शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खरं दारिद्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 5:50 AM

दारिद्र्य आणि गरिबी याचा कुठेही सुतराम संबंध नसतो.

विजयराज बोधनकरदारिद्र्य आणि गरिबी याचा कुठेही सुतराम संबंध नसतो. उलट मनात सतत नकारात्मक विचार येत राहणं हेच खरं त्या मनबुद्धीचं दारिद्र्य असतं. मग तो श्रीमंत असो वा गरीब असो. बरेचदा आर्थिक पोकळीमुळे गरिबी येते, पण कधीच दारिद्र्य येतं नसतं. अनेक गरीब घरात सत्त्वशील माणसं जन्म घेतात व अनेक श्रीमंत घरातही दारिद्र्य पाय रोवून बसलेलं असतं म्हणून गरिबी आणि दरिद्री यात खूप फरक आहे. आर्थिक गरिबी ही सभोवतालच्या परिस्थितीतून जन्म घेत राहते, अनेकांचं शिक्षण परिस्थितीमुळे पूर्ण होत नसतं. या कारणामुळे अनेक संधी हुलकावण्या देतात आणि पुढे आर्थिकतेची घडी बसत नसते, अशी खूप उदाहरणं आहेत. त्याला दारिद्र्य म्हणता येणार नाही. त्याउलट संयत राहून परिस्थितीनुसार बदलत जाणं हे खरं उत्तम जीवन असतं. दारिद्र्य म्हणजे खऱ्या अर्थाने बुरसटलेले विचार घेऊन जगणं. समाधानी माणूस हा कधीच भौतिक सुखाच्या मागे लागत नाही. त्याउलट अतिसमाधानी असणं हेही एक दारिद्र्य असतं. आळस हा जीवनातला मोठा शत्रू आहे. त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला होतो. अतिसमाधानी म्हणजे कर्महीन असणं आणि मग त्यातून आलेल्या गरिबीचं कारण ‘नशीब’ असं सांगत बसणं हा त्या सांगणाºयाचा दांभिकपणा असतो. गरज नसताना अति पैशाच्या मागे लागणं हे खरं वैचारिक दारिद्र्य असतं. अतिसुखामुळे मुलांची बौद्धिक, मानसिक क्षमता हळूहळू क्षीण होत जाते. सर्व काही तयार पुढ्यात मिळतं, जगण्यात एक संथपणा येतो आणि अशा अनेक घरांत भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा घराच्या, आरोग्याच्या नाशाला कारणीभूत ठरत जातो आणि हेच जगण्यातलं मोठं दारिद्र्य म्हणायला हवं. उत्तम लोकांचा सहवास, उत्तम वाचन, उत्तम श्रवण, चिंतन अन् मनन यातून वैचारिक दारिद्र्य नष्ट होत जाऊन शाश्वत आयुष्य पदार्पण करीत राहतं. दारिद्र्य निर्मूलनाचा हाच एकमेव मार्ग असू शकतो.