शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जे स्वरुपगत आहे ते सुख देते तर आगंतुक आहे ते दु:ख देते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 19:25 IST

पाहुणा कितीही चांगला असला तरी तो किती दिवस घरात राहावा वाटतो ?

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

जगातील यच्चयावत प्राणीमात्राला सुखच आवडते, दु:ख कुणालाही नको असते. संत म्हणतात- मजलागी दु:ख व्हावे । ऐसे कोणी भाविना जीवे ॥ आपल्याला तरी सुख का आवडते..? आणि दु:ख का आवडत नाही..? याचे कारण संत सांगतात, मुळात जीव हा सुखरुपंच आहे म्हणून जीवाची ओढ सुखाकडेच आहे. जे स्वरुपगत असते ते आवडते व जे आगंतुक असते, ते नको वाटते. सुख स्वरुपगत आहे, दु:ख आगंतुक आहे, म्हणून प्रत्येकाची धाव सुखाकडेच आहे. आपल्या मूळच्या स्वरुपाकडेच प्रत्येकाची धाव आहे. दु:ख का जावे वाटते..? तर ते आगंतुक आलेले असते. पाहुणा कितीही चांगला असला तरी तो किती दिवस घरात राहावा वाटतो..? व मुलगा कसाही असला तरी घरातून जावा, असे वाटते का..? कारण काय तर मुलगा हा स्वरुपगत आहे व पाहुणा हा आगंतुक आहे. स्वरु पगत आहे ते राहिलेच पाहिजे व आगंतुक आहे ते गेलेच पाहिजे. याचे कारण स्वरुपगत आहे ते सुख देते व आगंतुक आहे ते दु:ख देते. हा जीव परमेश्वराचा अंश आहे व परमात्माच सुखरु प आहे. संत म्हणतात सुखरुप ऐसा दुजा कोण सांगा ।माझ्या पांडुरंगा सारिखा तो ॥म्हणून जीवाची ओढ सुखाकडेच आहे. दु:ख हे आगंतुक आलेले आहे, ते नको वाटते. वेदांतशास्त्रात एक उदाहरण आलेले आहे. साळू नावाचा एक प्राणी असतो. या प्राण्याच्या अंगावर दाभणाएवढे मोठे काटे असतात. शत्रूपासून वाचण्याकरिता परमेश्वराने केलेली ती व्यवस्था आहे. त्या साळूवर एखाद्याने आक्र मण केले की तो आपले शरीर फुगवतो मग ते अंगावरचे काटे बाणासारखे सुटतात व समोरच्या प्राण्याला इजा करतात. असा हा अंगावर काटे असणारा प्राणी अरण्यात फिरतांना टाचणी एवढा काटा जरी याला रु तला तरी त्याला तो सलत राहतो. टाचणीएवढा काटा शरीरातून जावा वाटतो व दाभणाएवढा काटा शरीरावर राहावा वाटतो कारण काय तर, स्वरु पगत असते ते राहावे वाटते व आगंतुक आलेले जावे वाटते.

एखादा नास्तिक देव मानणार नाही परंतु त्याला सुख हवे वाटते आणि दु:ख नको वाटते. पण सुख पाहिजे म्हणून ते मिळणार नाही आणि दु:ख नको म्हणून टळणार नाही. त्यासाठी कर्म चांगले करावे लागेल. सुख आणि  दु:ख आपल्याच कर्माचा भोग आहे. या जगात जिथे सुखाची प्राप्ती आहे तिथे जीव कधी जात नाही व जिथे दु:ख आहे तिथे गेल्याशिवाय राहात नाही. वाईट कर्माने दु:ख प्राप्त होते. मनुष्य वाईट कर्म केल्याशिवाय राहात नाही व चांगल्या कर्माचे फळ सुख आहे. मनुष्य चांगले कर्म कधी करीत नाही. म्हणून दु:ख कधीही टळत नाही...! 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र. मोबाईल क्र. 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक