शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कृष्णा धाव आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 04:18 IST

ज्याच्या जवळ प्रत्यक्ष परमेश्वर आहे, त्याचे कोण काय वाकडे करू शकणार..!

- शैलजा शेवडेगोकूळवासी जनांनी श्रीकृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्राप्रीत्यर्थ करायचा यज्ञ केला नाही. त्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा केली, त्यासाठी यज्ञ केला. त्यामुळे अहंकारी इंद्राला अतिशय राग आला. त्या रागाच्या आवेशात त्याने प्रलय करणाऱ्या मेघांना गोकुळाचा नाश करण्याची आज्ञा दिली. त्या मेघांनी भयंकर वृष्टी करून गोकूळवासीयांना जर्जर केले. तेव्हा सर्व जण कृष्णाला शरण गेले. त्याची प्रार्थना केली..कृष्णा, कृष्णा, भक्तवत्सला, धाव धाव आता,दयाघना हे, रक्षी आम्हां, तूच तूच त्रातावज्राघाते, मेघ गरजती,कडकड, कडकड, विजा चमकती,अति भयंकर वादळवारे,संततधारे, जर्जर सारे,काय करावे, कोठे जावे, धाव धाव आता,दयाघना हे, रक्षी आम्हां, तूच तूच त्राता,मुसळासम या पाऊसधारा,गारपिटी करी पिसाट वारा,कुडकुडती ही गाई वासरे,बुडून गेली, घरे नी दारे,चरणी तुझिया आलो हरी रे, धाव धाव आता,दयाघना हे, रक्षी आम्हां, तूच तूच त्राता,पाणलोट ये, चारी दिशांनी,बुडत चालली, सारी अवनी,सूर्य दिसेना, तम हा दाटे,प्रलयकाळच आला वाटे,तुज्यावीण रे कोण वाचवी, धाव धाव आता,दयाघना हे, रक्षी आम्हां, तूच तूच त्रातागोकूळवासी जनांची ती आर्त प्रार्थना ऐकून कृष्ण समजला, इंद्राला गर्व झाला आहे, गर्वहरण करायला पाहिजे. म्हणून त्याने एखादे लहान मूल पावसाळ्यात आलेली कुत्र्याची छत्री (मश्रूम) जसे सहजपणे उखडते, तितक्या सहजपणे गोवर्धन पर्वत उचलला; आणि गोकूळवासीयांना त्याखाली आश्रयाला यायला सांगितले. सात दिवस रागावलेला इंद्र तुफान पावसाचा मारा करत होता. पण कृष्णाने योगमायेने सर्वांना गोवर्धन पर्वताखाली सुखरूप ठेवले. हे पाहून इंद्राचे गर्वहरण झाले. तो कृष्णाला शरण आला. वर्षाव थांबवला. कृष्णाने मग सर्वांना पर्वताच्या खालून बाहेर यायला सांगितले. सर्वांनी कृष्णाचा जयजयकार केला. अतिशय आनंदाने कृष्णाला जवळ घेतले, आशीर्वाद दिले. त्याची लीला वर्णन करणारी गाणी गायली. देवांनी त्याच्यावर पुष्पवर्षाव केला. गोपीजनांनी त्याची मिरवणूक काढली. ज्याच्या जवळ प्रत्यक्ष परमेश्वर आहे, त्याचे कोण काय वाकडे करू शकणार..!

टॅग्स :spiritualअध्यात्मिक