचं दारिद्र्य असतं. मग तो श्रीमंत असो वा गरीब असो. बरेचदा आर्थिक पोकळीमुळे गरिबी येते, पण कधीच दारिद्र्य येतं नसतं. अनेक गरीब घरात सत्त्वशील माणसं जन्म घेतात व अनेक श्रीमंत घरातही दारिद्र्य पाय रोवून बसलेलं असतं म्हणून गरिबी आणि दरिद्री यात खूप फरक आहे. आर्थिक गरिबी ही सभोवतालच्या परिस्थितीतून जन्म घेत राहते, अनेकांचं शिक्षण परिस्थितीमुळे पूर्ण होत नसतं. या कारणामुळे अनेक संधी हुलकावण्या देतात आणि पुढे आर्थिकतेची घडी बसत नसते, अशी खूप उदाहरणं आहेत. त्याला दारिद्र्य म्हणता येणार नाही. त्याउलट संयत राहून परिस्थितीनुसार बदलत जाणं हे खरं उत्तम जीवन असतं. दारिद्र्य म्हणजे खऱ्या अर्थाने बुरसटलेले विचार घेऊन जगणं. समाधानी माणूस हा कधीच भौतिक सुखाच्या मागे लागत नाही. त्याउलट अतिसमाधानी असणं हेही एक दारिद्र्य असतं. आळस हा जीवनातला मोठा शत्रू आहे. त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला होतो. अतिसमाधानी म्हणजे कर्महीन असणं आणि मग त्यातून आलेल्या गरिबीचं कारण ‘नशीब’ असं सांगत बसणं हा त्या सांगणाºयाचा दांभिकपणा असतो. गरज नसताना अति पैशाच्या मागे लागणं हे खरं वैचारिक दारिद्र्य असतं. अतिसुखामुळे मुलांची बौद्धिक, मानसिक क्षमता हळूहळू क्षीण होत जाते. सर्व काही तयार पुढ्यात मिळतं, जगण्यात एक संथपणा येतो आणि अशा अनेक घरांत भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा घराच्या, आरोग्याच्या नाशाला कारणीभूत ठरत जातो आणि हेच जगण्यातलं मोठं दारिद्र्य म्हणायला हवं. उत्तम लोकांचा सहवास, उत्तम वाचन, उत्तम श्रवण, चिंतन अन् मनन यातून वैचारिक दारिद्र्य नष्ट होत जाऊन शाश्वत आयुष्य पदार्पण करीत राहतं. दारिद्र्य निर्मूलनाचा हाच एकमेव मार्ग असू शकतो.