शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

आलस्य दवडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:05 IST

आळशी लोक नेहमीच नशिबाला दोष देतात. आम्हाला संधी मिळाली तर मोठा पराक्रम करू, अशा वल्गना करण्यातच त्यांचा वेळ जातो. ...

आळशी लोक नेहमीच नशिबाला दोष देतात. आम्हाला संधी मिळाली तर मोठा पराक्रम करू, अशा वल्गना करण्यातच त्यांचा वेळ जातो. केवळ बोलाचा भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्षात काही करायचेच नाही. शिवाय समाजातील यशस्वी लोकांचा मत्सर करण्याची सवय अशा लोकांना जडते. आळसामुळे सोप्या गोष्टीही अवघड वाटू लागतात. अशाने त्यांच्या आयुष्यात त्यांना काहीच साध्य होत नाही. अपयश झेलतच ही आळशी मंडळी जगत असतात. याउलट उद्योगी लोकांचे असते. त्यांच्या प्रयत्नाने अवघड गोष्टीही सहजशक्य होतात. विविध क्षेत्रांतील यशस्वी लोकांमध्ये अशा व्यक्तींचा समावेश असतो. भगवतगीता म्हणते, जो स्वत:च्या उद्धारासाठी, स्वत:च्या प्रगतीसाठी असतो त्यालाच ईश्वरही मदत करतो. झोपलेल्या सिंहाने नुसती शिकारीची कल्पना केली, तर पशू त्याच्या तोंडात आपोआप येऊन पडत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता आळसाच्या आहारी जाऊन केलेल्या मनोरथांनी कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातच विजयाची माळ पडते. उद्योगाच्या घरी ‘रिद्धीसिद्धी पाणी भरी’ हे वचन काही व्यक्तींनी खºया अर्थाने सार्थ केले आहे. प्रपंच असो वा परमार्थ, राजकारण असो वा समाजकारण, प्रयत्नांची आवश्यकता सर्वच क्षेत्रांत आहे. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, अंबानी या उद्योगपतींनी अविरत परिश्रम घेतले म्हणून लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली. कित्येक घरात वैभवलक्ष्मीचे व्रत केले जाते. या व्रताला आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची जोड असली तरच लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल. जर प्रयत्नच नसतील तर देवही काही करू शकत नाहीत, हे सत्य आहे. ‘यत्न तो देव जाणावा’ ही शिकवण समाजाला देण्यासाठी समर्थांनी अथक परिश्रम घेतले. भिक्षेच्या माध्यमातून घराघरात जाऊन ‘आलस्य अवघाच दवडावा, येत्न उदंडचि करावा’ असा संदेश दिला.- स.भ. मोहनबुवा रामदासी