शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मजेत जगावं कसं..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 22:03 IST

एकच गोष्ट अशी आहे जी, एकदा हातातून निसटली की ती कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. ते म्हणजे आपलं " आयुष्य.. "

आपण संपलो की दुनिया आपल्यासाठी संपलेली असते. म्हणून जोवर आपले अस्तित्व आहे . तोवर आनंदी रहा व स्वत : वर प्रेम करा , जोवर आपण स्वत : वर प्रेम करू शकणार नाही तोपर्यंत इतरांविषयी आपल्या मनातील प्रेमाची स्पंदने उत्पन्नच होऊ शकणार नाही . " आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून ? " आनंदी रहावयास शिकणे मग परिस्थिती कशी का असेना , ती एक साधनाच आहे . सर्व ऐश्वर्य पायाशी लोळत असताना दुःखी - कष्टी - उदास चेहरे असलेली जोडपी याउलट हातावरचे पोट असलेली सायकलवर डबलसीट जाणारी - हसतमुख जोडपी मी पाहिलेली आहे . देवाने आपल्याला जे काही दिले आहे ते आपल्याच कर्माचे फळ आहे . मग सुख असू द्या वा दुःख असू द्या . दोन्हीही ( अनित्य ) बदलणारे तर आहेत म्हणून दोन्ही परिस्थितीत मन संतुलित ठेवा व आनंदाने जगा . आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते गेलं , या क्षणापासून दिलखुलास जगा . " झाड लावायची सर्वोत्तम वेळ याक्षणीच आहे " ही चिनी म्हण तुम्हाला माहीत असेलच . परवाच जाताना दुकानावर गांधी शेठ भेटले , आज सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता ऐकली , हृदयविकाराने त्यांना देवाज्ञा झाली होती . मृत्यू कधी झडप टाकील माहित नाही . पुढचा प्रवास आपल्या हातात नाही माणसाचे सगळं आयुष्यच गुढ आहे . म्हणून भूतकाळ व भविष्यकाळ - सोडून वर्तमानात आनंदाने जगा , तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढे या . प्रेमाच्या माणसांसमोर आपल्या भावना व्यक्त करा . कुटुंबाबरोबर सहलीला जा . सुट्टी काढून कुटुंबाबरोबर गतकाळातील चांगल्या स्मृतींना उजाळा देऊन आपल्या लाडक्या लेकीला जवळ घ्या , आपल्या प्रिय पत्नीला पहिल्यांदा फिरायला घेऊन गेलात तेव्हा जसा तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून वाऱ्याने उडणान्या तिच्या केसांचे , बटांचे कौतुकाने निरिक्षण करत होता , त्याची पुनरावृत्ती करा . सांगा तिला मनापासून , तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे ते . आपल्या आई - वडिलांच्या जवळ बसून आपल्या हाताने त्यांना गोडबोड खाऊ घाला . आज मी जे काय आहे ते तुमच्या दोघांमुळेच असे कृतज्ञतेचे शब्द उच्चारत त्यांच्या चरणाला स्पर्श करा . आपल्या कृतज्ञतेने त्यांच्या डोळयातील आनंदाना वाट मोकळी करून या . आपली चित्रपट पाहण्याची , पुस्तके वाचण्याची , नाटक बघण्याची इच्छा मनसोक्त पूर्ण करून घ्या , कुटुंबाला डिजनी लँड मध्ये घेऊन जा , भरपूर नाचा , पोहण्याची मनसोक्त इच्छा पूर्ण करा , त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना घेऊन द्या . मुलांबरोबर , नातवंडाबरोबर खेळा , बागडा , नातीगोती घट्ट करण्यासाठी पुढाकार घ्या . एखादया कलेसाठी वेड होऊन जा त्यातला आनंद उपभोगा , सर्वत्र प्रेमाचा अविष्कार करा . हजारो मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती फक्त प्रेमातच आहे , . रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर थांबून आपल्या डोळ्यात डोळे घालून स्वतःला आय लव्ह यु असे दहावीस वेळा म्हणा .. जगात सगळ्यात महागडा बिछाना कुठला ? तर तो आजारपणाचा बिछाना होय . आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्याने मिळतो , सेवेसाठी नोकर मिळतात , पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही नेमु शकत नाही . प्रेम - निस्सीम प्रेम आजारपणाला आपल्यापासून दूर ठेवते , हरवलेल्या वस्तू सापडू शकतात , पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली ती कोणत्याही उपायानं ती पुन्हा मिळू शकत नाही ते म्हणजे आपलं " आयुष्य " . कुटूंबावर , नातलगांवर , मित्रमैत्रिणीवर , शेजाऱ्यांवर मनसोक्त प्रेमाची उधळण करा . पहा मग समोरून तुम्हाला प्रेमाचीच झुळूक येईल , या प्रेममय वाऱ्याच्या झोतात जीवनरूपी हृदयात हिरवीगार बाग फुललेली तुम्हाला दिसेल . जीवन खूप सुंदर आहे . त्यावर खुप प्रेम करा व आनंदाने जगा..

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक