शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मन करारे प्रसन्न...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 7:05 PM

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले ...

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले प्रत्येक काम यशस्वी होत असतो.असे म्हटल्या जाते. मन हे अस्थिर आहे. क्षणात ते क्षितीजा पलीकडे सैर करु शकते. एवढी वेग विलक्षण क्षमता कशातही नाही. मनाला स्थिर ठेवणे खुप अवघड आहे. त्या करीता साधना करावी लागते. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषी-मूनी संत महात्म्यांनी जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाचे यशाचे गमक मन हेच आहे. मनस्वास्थ ठीक नसेल तर आपण काहीच करु शकत नाही. मना सारखं काही घडल्यास आपण सुखावतो तर मनाविरुध्द काही घडत असेल तेवढेच अस्वस्थ देखील आपण होवून जात असतो. मन हा अभ्यासाचा विषय आहे.मनाच्या स्थितीला जाणून घेणे खुप अवघड आहे. बुद्धी आणि मन याचा सहसबंध आहे कां? हा प्रश्न याठीकाणी महत्वाचा ठरतो. ज्ञान आणि बुद्धीच्या कसोटीवर मनाची स्थिती घडत असते. एखाद्या घटनेतील आपलं वर्तन हे घटनेविषयीचं आपलं ज्ञान कीती आहे तसं वर्तन बदल दिसून येत असतं.याचा अर्थ ज्ञाननावरच मनाच्या भूमिकेची उंची ठरते आपली आवड निवड ही मनावर अवलंबून असतं आपली सकारात्मक वा नकारात्मक भूमिका ही आपल्यातील मन निश्चित करीत असते. कुठलाही दृष्टीकोन ठरविण्यासाठी मन लागतं मनाची स्थिती ही कठोर असू शकते तेवढीच मृदु ही. जीवनातील विविधांगी अनुभव मनाच्या स्थितीला आकार देत असते. विचार हा मनाचा आधार आहे. .सुविचारांनी मनाची व्यापकता वाढते.तसेच वाईट विचार मन कलुषित करते. बरी-वाईट परिस्थिती मन प्रभावित करीत असतं प्रत्येकाला मन:शांती हवी आहे. धन दौलत, सत्ता संपत्तीच्या हव्यासापोटी आपण मन हरवून बसलो आहोत . मनाची संवेदना बोथट झाली आहे . आणि म्हणून आपण आनंद सुख समाधान या पासुन पारखे झालो आहे .

मन करारे प्रसन्न ।सर्व सिद्धीचे कारण॥ हेच अंतिम सत्य आहे.

- नंदकिशोर हिंगणकर, आकोट जि. अकोला

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक