शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

राष्ट्रसंतांची पत्रे : मोक्ष-प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:05 IST

मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळे होणे, आसक्तीपासून अनासक्त होणे. हे मोकळे होण्याचे अनेक मार्ग आहेत. एखाद्या कार्यापासून मोकळे हे तेवढ्यापुरतेच झाले. पण संपूर्ण व्याधी-उपाधी, शरीराची, मनाची, बुद्धीची किंबहुना ज्ञानाचीही अहंरूपाने सोडून स्वरूपाशी तादात्म्यवृत्ती साधणे यालाच मोक्ष मिळणे म्हणतात.

प्रिय मित्र-मोक्ष अथवा मुक्ती म्हणजे काय? आपण विचारल्यावरून उत्तर लिहीत आहे. मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळे होणे, आसक्तीपासून अनासक्त होणे. हे मोकळे होण्याचे अनेक मार्ग आहेत. एखाद्या कार्यापासून मोकळे हे तेवढ्यापुरतेच झाले. पण संपूर्ण व्याधी-उपाधी, शरीराची, मनाची, बुद्धीची किंबहुना ज्ञानाचीही अहंरूपाने सोडून स्वरूपाशी तादात्म्यवृत्ती साधणे यालाच मोक्ष मिळणे म्हणतात. दानाने, धर्माने, परोपकाराने, सेवेने उच्च गती प्राप्त होते. कारण जीवाची उच्चांक अवस्था त्याने मिळते. स्वर्गपद मिळते किंबहुना इंद्रपदही मिळणे शक्य आहे. कारण त्या जीवात देवतांनाही वश करून त्यांच्या प्रसन्नतेने त्याने राज्य घेणेही संभवते. पण मोक्षाला तर हे सोडून निव्वळ परमपदाच्या ठिकाणी विलीनच व्हावे लागते.

ज्या पदाला गेल्यानंतर पुन्हा येणे नाही, पुण्य आणि पापाचीही वासना उरलेली नाही, असे जीवा-शिवानी अभिन्नपण ज्याने मिळविले असेल, सोहं तत्त्वांशी ज्याचे तादात्म्य झाले असेल अशा निर्विकार वृत्तीरहित पुरुषालाच मोक्ष संभवतो. पण तो प्राप्त करण्याला प्रथम सदाचारी, शुद्धविचारी चित्त स्थिरतची व गुरुदेवाच्या आज्ञेकरिता प्राण पणाला लावणारी श्रद्धा असावी लागते. त्यामुळे मनातील व अंगातील सर्व दुुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांचा आश्रय करावा लागतो. अशा नियमांनी वागणारा मग गृहस्थधर्मी असो वा संन्यासी असो, त्यालाच मोक्षाचे सुख म्हणजे धाम प्राप्त होणे संभवते. निव्वळ वेदांताच्या चर्चा करून व तीर्थाटने करून मोक्ष मिळणे दुर्लभ आहे.कारण त्याने वासनेचा त्याग होत नाही. उलट मनाच्या भराऱ्या मारण्याला मदत मिळते व नसता प्रवासाचा, देवाच्या-संतांच्या, बाह्य स्वरूपांचा अहंकार जमा होतो. त्याने वासना थांबत नाही; तर तिला पुन्हा खेळण्याला जागा मिळते ती आत्म-स्वरूपाकडे जाण्याला प्रवृत्त झाली पाहिजे. हळूहळू विषयापासून, उपाधीपासून, दंभ-दर्भ-द्वेषापासून सुटली पाहिजे. लहान जीवापासून तो मोठ्या जीवापर्यंत नम्रता, समरसता धारणा करू शकली पाहिजे. असे साधन जी उपासना, जो देव, जे संत देत असतील व अभ्यासक घेत असतील तेच मोक्षसाधनाला प्राप्त करून देऊ शकतात. सामान्य माणूसही ज्ञानाने व जाणिवेने मोक्ष प्राप्त करू शकतो. त्याला यज्ञाची, जप-तपाची, धन व जातीची जरूर नाही. केवळ ज्ञान प्राप्त करून जीवाला अज्ञानजनक संगतीचा त्याग करूनही पुरूष मोक्षाचा धनी होतो.                                                                                                                                                   -तुकड्यादास

  • संकलन : बाबा मोहोड
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज