शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

लावूनी सरे अंगी देवचिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:10 IST

‘‘नको सांडू अन्न नको सेवू वन। चिंती नारायण सर्व भोगी।। नको गुंफो भोगी, नको पहो त्यागी । लावूनी सरे अंगी देवचिया।।

लावूनी सरे अंगी देवचियानारदांपासून सर्व ऋषी मुनी आणि साधूसंतांनी भक्तिमार्गाची चर्चा केली आहे. कलियुगात भगवद्प्राप्तीसाठी यज्ञयागाद्वारे साधनांचं तुलनेत भक्तिमार्ग अधिक सुलभ आहे, किंबहुना तो सर्वात सोपा मार्ग आहे. ‘‘तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी’’ असे संतांचे वचन आहे. प्रपंचाच्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला संसारी जीव परमार्थाबाबत मात्र उदासीन तरी दिसतो किंवा अज्ञानी तरी असतो. विषयांच्या रानात भरकटलेल्या प्रापंचिकांना जप, तप, व्रत, याग इ.साधने कळणार ही नाहीत आणि त्यांच्याकडून घडणारी नाहीत. देहाला कष्ट मात्र होतील.संत तुकाराम महाराज सांगतात,‘‘नको सांडू अन्न नको सेवू वन। चिंती नारायण सर्व भोगी।।नको गुंफो भोगी, नको पहो त्यागी । लावूनी सरे अंगी देवचिया।।विषयांच्या भोगात गुंतू नये आणि त्यागाच्या भानगडीतही पडू नये. आपण हे सर्व काही देवावर सोपवून, त्याचाच प्रसाद मानून त्यालाच अर्पण करावेत. नित्य कर्म करत असतांना त्याचे चिंतन सोडू नये. कामामध्ये काम काही म्हणा राम राम... असे संतांचे सांगणे आहे. आपले काम सोडून तीर्थयात्रा करण्यापेक्षा, जप- तप अनुष्ठान करण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेले कर्म चांगल्या रितीने करून ते र्ईश्वरार्पण कर, हीच खरी पूजा आणि हीच खरी भक्ती.तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्म कुसुमांची वीरा।पूजा केली होय अपारा। तोषा लागी....असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणूनच कांदा -मुळ्यात अन् लसूण मिरची कोथिंबिरीतही संत सावता महाराजांना विठ्ठलाचे दर्शन होते. आपला मळा सोडून पंढरपूरला जायची त्यांना गरज वाटत नाही. देवच त्यांच्या मळ्यात, पाना- फुलात अवतीर्ण होतो. ‘तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी। देवा तुझं येनं जानं वारा सांगे कानामधी’ असे बहिणाबाई म्हणतात ते यामुळेच.संतांनी सांगितलेल्या या भक्तीच्या वाटेवर आपली पाऊले पडतील तो सोन्याचा दिवस म्हणावा लागेल.पु.ल.देशपांडे यांचे एक प्रसिद्ध वाक्य आठवले. ‘जगात गाढवांची कमी नाही, तस्मात् तुम्ही कुंभार बना’’. असे कुंभारही आता बरेच आढळून येतात. संत तुकाराम महाराजांनी अशा दांभिक धर्ममार्तंडावर कोरडे ओढले आहेत.‘कथा करोनिया दावी प्रेमकळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ।।टिळा टोपी माळा देवाचे गबाळे। वागवी ओंगळ पोटासाठी।गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी । तयाचे अंतरी काम लोभ ।।कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे । प्रेमाविण डोळे गळताती ।।तुका म्हणे ऐसे भावेचे मविंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ।।परमार्थाच्या नावाने संसारचा साधणाऱ्या या स्वार्थी संधी साधूंना तुकोबाराय उघडे पाडतात. त्यासाठी तीक्ष्ण शब्दांची शस्त्रे करतात. लहान-थोरांची भीड बाळगत नाहीत. अशा तथाकथित पोटार्थी साधूंमुळे समाजाचे आणि परमार्थाचेही फार नुकसान होत असते. म्हणून खरा धर्म सांगण्यासाठी आम्ही वैकुंठाहून आलो, शिकवल्याप्रमाणे पोपटही बोलत असतो. ‘शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाही कोणा।।’यांचा सर्व पसारा केवळ लौकिकासाठी असतो. ‘दंभ करी सोंग मानावया जग। मुखे बोले त्याग मनी नाही ।। अशा दांभिकांपासून दूर राहणेच हिताचे आहे.- प्रा.सी.एस.पाटील, धरणगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव