शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 7:32 PM

भक्ती कर्मात देखील परमप्रेम असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)भक्ती साधनेत नुसत्या बाह्य उपचाराला किंमत नाही. गणित शास्त्रात जसे नुसत्या शून्याला किंमत नाही, त्या शून्यामागे एखादा अंक असेल तरच शून्याला किंमत प्राप्त होते तसेच भक्ती कर्मात देखील परमप्रेम असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही. देवर्षी नारद महाराज म्हणतात -सातु अस्मिन् परम प्रेमरु पा ॥भगवंत हा परमप्रेम स्वरुप आहे. तो नुसत्या प्रेमाचा विषय नाही तर परमप्रेमाचा विषय आहे. नुसते प्रेम हे शारीरिक पातळीवरचे असते. परम प्रेमात वासनेचा भाव नसतो फक्त समर्पणाचाच भाव असतो. एक उर्दू शायर म्हणतो -मोहब्बत सीखनी है, तो सीख शमा से ।मौत तक जलती है पर उफ् निहं करती जुबाँ से ॥परमप्रेमच बघावयाचे असेल तर दिव्यातील ज्योतीकडे बघा.. स्वत:चा अंत होईपर्यंत ती पतंगासाठी जळत राहते पण तिच्या तोंडातून उफ् असा उद्गार निघत नाही.

अध्यात्मशास्त्रात या परमप्रेमाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत, १) पूर्व रागसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेचे वर्णन एका विरहिणी मध्ये करतात -पैल तो गे काऊ कोकताहे ।शकून गे माये सांगता हे ॥परमेश्वराच्या प्राप्तीसाठी चित्तात निर्माण तळमळ, अंतरंगात निर्माण झालेली जी अनामिक ओढ, त्यासच पूर्वराग असे म्हणतात. एकनाथ महाराज रु क्मिणी स्वयंवर ग्रंथात पूर्वराग अवस्थेचे वर्णन करतात -कृष्ण स्वरूपाची प्राप्ती । भीमकी सादर श्रवणार्थी ॥ह्रदयी अविर्भवली मूर्ती । बाह्य स्फूर्ती मावळली ॥नारदांच्या मुखातून भगवंताच्या लीला ऐकल्या आण िरु क्मिणीचे अष्टसात्विक भाव जागे झाले. तिची ही जी अवस्था झाली त्यालाच पूर्वराग असे म्हणतात.

२) मीलनया अवस्थेत साधकाला निर्गुण परमात्म्याचा सगुण साक्षात्कार झालेला असतो. ही अवस्था अवर्णनीय आहे. संत ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेचे वर्णन करतांना म्हणतात -निरखित निरखित गेलिये वो । पाहे तव तन्मय झालिये वो ॥माझ्या सूक्ष्मदृष्टीने मी परमात्म्याचा शोध घेतला आणि मग तो मला दिसला, मन शांत झाले, ही मीलन अवस्था आहे. भक्तीशास्त्रात ही अवस्था अत्यंत श्रेष्ठ आहे.

३) विरहभगवंताची भेट झाली व कांही कारणाने त्याचा वियोग झाला तर चित्ताचे ठिकाणी जी आगतिकता निर्माण होते तिला विरह अवस्था असे म्हणतात. नाथबाबा एका गौळणीत या अवस्थेचे वर्णन करतात, भगवंताला नेण्यासाठी अक्रूर गोकुळात आले. देव उद्या मथुरेला जाणार, या विरह अवस्थेने व्रजवासियांची जी अवस्था झाली ती अवर्णनीय आहे.नाथबाबा वर्णन करतात -रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी ।भूमी पडल्या व्रजबाळी कोण त्या सांभाळी ।नयनांच्या उदकाने भिजली धरणी ॥श्रीकृष्णाच्या विरहाने अगतिक झालेल्या गोपिका गोविंदा माधवा म्हणत रथासमोर आडव्या पडल्या व अक्रूराला म्हणाल्या, काका..! हा रथ आमच्या अंगावरून न्या... त्यांचा तो आक्र ोश बघून दगडालाही पाझर फुटला असेल. या अवस्थेला विरह अवस्था म्हणतात. एवढी अनन्य प्रेम लक्ष्मणभक्ती फक्त गोपिकांच्या जवळ होती म्हणून त्यांना देव बांधता आला. तुकाराम महाराज म्हणतात - प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥ 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक