शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोहाच्या क्षणी स्वत:ला कसं सांभाळाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 04:07 IST

आकर्षणाच्या मोहापासून जे स्वत:ला सांभाळून घेतात ते सहसा त्या जाळ्यात अडकत नाहीत.

- विजयराज बोधनकरहा एक मोठा प्रश्न आहे की, जगायचं कसं? सांभाळून की भाळून... या तंत्रयुगात मोहात पाडणारे, आकर्षित करणारे क्षण आयुष्यात रोज नव्याने येतात आणि त्यावर भाळून जाण्याचेही प्रसंग येतात, यात जे भाळले जातात ते अनाठायी गुंततच जातात आणि शेवटास शून्य त्यांच्या हाती लागतं. याउलट आकर्षणाच्या मोहापासून जे स्वत:ला सांभाळून घेतात ते सहसा त्या जाळ्यात अडकत नाहीत. विश्वामित्र मेनकेवर भाळला आणि तपाचं सामर्थ्य घालवून बसला. मेनका हे आकर्षण आणि मोहाचं प्रतीक आहे.आज मोहवणारी अनेक माध्यमं आपल्या डोक्यावर क्षणाक्षणाला आदळत राहतात. टीव्हीवरील भुलवणाऱ्या जाहिराती, भडक मालिका, अस्वस्थ करणाऱ्या बातम्या, वासना उद्दीपित करणारे सिनेमे व वेबमालिका, वृत्तपत्रातल्या चकवणाऱ्या अनेक जाहिराती, व्हॉट्सअ‍ॅपचा विळखा, फेसबुकवरचे अनेक अस्वस्थ करणारे व्हिडीओ अशा अनेक गोष्टी आज विळखा घालून बसल्यात. याही पलीकडे ग्राहकराजाला पूर्णपणे जायबंदी करण्याची अनेक षड्यंत्रं रोज नव्याने रचली जातात आणि यावर हळवी आणि अज्ञानी माणसं भाळतात. परंतु ज्याला आपली गरज आणि वस्तुस्थितीची नेमकी माहिती असते तो स्वत:ला सांभाळून घेतो, या खोट्या पिंजऱ्यात अडकत नाही. अशी माणसं खरोखरच दूरदृष्टीची असतात, याचं कारण म्हणजे त्यांच्यावर झालेले पक्के संस्कार.उत्तम जगण्यासाठी ज्या माणसाकडे अढळ सशक्त विचार करण्याची क्षमता असते तो कुठल्याही लोंढ्यात वाहून जाऊच शकत नाही. खोट्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत राहण्यासाठी आणि मृगजळावर मात करण्यासाठीच संतश्रेष्ठ श्री तुकाराम, ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराज अशांच्या मार्मिक साहित्याचं एक जरी पान रोज वाचलं तरी आपल्या शाश्वत अस्तित्वाला कुणीही ओढून नेऊ शकत नाही. भाळण्यावरचं हेच एकमेव औषध आहे. या संत मंडळीचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक