शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

जिंदगी प्यार का गीत है..इसे हर दिल को गाना पडेगा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 22:09 IST

सुख आलं, तरी समताभाव राखून आनंद घ्या व दुःख आलं तरी समताभाव राखून तटस्थ राहा.

- डॉ. दत्ता कोहिनकर रात्री दहाचा सुमार, झोपायच्या तयारीत असताना रेडियोवर गाणं लागलं - जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पडेगा। जिंदगी गम का सागर भी है, हमके उस पार जाना पडेगा खरोखर जीवन हे सुख-दुःखाचं मिश्रण आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन भावांनी संपत्ती वाटून घेतली. मोठा भाऊ उच्चशिक्षित, तर लहान अडाणी. मोठ्या भावानं लहान भावाची फसवणूक करून किमती वस्तू स्वतःकडे ठेवल्या. काही दिवसांनी लहान भावानं मोठ्या भावाला घरातील छताच्या तुळईला वडिलांनी कापडात काहीतरी बांधून ठेवल्याचं दाखवलं. त्यात किमती हिरा व चांदीची काळी पडलेली अंगठी होती. मोठ्या भावानं हिरा स्वतःकडं ठेवला व चांदीची अंगठी भावाला दिली. मोठा भाऊ प्रचंड श्रीमंत - मोटार, बंगला सर्व काही मुबलक, तरीही नेहमी व्याकूळ असायचा. बायकोबरोबर भांडणं करायचा. अधूनमधून दारू पिऊन मुलांना मारझोड करायचा. झोपेच्या गोळ्या घेऊ लागला. कामावर जाणं बंद झालं. त्याची समाजात अवहेलना होऊ लागली. कारण त्याच्या मनासारखं घडलं, की तो प्रचंड खूष व्हायचा व मनाविरुद्ध घडलं, की नाराज व्हायचा. लहान भाऊ मात्र कमी संपत्ती असूनही सुखाने संसार करत होता. कारण चांदीच्या अंगठीवरचं वडिलांनी कोरलेलं वाक्‍य तो रोज वाचायचा - ह्यये भी बदल जाएगा.ह्ण त्यामुळे तो सुख आलं तरी नाचायचा नाही व दुःख आलं तरी रडायचा नाही. मोठ्या भावाकडं सगळं ऐश्‍वर्य होतं, पण वडिलांचा ह्यये भी बदल जाएगाह्ण हा मंत्र नव्हता. म्हणून गौतम बुद्ध म्हणतात...सुख आये नाचें नही, दुःख आये नही रोय। दोनो में समता रहे - उत्तम मंगल होय। जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य व परिवर्तनशील आहे. गीतेतही सांगितलं आहे. ह्यजो आज तुम्हारा है, वह कल किसी और का होगा। तेव्हा सुख आलं, तरी समताभाव राखून आनंद घ्या व दुःख आलं तरी समताभाव राखून तटस्थ राहा. त्याला साक्षीभावाने पाहा. कारण सर्वच अनित्य आहे. सुखी होण्यासाठी सर्वप्रथम आपण स्वाध्याय केला पाहिजे. मी कोण? माझी ताकद किती? मी काय करू शकतो? माझे ध्येय काय? प्रत्येकाचा स्वतंत्र पिंड असतो. सगळ्याच पालकांना मुलांनी इंजिनिअर, डॉक्‍टर व्हावंसं वाटतं. पण आपला व मुलांचा पिंड पाहूनच ध्येय निवडलं पाहिजे व निवडलेल्या ध्येयाला सकारात्मक विचारांची जोड देऊन ध्येयप्राप्ती केली पाहिजे. सकारात्मक विचार मनाची सबलता वाढवतात. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, ह्यह्यतेहतीस कोटी देवांवर तुमचा विश्‍वास असेल व स्वतःवर विश्‍वास नसेल तर तुम्ही नास्तिक आहात.ह्णह्ण तेव्हा मन सबल व निर्मल करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ १५ मिनिटे शांतपणे ध्यानाला बसा व तटस्थपणे जाणाऱ्या-येणाऱ्या श्‍वासाला जाणत राहा, हाच मनाचा व्यायाम.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक