शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आलस्य दवडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:05 IST

आळशी लोक नेहमीच नशिबाला दोष देतात. आम्हाला संधी मिळाली तर मोठा पराक्रम करू, अशा वल्गना करण्यातच त्यांचा वेळ जातो. ...

आळशी लोक नेहमीच नशिबाला दोष देतात. आम्हाला संधी मिळाली तर मोठा पराक्रम करू, अशा वल्गना करण्यातच त्यांचा वेळ जातो. केवळ बोलाचा भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्षात काही करायचेच नाही. शिवाय समाजातील यशस्वी लोकांचा मत्सर करण्याची सवय अशा लोकांना जडते. आळसामुळे सोप्या गोष्टीही अवघड वाटू लागतात. अशाने त्यांच्या आयुष्यात त्यांना काहीच साध्य होत नाही. अपयश झेलतच ही आळशी मंडळी जगत असतात. याउलट उद्योगी लोकांचे असते. त्यांच्या प्रयत्नाने अवघड गोष्टीही सहजशक्य होतात. विविध क्षेत्रांतील यशस्वी लोकांमध्ये अशा व्यक्तींचा समावेश असतो. भगवतगीता म्हणते, जो स्वत:च्या उद्धारासाठी, स्वत:च्या प्रगतीसाठी असतो त्यालाच ईश्वरही मदत करतो. झोपलेल्या सिंहाने नुसती शिकारीची कल्पना केली, तर पशू त्याच्या तोंडात आपोआप येऊन पडत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता आळसाच्या आहारी जाऊन केलेल्या मनोरथांनी कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातच विजयाची माळ पडते. उद्योगाच्या घरी ‘रिद्धीसिद्धी पाणी भरी’ हे वचन काही व्यक्तींनी खºया अर्थाने सार्थ केले आहे. प्रपंच असो वा परमार्थ, राजकारण असो वा समाजकारण, प्रयत्नांची आवश्यकता सर्वच क्षेत्रांत आहे. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, अंबानी या उद्योगपतींनी अविरत परिश्रम घेतले म्हणून लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली. कित्येक घरात वैभवलक्ष्मीचे व्रत केले जाते. या व्रताला आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची जोड असली तरच लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल. जर प्रयत्नच नसतील तर देवही काही करू शकत नाहीत, हे सत्य आहे. ‘यत्न तो देव जाणावा’ ही शिकवण समाजाला देण्यासाठी समर्थांनी अथक परिश्रम घेतले. भिक्षेच्या माध्यमातून घराघरात जाऊन ‘आलस्य अवघाच दवडावा, येत्न उदंडचि करावा’ असा संदेश दिला.- स.भ. मोहनबुवा रामदासी