शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आलस्य दवडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:05 IST

आळशी लोक नेहमीच नशिबाला दोष देतात. आम्हाला संधी मिळाली तर मोठा पराक्रम करू, अशा वल्गना करण्यातच त्यांचा वेळ जातो. ...

आळशी लोक नेहमीच नशिबाला दोष देतात. आम्हाला संधी मिळाली तर मोठा पराक्रम करू, अशा वल्गना करण्यातच त्यांचा वेळ जातो. केवळ बोलाचा भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्षात काही करायचेच नाही. शिवाय समाजातील यशस्वी लोकांचा मत्सर करण्याची सवय अशा लोकांना जडते. आळसामुळे सोप्या गोष्टीही अवघड वाटू लागतात. अशाने त्यांच्या आयुष्यात त्यांना काहीच साध्य होत नाही. अपयश झेलतच ही आळशी मंडळी जगत असतात. याउलट उद्योगी लोकांचे असते. त्यांच्या प्रयत्नाने अवघड गोष्टीही सहजशक्य होतात. विविध क्षेत्रांतील यशस्वी लोकांमध्ये अशा व्यक्तींचा समावेश असतो. भगवतगीता म्हणते, जो स्वत:च्या उद्धारासाठी, स्वत:च्या प्रगतीसाठी असतो त्यालाच ईश्वरही मदत करतो. झोपलेल्या सिंहाने नुसती शिकारीची कल्पना केली, तर पशू त्याच्या तोंडात आपोआप येऊन पडत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता आळसाच्या आहारी जाऊन केलेल्या मनोरथांनी कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातच विजयाची माळ पडते. उद्योगाच्या घरी ‘रिद्धीसिद्धी पाणी भरी’ हे वचन काही व्यक्तींनी खºया अर्थाने सार्थ केले आहे. प्रपंच असो वा परमार्थ, राजकारण असो वा समाजकारण, प्रयत्नांची आवश्यकता सर्वच क्षेत्रांत आहे. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, अंबानी या उद्योगपतींनी अविरत परिश्रम घेतले म्हणून लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली. कित्येक घरात वैभवलक्ष्मीचे व्रत केले जाते. या व्रताला आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची जोड असली तरच लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल. जर प्रयत्नच नसतील तर देवही काही करू शकत नाहीत, हे सत्य आहे. ‘यत्न तो देव जाणावा’ ही शिकवण समाजाला देण्यासाठी समर्थांनी अथक परिश्रम घेतले. भिक्षेच्या माध्यमातून घराघरात जाऊन ‘आलस्य अवघाच दवडावा, येत्न उदंडचि करावा’ असा संदेश दिला.- स.भ. मोहनबुवा रामदासी