शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २४, आजार असतो एकाला व बेजार होतात सगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 07:00 IST

विज्ञानाचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे तरीही अध्यात्माच्या नावाखाली, परमार्थाच्या नावाखाली लोक विज्ञानाकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्म एके अध्यात्म, परमार्थ एके परमार्थ हे जीवनविद्येला मुळीच मान्यच नाही.

ठळक मुद्देगंमत अशी की माणसाच्या ठिकाणी असलेली ही बुध्दी किती आहे याची माणसालाच कल्पना नाही.सायन्स असे सांगते की माणूस त्याच्या ठिकाणी असलेल्या बुध्दीचा वापर अर्धा टक्का सुध्दा करत नाही.जगातला हुशारातला हुशार माणूस सुध्दा मेंदूचा वापर फक्त दहा टक्के करतो

- सदगुरू श्री वामनराव पैविज्ञानाचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे तरीही अध्यात्माच्या नावाखाली, परमार्थाच्या नावाखाली लोक विज्ञानाकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्म एके अध्यात्म, परमार्थ एके परमार्थ हे जीवनविद्येला मुळीच मान्यच नाही. जीवनविद्या असे सांगते माणसाच्या ठिकाणी जी बुध्दी आहे तिची शक्तीही इतकी प्रचंड आहे की त्या बुध्दीच्या शक्तीची माणसाला कल्पनाच नाही हे आणखी एक आर्श्चय आहे. गंमत अशी की माणसाच्या ठिकाणी असलेली ही बुध्दी किती आहे याची माणसालाच कल्पना नाही. सायन्स असे सांगते की माणूस त्याच्या ठिकाणी असलेल्या बुध्दीचा वापर अर्धा टक्का सुध्दा करत नाही. अत्यंत बुध्दीमान माणसे जसे की आईनस्टाईन,न्यूटन, आपल्या देशातील लोकमान्य टिळक हे केवढे मोठे व्यक्तिमत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, पूर्वीच्या काळातले शिवाजी महाराज,आर्य चाणक्य हया मंडळींनी सुध्दा आपल्या आयुष्यात बुध्दीचा वापर केला तो केवळ दहा टक्के असे विज्ञान सांगते. जगातला हुशारातला हुशार माणूस सुध्दा मेंदूचा वापर फक्त दहा टक्के करतो आणि सामान्य माणसे आपल्या बुध्दीचा वापर अर्धा टक्का सुद्धा करत नाहीत. म्हणूनच जगात हाफ मॅड लोकांची संख्या जास्त आहे असे म्हणतात ती अगदीच काही अतिशयोक्ती नाही. कारण जीवन जगताना बुध्दीचा वापर करणे ही जी गोष्ट आहे ती लोक खंरतर करतच नाहीत. काही लोकांकडे पाहिले तर यांच्याकडे मेंदू नावाची गोष्ट आहे की नाही असा हा प्रश्न पडतो. जगात दु:ख आहे याचे कारण संसार,बायकामुले नाहीत तर हाफ मॅड म्हणजे अर्धा शहाणा व अर्धा मूर्ख माणूस हेच जगाच्या दु:खाचे कारण आहे. ही हाफ मॅड माणसे पूर्णपणे शहाणी झाल्याशिवाय हे जग सुखी होणे शक्य नाही. हे जग सुखी व्हायला पाहिजे म्हणजे अखिल मानव जात सुखी व्हायला पाहिजे असेल तर केवळ तुम्ही आम्ही सुखी होवून चालणार नाही तर आपण सर्वच सुखी झालो पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देतो की घरातील एक माणूस जर आजारी पडला तर घरातील सर्वच माणसे बेजार होतात. आजार असतो एकाला व बेजार होतात सगळे. असे का होते कारण एकाचे सुखदु:ख हे सर्वांचेच सुखदु:ख असते. जी गोष्ट घराची, तीच गोष्ट समाजाची, तीच गोष्ट राष्ट्राची, तीच गोष्ट विश्वाची म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहूना चराचर आपणची जाहला” हे विश्व आपले घर आहे.अशी संकल्पना इतर कुठल्या संस्कृतीत, इतर कुठल्या देशात आहे का? आपल्या भारतीय संस्कृतीत मात्र ही सुंदर संकल्पना आहे की हे विश्व आपले घर आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत आपण सर्व बंधू आहोत. ही संकल्पना जर जगात राबवली गेली तर जगात सुखच सुख निर्माण होईल.