शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

संयम ठेवून वेळेचा सदुपयोग करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:50 IST

घरातील एकांतवासात वेळेचा सदुपयोग करून घेण्याची एक संधी आपल्याला मिळाली आहे.

घरातील एकांतवासात वेळेचा सदुपयोग करून घेण्याची एक संधी आपल्याला मिळाली आहे. सध्या टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा माध्यमांवर आपण वेळ घालवत आहोत. त्यामधील थोडा वेळ काढून आणि घरात परस्परांतील अंतर राखून पंचाक्षरी मंत्राचे, महामृत्युंजय मंत्राचे किंवा आपल्या इष्टदेवाच्या मंत्राचे सामूहिक रूपाने पठण करणे अधिक योग्य राहील. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.सध्या कोरोनारूपी महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण जग गृहबंधनात आहे. ही गोष्ट अपरिहार्य होय. हे गृहबंधन तोडून बाहेर येण्याचे धाडस कोणीही करू नये.कैकयीच्या समाधानासाठी प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनवासात गेले होते, असे आपण रामायणामध्ये ऐकतो आणि वाचतो. त्याप्रमाणे सध्या कोरोनारूपी कैकयीला शांत करण्यासाठी आपल्याला फक्त एकवीस दिवस घरात बसून राहावयाचे आहे. हा रामाने भोगलेला त्रासदायक वनवास नसून सर्व कुटुंबीयांसोबत असलेला गृहवास होय, हे लक्षात घ्यावे. सर्व अनुकूलतेने हा गृहवास पत्करायचा आहे.अनेक डॉक्टर्स, नर्सेस, शुश्रूषासेवक, पोलीस हे सर्वजण आपले सर्वांचे आरोग्य जपण्यासाठी स्वत:चे घर, कुटुंब सोडून रात्रंदिवस राबत आहेत. शरीराचे सर्व आवेग सहन करीत शुश्रूषाकार्य करीत आहेत. अनेक डॉक्टर्स आपल्या कुटुंबापासून दूर राहून संन्याशाप्रमाणे राहत आहेत. त्यांच्या या त्यागाची किंमत आपण कधीही चुकवू शकणार नाही. आपल्याला एवढेदेखील करण्याची गरज नाही.घरातील एकांतवासात वेळेचा सदुपयोग करून घेण्याची एक संधी आपल्याला मिळाली आहे. सध्या टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा माध्यमांवर आपण वेळ घालवत आहोत. त्यामधील थोडा वेळ काढून आणि घरात परस्परांतील अंतर राखून पंचाक्षरी मंत्राचे, महामृत्युंजय मंत्राचे किंवा आपल्या इष्टदेवाच्या मंत्राचे सामूहिक रूपाने पठण करणे अधिक योग्य राहील. या वाचिक जपामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन सर्वांना मन:शांती लाभेल. यामुळे सर्वधर्मीयांमध्ये सद्भावना निर्माण होईल.हे गृहबंधन संपेपर्यंत सर्वांनी अल्पाहार घेणे योग्य ठरेल. शरीराला काहीच कष्ट नसताना भरपेट खाणे अपायकारक ठरू शकते. ज्यांना शक्य आहे त्यांनी निराश्रित लोकांसाठी योग्य पद्धतीने अंतर राखून अन्नवाटप करावे. याकाळात यासारखे दुसरे पुण्यकार्य नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे काम करीत आहे. त्यांना या कामी शक्य ते सहकार्य केले पाहिजे. जाणिवपूर्वक कायदा तोडून कोणीही घराबाहेर पडू नये. यासाठी सर्व धर्मीयांचे सहकार्य आवश्यक आहे. आपण सर्वांनी घरात बसून नियमांचे काटेकोर पालन केले तर कोरोना महामारी शांत होऊन जग तिच्यापासून मुक्त होईल.सध्या सर्व लोक घरात बसल्यामुळे निसर्गातील वातावरण शुद्ध होत आहे. कारखाने बंदआहेत, डिझेल-पेट्रोल जळणे बंद आहे आणि माणसांचे बाहेर फिरणे बंद आहे. त्यामुळे प्राणी आणिपक्षी निर्भयपणे बागडतानादिसत आहेत. कोरोनाने आपल्याला हा धडा शिकवला की, घरी शांत बसाल आणि बाहेरच्या वातावरणात फार ढवळाढवळ करीत नसालतर निसर्ग आपल्या मूळ स्वरूपात टिकून राहील. म्हणून आपल्या हातावर संयम ठेवून वेळेचा सदुपयोग करून घ्यावा.श्रीकाशी जगद्गुरूडॉ. चंद्रशेखरशिवाचार्य