शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
3
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
4
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
5
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
6
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
7
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
8
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
9
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
10
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
11
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
12
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
13
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
14
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
15
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
16
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
17
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
18
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
19
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
20
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धतेतून भक्त व भगवंताचे मीलन - ब्रह्मेशानंद स्वामी महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:13 IST

बाह्य शुद्धता करता करता आंतरिक शुध्दता राखता आली पाहिजे. देहामध्ये वास करणारा भगवंत शुध्दतेमुळे आहे. यासाठी तन, मन,

आपल्या कार्याला शिस्त नसेल तर देव त्यास जवळ घेत नाही. मग ते देवाचे भजन-कीर्तन असो, जप तप असो. हे कार्य करणारा स्वतः शुद्ध राहिला पाहिजे. जेथे शुद्धता असते तेथे देव वास करतो. आपण शुद्धच राहिलो नाही तर देव आपल्यापासून दूरच राहणार. भक्तांनी शुद्धतेत रहायला शिकले पाहिजे. शरीर शुद्ध राखले पाहिजे. शरीराची शुद्धता, वातावरणाची शुद्धता, इंद्रियांची शुद्धता, येनकेन प्रकारे ज्या ज्या माध्यमांतून आपला शुद्धतेचा संबंध येतो, त्या सर्वांकडे आपण शुद्धतेचा संदेश पोचवला पाहिजे.  शुद्धतेमध्ये भगवंत विराजमान असतो म्हणून त्याला स्वच्छता आवडते.

 

बाह्य शुद्धता करता करता आंतरिक शुध्दता राखता आली पाहिजे. देहामध्ये वास करणारा भगवंत शुध्दतेमुळे आहे. यासाठी तन, मन, स्वच्छ केले पाहिजे. आपले बोलणे, ऐकणे सुध्दा शुध्द असले पाहिजे. साहजिकच यामुळे समाजात सज्जनांची वस्ती वाढेल.आज भ्रष्टाचार फोफावला आहे,अशुध्दता प्रचंड वाढली आहे. म्हणून आपल्या मनाला सात्त्विकतेचा संदेश आपणच दिला पाहिजे. संत संगतीमध्ये शुध्दता आपणच निर्माण केली पाहिजे. आपल्याला संसारात काम , क्रोध, मोह, मद, मत्सर याही षडरिपुंची गरज आहे. कारण त्या भगवंतानी आपल्याला दिलेल्या आहेत. जी जनावरं दुसऱ्यांना मारून खातात त्यांना पाळू नये. मांस भक्षण केल्याने आपली प्रकृती अशुध्द बनते. दुसऱ्याचे मांस खाऊन जगण्यात काय अर्थ राहणार ?

 

सात्विकता हृदयात ठेवली पाहिजे म्हणून आहार शुध्द असावा. मुखाला शुध्द राखले पाहिजे. कारण मुखातून निघालेला एक शब्द जरी विषारी असला तर तो कितीतरी लोकांची मने कलुषित करून टाकतो. एवढी जबरदस्त ताकद एका शब्दामध्ये असते. या वाणीतून चांगलीही कामे होऊ शकतात. पण जे लबाडीकरिता आपली वाणी खर्च करतात, त्यांना भगवंताकडून क्षमा नाही. लबाडीचे शब्द पूजनीय नाहीत .एक शब्द वाकडा पडला तर त्याची गंभीर किंमत चुकवावी लागते.आपल्या वाणीतून स्वहिताचे शब्द ,चांगले शब्द आले पाहिजेत. त्यामुळे आपले कल्याण होते.

 

आपले जीवनव्रत ही भगवंत सेवा आहे. येथे भगवंत नित्य प्राप्त आहे. येथे भगवंत आहे तोच मिळतो, त्याला कोणत्याही प्रांतातून हुडकून आणण्याचा वृथा प्रयत्न करावा लागत नाही. याचे कारण कोणत्याही वासनेच्या तथा कामनेच्या पूर्ततेसाठी त्याचा संबंध आम्ही मानलेला नाही. उलट तोच एकंदर कर्तव्य-कर्माच्या ठिकाणी सदा प्राप्त राहतो आहे. तर आणखीन त्याच्याकडे काय मागायचे बाकी आहे. भगवंत भक्त आहे तो द्वितीय जाणत नाही .' देव ,भक्त -दुजा ना विचार ' म्हणूनच भक्ताला तो नित्य प्राप्त राहतो. यामुळेच त्यास भक्त ही संज्ञा प्राप्त आहे. असा जो भक्त ज्या ठिकाणी वास करतो, तेच भगवंत मिळण्याचे स्थान आहे.

 

जो व्रती आहे त्याला भगवंताचा भागवत धर्म पाळावाच लागतो. अन्य उपचारांना तिलांजली देऊन जो शुध्द झालेला असतो तोच व्रताचरण होय. भगवंतावाचून अन्य कोणाचीही सत्ता भक्ताला मान्य राहत नाही. जडचेतन रूपाने केवळ त्याचाच संस्पर्श जो प्राप्त राहत आहे त्या अविनाशिकाचा परिचय देणे हेच एकमात्र कर्तव्य त्यास मान्य राहत आहे. उभय रूपात अभिन्न एकत्वाने सम-समान राहणे ज्या परम तत्वाचे सदा आपल्या भावाचे अनुरूप प्राप्त राहणे आहे. त्याच्याशी नित्य - संबधित तथा नित्य -युक्त राहण्याचे लक्षण प्रगटही राहत आहे. भक्त व भगवंताचे मीलन होय.

शब्द-संकलन : किशोर स. नाईक, डोंगरी गोवा  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक