शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मजेत जगावं कसं..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 22:03 IST

एकच गोष्ट अशी आहे जी, एकदा हातातून निसटली की ती कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. ते म्हणजे आपलं " आयुष्य.. "

आपण संपलो की दुनिया आपल्यासाठी संपलेली असते. म्हणून जोवर आपले अस्तित्व आहे . तोवर आनंदी रहा व स्वत : वर प्रेम करा , जोवर आपण स्वत : वर प्रेम करू शकणार नाही तोपर्यंत इतरांविषयी आपल्या मनातील प्रेमाची स्पंदने उत्पन्नच होऊ शकणार नाही . " आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून ? " आनंदी रहावयास शिकणे मग परिस्थिती कशी का असेना , ती एक साधनाच आहे . सर्व ऐश्वर्य पायाशी लोळत असताना दुःखी - कष्टी - उदास चेहरे असलेली जोडपी याउलट हातावरचे पोट असलेली सायकलवर डबलसीट जाणारी - हसतमुख जोडपी मी पाहिलेली आहे . देवाने आपल्याला जे काही दिले आहे ते आपल्याच कर्माचे फळ आहे . मग सुख असू द्या वा दुःख असू द्या . दोन्हीही ( अनित्य ) बदलणारे तर आहेत म्हणून दोन्ही परिस्थितीत मन संतुलित ठेवा व आनंदाने जगा . आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते गेलं , या क्षणापासून दिलखुलास जगा . " झाड लावायची सर्वोत्तम वेळ याक्षणीच आहे " ही चिनी म्हण तुम्हाला माहीत असेलच . परवाच जाताना दुकानावर गांधी शेठ भेटले , आज सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता ऐकली , हृदयविकाराने त्यांना देवाज्ञा झाली होती . मृत्यू कधी झडप टाकील माहित नाही . पुढचा प्रवास आपल्या हातात नाही माणसाचे सगळं आयुष्यच गुढ आहे . म्हणून भूतकाळ व भविष्यकाळ - सोडून वर्तमानात आनंदाने जगा , तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढे या . प्रेमाच्या माणसांसमोर आपल्या भावना व्यक्त करा . कुटुंबाबरोबर सहलीला जा . सुट्टी काढून कुटुंबाबरोबर गतकाळातील चांगल्या स्मृतींना उजाळा देऊन आपल्या लाडक्या लेकीला जवळ घ्या , आपल्या प्रिय पत्नीला पहिल्यांदा फिरायला घेऊन गेलात तेव्हा जसा तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून वाऱ्याने उडणान्या तिच्या केसांचे , बटांचे कौतुकाने निरिक्षण करत होता , त्याची पुनरावृत्ती करा . सांगा तिला मनापासून , तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे ते . आपल्या आई - वडिलांच्या जवळ बसून आपल्या हाताने त्यांना गोडबोड खाऊ घाला . आज मी जे काय आहे ते तुमच्या दोघांमुळेच असे कृतज्ञतेचे शब्द उच्चारत त्यांच्या चरणाला स्पर्श करा . आपल्या कृतज्ञतेने त्यांच्या डोळयातील आनंदाना वाट मोकळी करून या . आपली चित्रपट पाहण्याची , पुस्तके वाचण्याची , नाटक बघण्याची इच्छा मनसोक्त पूर्ण करून घ्या , कुटुंबाला डिजनी लँड मध्ये घेऊन जा , भरपूर नाचा , पोहण्याची मनसोक्त इच्छा पूर्ण करा , त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना घेऊन द्या . मुलांबरोबर , नातवंडाबरोबर खेळा , बागडा , नातीगोती घट्ट करण्यासाठी पुढाकार घ्या . एखादया कलेसाठी वेड होऊन जा त्यातला आनंद उपभोगा , सर्वत्र प्रेमाचा अविष्कार करा . हजारो मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती फक्त प्रेमातच आहे , . रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर थांबून आपल्या डोळ्यात डोळे घालून स्वतःला आय लव्ह यु असे दहावीस वेळा म्हणा .. जगात सगळ्यात महागडा बिछाना कुठला ? तर तो आजारपणाचा बिछाना होय . आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्याने मिळतो , सेवेसाठी नोकर मिळतात , पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही नेमु शकत नाही . प्रेम - निस्सीम प्रेम आजारपणाला आपल्यापासून दूर ठेवते , हरवलेल्या वस्तू सापडू शकतात , पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली ती कोणत्याही उपायानं ती पुन्हा मिळू शकत नाही ते म्हणजे आपलं " आयुष्य " . कुटूंबावर , नातलगांवर , मित्रमैत्रिणीवर , शेजाऱ्यांवर मनसोक्त प्रेमाची उधळण करा . पहा मग समोरून तुम्हाला प्रेमाचीच झुळूक येईल , या प्रेममय वाऱ्याच्या झोतात जीवनरूपी हृदयात हिरवीगार बाग फुललेली तुम्हाला दिसेल . जीवन खूप सुंदर आहे . त्यावर खुप प्रेम करा व आनंदाने जगा..

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक