शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परब्रह्मचिंतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 01:06 IST

- वामन देशपांडे मानवी योनीत शरीर आणि मानसिक पातळीवरच्या सुख दु:खाच्या तीव्र संवेदना सतत हेलकावे खात असतात. त्याचे महत्त्वाचे ...

- वामन देशपांडेमानवी योनीत शरीर आणि मानसिक पातळीवरच्या सुख दु:खाच्या तीव्र संवेदना सतत हेलकावे खात असतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्याच्यासाठी हा मानवी जन्म मिळालेला आहे त्याचे भान बहुतांश माणसांचे सुटलेले असते. भगवंतांकडे आपले मन आणि बुद्धी केंद्रित करून, भोगलोलुप इंद्रियांना विषयवासनेपासून रोखण्याचा विवेकच त्यांच्यापाशी नसतो. भगवंताकडे आपले अवघे चित्त एकाग्र केंद्रित केले की, संसारबंधनातून मुक्तता मिळते. हे ज्ञान मिळविणे फक्त मानवी योनीलाच शक्य आहे. त्यासाठी तर भगवंतकृपेने हा दुर्मीळ मानवजन्म दिला आहे. परंतु ही ज्ञानजाणीव न जोपासल्यामुळे सर्वसाधारण माणूस करीत असलेल्या प्रापंचिक शृंखलेत अडकतो आणि सुखदु:खांना सतत सामोरे जातो. या मर्त्य सुखदु:खांना कवटाळून न बसता, स्वस्वरूपाला प्रथम जाणून घ्यावे. संकल्पांपासून निर्माण होणाऱ्या कामनांचा त्याग करावा आणि मनाला स्थिर करीत शरीरांतर्गत वासनाग्रस्त इंद्रियांच्या समूहाला, पूर्ण ताकदीने दूर करीत बुद्धीच्या साहाय्याने घट्ट रूतून बसलेल्या प्रापंचिक वृत्तीला हटवले तर चित्र परमात्मस्वरूपात निश्चित स्थिर होईल हा तत्त्वज्ञानभारला विचार भगवंतांनी अर्जुनाचे निमित्त करून संपूर्ण मानवी योनीला दिला. परमात्मा चराचरातून दाटून आहे ही सत्य जाणीव एकदा का झाली की साधक भक्ताच्या लक्षात येते की, या विश्वात फक्त परमात्मत्व सत्य आहे. बाकी सर्व भासमय असत्य आहे. तेच दु:खाचे मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवंत प्राप्तीचा मार्ग समजावून सांगताना, योगी पुरुष उपासनेचा मार्ग कसा नक्षत्रांकित करतात, यासंदर्भात म्हणतात की,प्रशान्तमनसं हयेनं योगिनं सुखमुत्तमम।उपैति शान्तरजसं ब्रहमभूतकमल्मषम ।।पार्था, ज्या साधक भक्ताची पूर्वजन्माचीही पापे साधनेच्या बळावर नष्ट झालेली आहेत, ज्यांचा तमोगुण पूर्णांशाने भस्मिभूत होऊन, रजोगुणही पूर्णपणे शांत झालेला आहे, इतकेच नव्हे तर दोलायमन पूर्णपणे स्थिर आणि शांत झालेले आहे, अंत:करण निर्मळ झालेले आहे, अशा ब्रह्मस्वरूप झालेल्या योगी पुरुषाला नामामधले सात्त्विक सुख निश्चितपणे प्राप्त होते. याचा अर्थ असा की, एका परमेश्वराखेरीज, त्याच्या नामभारल्या अंत:करणात दुसरे कुठलेही विचार येतच नाहीत. मानवी जीवनातले हे सर्वोत्तम सात्त्विक सुख योगी पुरुष अष्टौप्रहर प्रत्यक्ष अनुभवत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर, योगसंपन्न पुरुष मर्त्य सुखांनी चुकूनही बहरून येत नाही. कारण त्याने अतुट नामसाधनेच्या बळावर देहभावना पूर्णपणे विसर्जित केलेली असते. सर्वत्र परमेश्वर आहे या दृढभावनेने तो योगीपुरुष प्रत्येक क्षण नाम घेत वेचत असतो. सर्वोत्तम सुख हे आत्मसाक्षीने जगण्यात आहे, हे त्याच्या ज्ञानमयी बुद्धीने प्रत्येक क्षणी अनुभवलेले असते. त्यामुळे मानवी जीवाला बेजार करणाºया सुखदु:खाच्या लाटा त्याच्या आयुष्यात उसळतच नाहीत.भगवंत अर्जुनाला पे्रमाने सांगतात की, ज्या योगी पुरुषाने आपले अवघे अस्तित्व परब्रह्मचिंतनात विलीन केलेले असते आणि म्हणूनच ब्रह्मानुभवाचे शाश्वत सुख त्याला सहजपणे लाभते. साधक भक्ताच्या साधनामय अशा भाग्यशाली आयुष्यातले हे सर्वोत्तम सुख असते. असा योगी पुरुष संपूर्ण विश्वात पसरलेल्या जीवसृष्टीमध्ये तेच आत्मतत्त्व अनुभवतो जो तो स्वस्वरूपात नित्य अनुभव असतो. याचा सोपा अर्थ असा की सर्व जीवांमध्ये सूक्ष्म रूपात तेच परमेश्वरी तत्त्व नांदते आहे याचा प्रत्यक्ष अनुभव योगी पुरुष नित्य घेत असतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक