शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत चेंगराचेंगरीमुळे गेला ३१ जणांचा जीव, अभिनेत्याला पाहण्याचा नादात मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
5
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
6
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
7
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
8
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
9
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
10
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
11
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
12
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
13
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
14
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
15
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
16
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
17
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
18
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
19
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
20
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

आनंद तरंग- जाणतेया विखो सुखाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 03:33 IST

जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात.

बा.भो. शास्त्रीस्वर्ग व नरक हे दोन शब्द सर्वांनाच ठाऊक आहेत. स्वर्गाची प्रीती तर नरकाची भीती वाटते. स्वर्ग हा शब्द सुख, तथा फळा वाचक आहे. तर नरक हा दु:ख व क्लेश वाचक आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. कमीत कमी दु:ख म्हणजे सुख आणि कमीत कमी सुख म्हणजे दु:ख असं सुखदु:खाचं स्वरूप आहे. गीतेने संसाराला ‘दु:खालय’, बुद्धाने ‘सब्बंंदु:ख’ म्हटलं आहे. सुख सर्वांनाच हवं असतंं. दु:ख कुणालाच नको असतं. पण हवं ते मिळत नाही. नको ते टळत नाही. कोण देतं ते? कुणी नाही. आपणच निर्माण करीत असतो. सत्कर्माने स्वर्गसुख, तर दुष्कर्माने नरकाची प्राप्ती होते, हे शास्त्र सांंगतंंं. स्वत:च्याच कर्माचंं बरंं-वाईटाचंं फळ स्वत:लाच भोगावं लागतं. ‘आम्ही सुखी आहोत’ असं म्हणणारे लोक खरंच सुखी असतात का? याचं उत्तर सर्वच साक्षात्कारी संंत व श्रीचक्रधरस्वामी नकारार्थी देतात. मग आपण सुख अनुभवतो ते काय आहे? ते दुधातल्या पाण्याला दूध समजतो, तसंं आपण दु:खालाच सुख समजतो. समजा सुख हे दु:खमिश्रित असतंं. सुखात धास्ती तर आनंदात मस्ती असते. जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात. जगात आज तर शुद्ध काहीच भेटत नाही. कुठलाच खाद्यपदार्थ, पेण, पाणी, हवा, विचार, आचार, मित्र, सोयरे, केळंं, आंंंबा, किंबहुना विषातही भेसळ असते. म्हणून आमच्या सुखालाही वेदना असतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘‘जिये लोकिचा चंंद्रु क्षयरोगीजिथंं उदयो होय अस्तालागीदु:ख लेवून सुखाचा अंंगी, सळित जगाते’’चांंगल्या कपड्यांमुळे माणूस सुखी आहे असं वाटतंं, असंच दु:खाने सुखाचा अंगरखा घातला की दु:खही मोहक वाटतं, पण सर्व जगाला छळत आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक