शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

छळतो या तना..श्रावण देतसे हास्य... अन् उल्हसितसे मना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 16:03 IST

कवितेतला श्रावण

‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’....    बालकवींच्या या ओळी श्रावणातल्या सुंदर सुंदर हरित छटांचे दर्शन घडवितात. निसर्गाच्या अनेक आविष्कारातील खास आविष्कार म्हणजे मनभावन श्रावण होय.‘आषाढातला उदास वारा छळतो या तनाश्रावण देतसे हास्य अन् उल्हसितसे मना’    आषाढातील उदासीनतेमुळे धीरगंभीर झालेल्या चेहºयावर जणू आनंद आणू पाहणाºया या श्रावणातील चैतन्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. आषाढातल्या पुनर्वसूच्या रिपरिपमुळे आणि म्हाताºया पुष्याच्या तुषार सिंचनाने ओलीचिंब झालेली धरा श्रावणातल्या नवसरींमुळे आणखी आनंदाने बाळसे धरू लागते. झुळझुळ वाहणाºया अवखळ पण निखळ मनाच्या झºयांमुळे, मंद पण शरीरावर शिरशिरी आणणाºया झुळूकामुळे मनात मखमली तरंग खुलवणाºया श्रावणाचा आनंद अनुभवण्याचे भाग्यच निराळे. काळ्याकुट्ट डोंगरावर फुलणाºया 'हरित तृणांच्या मळा' पाहण्याचा आल्हाददायी क्षण श्रावणातच उगम पावतात.पठारावर रंग व गंध बरसणाºया फुलांची किमया श्रावणातच सर्वाधिक पहायला मिळते.‘रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनूचे असतीआनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती’     श्रावणातल्या ऊन पावसाच्या खेळामुळे पूर्वेकडे मन आकर्षून घेणाºया इंद्रधनूमुळे प्रत्येकाच्या मनात रंगांच्या उकळ्या फुटतात. इंद्रधनुष्यातील सात रंगही श्रावणाचे महत्त्व सांगताना उल्हासित होऊन जातात. ‘उगवतीला उधळणारा सोनेरी पिवळा रंग मावळतीला तांबडा होऊन अंधारात विरघळून जातो,  त्याप्रमाणेच आपले जीवन आहे. निळ्या आकाशात काळे ढग भरले की, काळी आई हिरवळीने प्रफुल्लित होते मग आपल्या जीवनात आनंदाचे मोरपंख नाचू लागतात आणि या सर्व दैवी (अलौकिक) चमत्कारापुढे आपण नतमस्तक होतो. निसर्गाची निर्मळता पांढºयाशुभ्र रंगाप्रमाणे प्रांजळ आहे. त्यातच सर्वांचे मूळ लपून आहे.’ अशाप्रकारे अंतिम सत्य इंद्रधनूतून कदाचित प्रकटित होत असेल.‘काल स्वप्नात माझ्यामेला वैशाख जळालाकाळ्या आईच्या पोटूनहिरवा श्रावण फुलला’     वैशाख वणव्यातील दाहकता सहन करून मृगाच्या थेंबाने मोकळ्या झालेल्या मातीत जीव ओतून नवीन अंकुराला जन्म देणाºया ग्रामीण जीवनातील सर्वात मोठा कलाकार म्हणजे शेतकरी, सगळ्या जगाचा पोशिंदा होय. याच पोशिंद्याचे श्रावणापूर्वी पेरलेल्या 'बी'चे नवरूप पाहून मन हरखून जाते. त्या नवपालवीच्या क्षणांना पाहून त्याला धन्यता वाटते. पुष्याच्या हळूवार स्पर्शाने जमिनीवर पसरलेल्या चिखलाची दलदल धुऊन काढायला, आषाढाच्या अखेरीस पसरलेली दुर्गंधी दूर करण्यासाठी धावून येणाºया आश्लेष्याच्या श्रावण सरींमुळे माणसाच्या मनात साचलेले पापकर्मही धुवून निघतात.  ‘मघा’रूपातील सासूंच्या व ‘पूर्वा फाल्गुनी’ रूपातील सुनांच्या सरींमुळे वातावरणात आणखी वेगळेपणा येऊ लागतो.श्रावण देतो उमेद नवनिर्माणाचे छंदकार्यात चेतना अन्भरारी घेण्या स्वछंद     श्रावणाचा आनंद केवळ मानवालाच होतो असं नाही. झाडे, वेली, पशुपाखरे साºयांना श्रावण हर्षोल्लित करत असतो. चिखलात पाय रूतल्याने माणसाच्या हव्यासाची शिकार होऊ शकतो याची भीती असूनही रानोमाळ विहरणाºया हरणांना, सशाला पाहून मन गलबलून आल्याशिवाय राहत नाही. आपल्या मधूर स्वराने गाणे गात अवघी सृष्टी किलबिलाटाने जीवंत ठेवणाºया पाखरांचा आनंद गगनात मावेनासा होतो. एवढे दिवस बंद कळ्यात बंदीवान असलेल्या गंधाला मुक्त उधळणाºया सुमनांच्या प्रांजळ मनाचेही देखावे याच दिवसात अधिक प्रकर्षाने जाणवतात.-आनंद घोडके

टॅग्स :SolapurसोलापूरShravan Specialश्रावण स्पेशलAdhyatmikआध्यात्मिक