शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

विचारे दृढता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 05:02 IST

विचार ही एक शक्ती आहे आणि ती माणसाशिवाय कुठल्याच सजीव प्राण्यात नाही.

- बा.भो. शास्त्री‘आचारे योग्यता’ यावर आपण चिंतन केलं आहे. आता सूत्राचा उत्तरार्ध ‘विचारे दृढता’ यावरचं चिंतन करूया. विचार ही एक शक्ती आहे आणि ती माणसाशिवाय कुठल्याच सजीव प्राण्यात नाही. हीच त्याची विशेषत: आहे. म्हणून तोच नराचा नारायण होतो. आचारासारखी विचारात शक्ती असते. एकीने योग्यता तयार होते व दुसरीने कोणता लाभ होतो हे आपण पाहणार. अप्राप्ताची प्राप्ती हा योग आहे व त्या योगची यथास्थिती ठेवण्यासाठी त्या शक्तीला दृढता किंवा दक्षता म्हणतात. या विकासात्मक शक्ती मानवाला उन्नत करतात. आचार सन्मार्गावर व विचार तोल सांभाळतो. कर्म गती देतं. आयुष्याच्या रस्त्यावर जी धोकादायक वळणं असतात, तेथे क्षणभर दक्षता ढळली तर अपघात होण्याची शक्यता असते. तरीच चालायला गती व न चुकायला मती लागते. थोडं जरी बेसावध असलं तर भल्याभल्यांचे अपघात होतात. म्हणून त्यात सातत्य हवं आहे. संत तुकोबा म्हणाले,‘क्षणोक्षणी हाचि करावाविचार तरावया पार भवसिंधू’हा विचार शाश्वताचा-अशाश्वताचा आहे. संसार-परमार्थाचा आहे. धनाचा-मनाचा-तनाचा आहे. संकल्प विकल्पात्मक असलेल्या चंचल मनाला सतत हेलकावे बसतात. म्हणून दृढनिश्चयाचा विचार स्वामी सांगतात. नसुद्ध वीरत्व कामाचं नाही. त्याने विचलित होऊ नये म्हणून त्याला धैर्याची सोबत असावी लागते. महानुभाव कवी केशिराज म्हणतात-मी प्रवर्तला परमार्गीतव महाविघ्नी केली लागीलेवूनी विचाराची वज्रांगीप्रबोधु परसे पराभविलीते म्हणतात, माझ्यावर अविचाराने संकट आणलं होतं. त्याचा मी विचार-शस्त्राने पराभव केला. कालिदासात तोडता येत होतं, पण कुठं उभं राहून तोडावं हे कळत नव्हतं. पुढे तोच विचारशक्तीने महाकवी झाला. विचाराचं शस्त्र अपात्रतेच्या हाती जायला नको. अश्वत्थामाला ब्रह्मास्त्राचं ज्ञान होतं, पण त्याचा कधी कशासाठी वापर करायचा याचा विवेक नव्हता. आज विचारवंतांना अशीच भीती अण्वस्त्रांबाबत सतावत आहे. कृतीचा परिणाम ज्याला कळतो, तोच विचारवंत असतो. यासाठी सामर्थ्य असायला पाहिजेच, पण त्याला विवेकाचं अधिष्ठान असावं लागतं. संयमाचा ब्रेक हवा. लगामाशिवाय घोडा व विवेकाशिवाय माणूस हा वेडाच असतो. मोबाइलचं सामर्थ्य चांगलं, तो गरजेचा आहे. पण त्याचा वापर करायला विवेक लागतो. अन्यथा बरबादी पण होऊ शकते. तारुण्य, धन, प्रभुत्व व अविवेक या चार अपघाताच्या जागा असल्याचं शास्त्र सांगतं. यापैकी एकच रसातळाला नेऊ शकतं. जर चारही उपलब्ध असले तर रावणही मारला जातो. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या साहित्यात श्रोत्यांची मनधरणी करून विवेकाची पेरणी केली आहे. आधी त्यांचे कान तयार केले. नंतर शब्दब्रह्माचा रस त्यात ओतला. शके ११४१ मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं त्यांनी अंतर्बाह्य सूक्ष्म निरीक्षण केलं. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो यावर माणसाचा विश्वास होता. जनावरांना गोंजारतो व माणसांना अस्पृश्य म्हणतो. स्त्रियांना धर्मापासून वंचित ठेवून’ प्राण्यांचे बळी देणारा मानव दिसला.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक