शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अरे संसार-संसार, खोटा कधी म्हणू नये ।

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 01:14 IST

संंसारिक माणसांचे एक साधे स्वप्न असते की, संसाराच्या वाटेवरून चालता चालता हात रक्तबंबाळ झाले तरी मला समजावून घ्या!

- प्रा. शिवाजीराव भुकेलेएक सांसारिक माणूस म्हणून, या संसाराबद्दल साधू-संतांचे काय विचार आहेत, हे ऐकायला मी कधी-कधी एखाद्या कथा-कीर्तनाला आणि एखाद्या संन्याशाच्या सत्संगालाही जातो अन् या विरक्तीची वल्कले धारण केलेल्या मंडळींचे विचार माझ्यासहित लाखो भक्तगण माना डोलावत ऐकू लागतात. हा संसार म्हणजे विस्तवाचे अंथरूण. हा संसार म्हणजे रोहिणीचे मृगजळ. हा संसार म्हणजे केवळ काल्पनिक जगतातला स्वप्नमय खेळ, जो स्वत:च स्वत:वर स्वार होतो, त्याला संसार म्हणतात, एवढेच नव्हे तर त्यासाठी संतांच्या विशिष्ट मनोभूमिकेचे प्रमाण देताना ही मंडळी म्हणू लागतात -संसार दु:ख मूळ चोहीकडे इंगळविश्रांती नाही कोठे रात्रंदिस तळमळ ।काम क्रोध लोभसुनी पाठी लागले ओढाळहे सारे विचार ऐकले की वाटायला लागते अरे! वेड्या, उंबरातील किडेमकोड्यांनी उंबरातच लीला कराव्यात आणि मरून जावे तसे तुझे आयुष्य फुकट गेले आहे. पण लगेच आतला आवाज साद घालू लागतो. अरे! ज्याने गूळ कधी खाल्लाच नाही तो कसा सांगू शकतो गूळ किती गोड आहे अन् किती आंबट आहे. खादल्याची गोडी कधी देखिल्यास येत नाही. तद्वत संसाराच्या काठावर उभे राहून संसार न करताच तो किती दु:खाचे मूळ आणि अनार्थाचे महाद्वार आहे, हे न अनुभवलेले अर्धसत्य ही मंडळी अगदी डांगोरा पिटवून छातीठोकपणे कसे सांगू शकतात? अरे! तुमच्यासारख्या लाखो संसाराला सात्त्विक अधिष्ठान देताना आमचे तुकोबा पांडित्याच्या कलाकुसरीशिवाय सरळ-सरळ सांगतात...आपुलीया हिता जों असे जागताधन्य माता-पिता तयाचिया ।कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विकतयांचा हरिख वाटे देंवा ।

संंसारिक माणसांचे एक साधे स्वप्न असते की, संसाराच्या वाटेवरून चालता चालता हात रक्तबंबाळ झाले तरी मला समजावून घ्या! केविलवाणा आक्रोश कुणाकडेही न करता आपल्याच संसाराच्या वेलीवर कर्तृत्ववान फुले फुलवायची अर्थात मुलामुलींनी पूर्वजांचे पोवाडे गाण्यापेक्षा स्वकर्तृत्वाने वाडवडिलांचे महत्त्व वाढवावे. त्यांना स्वार्थाच्या बाजारात रडणाऱ्या पामरांप्रमाणे भौतिक हित नाही समजले तरी चालेल, परंतु सात्त्विक विचारांच्या पणत्या आपल्या घरात तेवत राहाव्यात, अशा या सात्त्विक विचारांचे संवर्धन साधूसंत, बुवा-बैरागी यांच्या सत्संगाच्या मेळाव्यातून होते की नाही हे मला माहीत नाही, पण आपल्या लेकरांसाठी आयुष्याची बाजी लावून देवघरासमोर वाती वळणाºया आईच्या चेहºयातून मात्र सात्त्विक विचाराचे संवर्धन अवश्य होते. तर वरून कठोर दिसणाºया परंतु आतून संस्कारसंपन्नतेची बेटे निर्माण करणाºया बापाची एकच इच्छा असते, ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा.’ म्हणून हा संसार अतिशय गोमटा म्हणून तेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भोगू नये आणि ओखटा म्हणून त्यागू नये. किती सोपे आणि पचणारे संसारिकाचे तत्त्व आहे ना! जर संसाराला सात्त्विक विचारांचे, शुद्ध आचाराचे आणि स्वकर्म कुसुमांचे अधिष्ठान दिले की संसारसुद्धा स्वानंदाच्या कंदातील महासागर होतो. म्हणून संसाराला कधी छोटाही म्हणू नये अन् कधी खोटाही म्हणू नये. याचे रसाळ विवेचन करताना बहिणाबाई म्हणतात -अरे संसार-संसार,खोटा कधी म्हणू नये ।देवळाचे कळसालालोटा कधी म्हणू नये ॥

टॅग्स :spiritualअध्यात्मिक