शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नवरसी भरवी सागरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:13 AM

ज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आ

- डॉ. रामचंद्र देखणेज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आहे.अनुभव घेणे आणि अनुभव व्यक्त करणे हे साहित्य होय. अंतर्मनाने बाह्यमनाशी केलेला संवाद म्हणजे साहित्य होय. पण भावानुभूतीचा आत्मसंवाद म्हणजे कविता होय. कवी कवितेतून एकीकडे रस निर्माण करून इतरांना आनंद देत असतो तर दुसरीकडे स्वत:च्या मनाशी संवाद करून आपणही आनंद घेत असतो. आपले काव्य कसे असावे याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात...नवरसी भरवी सागरू।करवी उचित रत्नांचे आगरु।भावार्थाचे गिरीवरू।निपजवी माये।माझ्या काव्यात नवरसांचा सहजसुंदर शिरकाव होऊ दे. शब्दरत्नांचे आगर लाभू दे आणि भावार्थाचे गिरीवर त्यातून उभे राहू देत. काव्याची व्याख्या करताना विश्वनाथाने म्हटले आहे.‘वाक्यं रसात्मकं काव्यम्।’ज्यात नवरसांपैकी एक किंवा अनेक रस असतील त्याला काव्य म्हणावे. काव्यातील मुख्य तत्त्व किंवा काव्याचा प्राण ‘रस’ हाच होय. शब्दांना जे काव्यत्व येते ते रसांमुळेच. ‘रस्यते इति रस:’ ज्याचा आपण आस्वाद घेतो किंवा आवडीने चाखतो तो रस होय. काव्यशास्त्रवेत्यांनी १. शृंगार, २. हास्य, ३. करुण, ४. रौद्र, ५. वीर, ६. भयानक, ७. बीभत्स आणि ८. अद्भुत असे आठ रस सांगितले आहेत. निरनिराळ्या पंडितांनी त्यात शांत, भक्ती किंवा प्रेयान यापैकी रसाला घालून ‘नवरस’ ही संकल्पना मांडली आहे. ज्ञानदेवादी संतपरंपरेने वरील आठ रसांबरोबर ‘शांत’ रसालाही काव्यात महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे शांत रसाचे निवासस्थान.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,जेथ शांत रसाचिया घराअद्भुत आला आहे पाहुणेरा।ज्ञानेश्वरीचा मूळ रस हा शांत रस आहे. अद्भुत रस हा त्याच्या घरी आलेला पाहुणा आहे. नवरसात शांतरस हा कळसावर शोभतो हे निश्चित.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक