शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

सागरा सम बनू या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 02:15 IST

आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये त्यांच्या अंगठ्या पाहतो. मनुष्याच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो, ही आश्चर्याचीच गोष्ट नाही का?

- नीता ब्रह्माकुमारीकाही दिवसांपूर्वी मी ओडिशा येथील चिल्का लेकला गेले होते. थोड्या अंतरावर संगमलाही गेले. जेव्हा तिथं बंगालचा उपसागर पाहिला आणि मनात आलं की खरंच मनुष्याला सागरासमान बनायला हवं. तिकडच्या एका मासेमाऱ्यानं आम्हाला मोती, पोवळं, नीलम, पुखराज, पाचू अशी अनेक रत्नं काढून दाखवली. ते दाखवताना त्यांचं महत्त्वही तो सांगत होता. ज्योतिषशास्त्रात या रत्नांचं खूप महत्त्व आहे. आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये त्यांच्या अंगठ्या पाहतो. मनुष्याच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो, ही आश्चर्याचीच गोष्ट नाही का? पृथ्वीतलावर राहणाºया प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आज अनेकानेक अडचणी, समस्या येतात. खरं तर बाहेरच्या परिस्थितीचं रूप जे पण आहे ते आपल्या आंतरिक अवस्थेचं प्रमाण आहे. अंतर्विश्वामध्ये जे चाललं आहे तेच बाह्यविश्वात होत आहे. जसं सागराचं बाह्यरूप पाहिलं तर तो कधीच शांत नसतो. पण त्याच्या तळाशी असीम शांती असते. मनुष्याचं जीवनही तसंच आहे. बाहेरचं रूप नेहमीच नवनवीन परिस्थितीच्या घेरात अडकलेलं दिसतं. पण त्या सर्व समस्यांची उत्तरं आपल्या अंतर्विश्वामध्येच आहेत. समुद्राच्या तळाशी अनेकानेक अमूल्य रत्नं मिळतात, त्याचप्रमाणे मनाच्या तळाशी जाऊन त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणास मिळत जातात. अनेक रहस्यं उलगडली जातात. बंगालच्या उपमहासागराचं विशाल रूप जेव्हा बघत होते, तेव्हा त्याचं ते शुद्ध, स्वच्छ निळं पाणी दूरपर्यंत दिसत होतं. परंतु जेव्हा ते पाणी उफाळून किनाºयाजवळ यायचं तेव्हा त्याचा रंग बदललेला असे. कधी कधी आपलंही असच होतं. खूप वेळा आपण स्वत:ला समजावतो, आज राग करायचा नाही. आज कुणाला दु:ख द्यायचं नाही. पण अशी काही परिस्थिती आपल्यासमोर येते की, आपण चांगलं ठरवलेलं असलं तरी आपल्याकडून परत परत त्याच चुका होतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक