शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

लावूनी सरे अंगी देवचिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:10 IST

‘‘नको सांडू अन्न नको सेवू वन। चिंती नारायण सर्व भोगी।। नको गुंफो भोगी, नको पहो त्यागी । लावूनी सरे अंगी देवचिया।।

लावूनी सरे अंगी देवचियानारदांपासून सर्व ऋषी मुनी आणि साधूसंतांनी भक्तिमार्गाची चर्चा केली आहे. कलियुगात भगवद्प्राप्तीसाठी यज्ञयागाद्वारे साधनांचं तुलनेत भक्तिमार्ग अधिक सुलभ आहे, किंबहुना तो सर्वात सोपा मार्ग आहे. ‘‘तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी’’ असे संतांचे वचन आहे. प्रपंचाच्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला संसारी जीव परमार्थाबाबत मात्र उदासीन तरी दिसतो किंवा अज्ञानी तरी असतो. विषयांच्या रानात भरकटलेल्या प्रापंचिकांना जप, तप, व्रत, याग इ.साधने कळणार ही नाहीत आणि त्यांच्याकडून घडणारी नाहीत. देहाला कष्ट मात्र होतील.संत तुकाराम महाराज सांगतात,‘‘नको सांडू अन्न नको सेवू वन। चिंती नारायण सर्व भोगी।।नको गुंफो भोगी, नको पहो त्यागी । लावूनी सरे अंगी देवचिया।।विषयांच्या भोगात गुंतू नये आणि त्यागाच्या भानगडीतही पडू नये. आपण हे सर्व काही देवावर सोपवून, त्याचाच प्रसाद मानून त्यालाच अर्पण करावेत. नित्य कर्म करत असतांना त्याचे चिंतन सोडू नये. कामामध्ये काम काही म्हणा राम राम... असे संतांचे सांगणे आहे. आपले काम सोडून तीर्थयात्रा करण्यापेक्षा, जप- तप अनुष्ठान करण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेले कर्म चांगल्या रितीने करून ते र्ईश्वरार्पण कर, हीच खरी पूजा आणि हीच खरी भक्ती.तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्म कुसुमांची वीरा।पूजा केली होय अपारा। तोषा लागी....असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणूनच कांदा -मुळ्यात अन् लसूण मिरची कोथिंबिरीतही संत सावता महाराजांना विठ्ठलाचे दर्शन होते. आपला मळा सोडून पंढरपूरला जायची त्यांना गरज वाटत नाही. देवच त्यांच्या मळ्यात, पाना- फुलात अवतीर्ण होतो. ‘तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी। देवा तुझं येनं जानं वारा सांगे कानामधी’ असे बहिणाबाई म्हणतात ते यामुळेच.संतांनी सांगितलेल्या या भक्तीच्या वाटेवर आपली पाऊले पडतील तो सोन्याचा दिवस म्हणावा लागेल.पु.ल.देशपांडे यांचे एक प्रसिद्ध वाक्य आठवले. ‘जगात गाढवांची कमी नाही, तस्मात् तुम्ही कुंभार बना’’. असे कुंभारही आता बरेच आढळून येतात. संत तुकाराम महाराजांनी अशा दांभिक धर्ममार्तंडावर कोरडे ओढले आहेत.‘कथा करोनिया दावी प्रेमकळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ।।टिळा टोपी माळा देवाचे गबाळे। वागवी ओंगळ पोटासाठी।गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी । तयाचे अंतरी काम लोभ ।।कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे । प्रेमाविण डोळे गळताती ।।तुका म्हणे ऐसे भावेचे मविंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ।।परमार्थाच्या नावाने संसारचा साधणाऱ्या या स्वार्थी संधी साधूंना तुकोबाराय उघडे पाडतात. त्यासाठी तीक्ष्ण शब्दांची शस्त्रे करतात. लहान-थोरांची भीड बाळगत नाहीत. अशा तथाकथित पोटार्थी साधूंमुळे समाजाचे आणि परमार्थाचेही फार नुकसान होत असते. म्हणून खरा धर्म सांगण्यासाठी आम्ही वैकुंठाहून आलो, शिकवल्याप्रमाणे पोपटही बोलत असतो. ‘शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाही कोणा।।’यांचा सर्व पसारा केवळ लौकिकासाठी असतो. ‘दंभ करी सोंग मानावया जग। मुखे बोले त्याग मनी नाही ।। अशा दांभिकांपासून दूर राहणेच हिताचे आहे.- प्रा.सी.एस.पाटील, धरणगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव