शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आनंद तरंग- जाणतेया विखो सुखाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 03:33 IST

जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात.

बा.भो. शास्त्रीस्वर्ग व नरक हे दोन शब्द सर्वांनाच ठाऊक आहेत. स्वर्गाची प्रीती तर नरकाची भीती वाटते. स्वर्ग हा शब्द सुख, तथा फळा वाचक आहे. तर नरक हा दु:ख व क्लेश वाचक आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. कमीत कमी दु:ख म्हणजे सुख आणि कमीत कमी सुख म्हणजे दु:ख असं सुखदु:खाचं स्वरूप आहे. गीतेने संसाराला ‘दु:खालय’, बुद्धाने ‘सब्बंंदु:ख’ म्हटलं आहे. सुख सर्वांनाच हवं असतंं. दु:ख कुणालाच नको असतं. पण हवं ते मिळत नाही. नको ते टळत नाही. कोण देतं ते? कुणी नाही. आपणच निर्माण करीत असतो. सत्कर्माने स्वर्गसुख, तर दुष्कर्माने नरकाची प्राप्ती होते, हे शास्त्र सांंगतंंं. स्वत:च्याच कर्माचंं बरंं-वाईटाचंं फळ स्वत:लाच भोगावं लागतं. ‘आम्ही सुखी आहोत’ असं म्हणणारे लोक खरंच सुखी असतात का? याचं उत्तर सर्वच साक्षात्कारी संंत व श्रीचक्रधरस्वामी नकारार्थी देतात. मग आपण सुख अनुभवतो ते काय आहे? ते दुधातल्या पाण्याला दूध समजतो, तसंं आपण दु:खालाच सुख समजतो. समजा सुख हे दु:खमिश्रित असतंं. सुखात धास्ती तर आनंदात मस्ती असते. जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात. जगात आज तर शुद्ध काहीच भेटत नाही. कुठलाच खाद्यपदार्थ, पेण, पाणी, हवा, विचार, आचार, मित्र, सोयरे, केळंं, आंंंबा, किंबहुना विषातही भेसळ असते. म्हणून आमच्या सुखालाही वेदना असतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘‘जिये लोकिचा चंंद्रु क्षयरोगीजिथंं उदयो होय अस्तालागीदु:ख लेवून सुखाचा अंंगी, सळित जगाते’’चांंगल्या कपड्यांमुळे माणूस सुखी आहे असं वाटतंं, असंच दु:खाने सुखाचा अंगरखा घातला की दु:खही मोहक वाटतं, पण सर्व जगाला छळत आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक