शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आनंद तरंग - नीती सांगतो ऐका...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:36 IST

नाथांचे हे दीर्घ भारूड आचार, विचार, कृती आणि उच्चार शिकविणारे नीतिशास्त्र आहे.

प्रा. शिवाजीराव भुकेलेलोकशिक्षक संत एकनाथांचे नीती नावाचे भारूड जेव्हा परवा वाचनात आले, तेव्हा एका कटू सत्याचा साक्षात्कार झाला. अरे! नाथांच्या या भारुडाची मध्ययुगात जेवढी गरज नव्हती, तेवढी सामाजिक गरज आज निर्माण झाली आहे. नाथांच्या काळात काठीला सोने बांधून लोक काशीला जात होते म्हणे. आज मात्र घरातील तोळा-दोन तोळे सोने रात्रीचे चोर काठीचा धाक दाखवून चोरून नेतात, तर दिवसाचे चोर ख्यालीखुशाली जीवन जगण्यासाठी दिवसाढवळ्या दुसऱ्याला लुबाडतात. तेव्हा वाटायला लागते ‘नीती’ला खरंच आम्ही धाब्यावर बसवून अनीतीचा धबधबा समाज जीवनावरून धोऽऽ धोऽऽ वाहू लागला आहे. जो लाच मागत नाही, जो सरळ मार्गाने समोर आल्या-आल्या लोकांचे काम करतो, अशा प्रशासकीय अधिकाºयाला एक तर भोळसट मानले जाते अथवा नेभळट म्हणून त्याची प्रतारणा केली जाते. अनीती ही समाजाच्या पतनाची निसरडी वाट आहे. भले-भले या वाटेवरून घसरून पडले आहेत. तरीदेखील समाजात त्यांनाच प्रतिष्ठेच्या ‘गढ्यावर’ विराजमान केले जात आहे. अशा वेळी संत एकनाथ महाराज म्हणतात,

नीती सांगतो ऐका एक, दास दाभिचा सेवकसांडावरून जाऊ नयें, लाच खाऊ नयेंअक्रीत घेऊ नयें, इमान तोडू नयेंबेभान होऊ नयें, कोणी एक ॥

नाथांचे हे दीर्घ भारूड आचार, विचार, कृती आणि उच्चार शिकविणारे नीतिशास्त्र आहे. संस्कारी समाजाची ती एक आचारसंहिता आहे. नीतिमान समाजात सद्भाव, सद्धर्म, सद्गती, सद्विचार या खºया दैवी गुणांची निर्मिती होऊ शकते. ही दैवी संपत्तीची नीती कुठून आकाशातून किंवा पाताळातून येत नाही, तर समाजातील थोरा-मोठ्यांच्या आचरणातून इतरांपर्यंत पाझरत जाते व समाज जीवनात हळूहळू सज्जन माणसांची संख्या वाढत जाते. संत ज्ञानेश्वर माउलीने सज्जनांना कलंकरहित चंद्रमाची व तापरहित सूर्याची उपमा देताना म्हटले आहे -चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन ।ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे हो तू ।

सज्जनाचे सोयरेपण समाजात शिवत्वाचे चांदणे शिंपित जाण्याचे काम करते, म्हणून अशा सज्जनाची समाजात जर वृद्धी व्हायची असेल, कुणाच्या सत्संगाला जायचे असेल तर जा अगर जाऊ नका. कुठल्या स्वामी आणि संत महंताच्या पायावर मस्तक टेकायचे असेल तर टेकवा अगर टेकवू नका. कुठल्या देवाच्या मंदिराचे उंबरे झिजवा अगर झिजवू नका. फक्त एकच काम करा. पाप, वामाचार, दंभ, दुराचार, भ्रष्टाचार ही अनीतीची पिलावळ माझ्या घरात चोरपावलांनीसुद्धा येणार नाही याची दक्षता घ्या अन् बघा, खरंच! घरा-घरांत स्वर्गीय सुखाचा श्वाश्वत आनंद प्राप्त होतो की नाही. तशी नीतिमत्तेची कल्पना जरी व्यक्तिसापेक्ष असली, तरी नीतीचे काही सर्वसामान्य नियम आहेत, जे लोकरक्षणासाठी उपयुक्त आहेत. आधुनिक युगातील भौतिक बदलाचा स्वीकार करून ही समाज व कुटुंबावरची नीतिमत्तेची बंधने समाजाचा वारू स्वैर उधळू नये म्हणून स्वीकारावीच लागतील, अन्यथा नाथांनीच वर्णन केल्याप्रमाणे -कलियुगाची दादा ऐकावी थोरी,पुत्र तो होईल पित्याचा वैरी ।ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी।।

या अवस्थेपासून आम्ही फारसे दूर नाही. तेव्हा समाजाच्या शिवत्वाची रक्षा करायची असेल तर किमानपक्षी कौटुंबिक नीतिमत्तेचे तरी आचरण करूया आणि सुदृढ समाज निर्मितीचे संतांचे स्वप्न काही अंशाने साकार करूया. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक