शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

छळतो या तना..श्रावण देतसे हास्य... अन् उल्हसितसे मना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 16:03 IST

कवितेतला श्रावण

‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’....    बालकवींच्या या ओळी श्रावणातल्या सुंदर सुंदर हरित छटांचे दर्शन घडवितात. निसर्गाच्या अनेक आविष्कारातील खास आविष्कार म्हणजे मनभावन श्रावण होय.‘आषाढातला उदास वारा छळतो या तनाश्रावण देतसे हास्य अन् उल्हसितसे मना’    आषाढातील उदासीनतेमुळे धीरगंभीर झालेल्या चेहºयावर जणू आनंद आणू पाहणाºया या श्रावणातील चैतन्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. आषाढातल्या पुनर्वसूच्या रिपरिपमुळे आणि म्हाताºया पुष्याच्या तुषार सिंचनाने ओलीचिंब झालेली धरा श्रावणातल्या नवसरींमुळे आणखी आनंदाने बाळसे धरू लागते. झुळझुळ वाहणाºया अवखळ पण निखळ मनाच्या झºयांमुळे, मंद पण शरीरावर शिरशिरी आणणाºया झुळूकामुळे मनात मखमली तरंग खुलवणाºया श्रावणाचा आनंद अनुभवण्याचे भाग्यच निराळे. काळ्याकुट्ट डोंगरावर फुलणाºया 'हरित तृणांच्या मळा' पाहण्याचा आल्हाददायी क्षण श्रावणातच उगम पावतात.पठारावर रंग व गंध बरसणाºया फुलांची किमया श्रावणातच सर्वाधिक पहायला मिळते.‘रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनूचे असतीआनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती’     श्रावणातल्या ऊन पावसाच्या खेळामुळे पूर्वेकडे मन आकर्षून घेणाºया इंद्रधनूमुळे प्रत्येकाच्या मनात रंगांच्या उकळ्या फुटतात. इंद्रधनुष्यातील सात रंगही श्रावणाचे महत्त्व सांगताना उल्हासित होऊन जातात. ‘उगवतीला उधळणारा सोनेरी पिवळा रंग मावळतीला तांबडा होऊन अंधारात विरघळून जातो,  त्याप्रमाणेच आपले जीवन आहे. निळ्या आकाशात काळे ढग भरले की, काळी आई हिरवळीने प्रफुल्लित होते मग आपल्या जीवनात आनंदाचे मोरपंख नाचू लागतात आणि या सर्व दैवी (अलौकिक) चमत्कारापुढे आपण नतमस्तक होतो. निसर्गाची निर्मळता पांढºयाशुभ्र रंगाप्रमाणे प्रांजळ आहे. त्यातच सर्वांचे मूळ लपून आहे.’ अशाप्रकारे अंतिम सत्य इंद्रधनूतून कदाचित प्रकटित होत असेल.‘काल स्वप्नात माझ्यामेला वैशाख जळालाकाळ्या आईच्या पोटूनहिरवा श्रावण फुलला’     वैशाख वणव्यातील दाहकता सहन करून मृगाच्या थेंबाने मोकळ्या झालेल्या मातीत जीव ओतून नवीन अंकुराला जन्म देणाºया ग्रामीण जीवनातील सर्वात मोठा कलाकार म्हणजे शेतकरी, सगळ्या जगाचा पोशिंदा होय. याच पोशिंद्याचे श्रावणापूर्वी पेरलेल्या 'बी'चे नवरूप पाहून मन हरखून जाते. त्या नवपालवीच्या क्षणांना पाहून त्याला धन्यता वाटते. पुष्याच्या हळूवार स्पर्शाने जमिनीवर पसरलेल्या चिखलाची दलदल धुऊन काढायला, आषाढाच्या अखेरीस पसरलेली दुर्गंधी दूर करण्यासाठी धावून येणाºया आश्लेष्याच्या श्रावण सरींमुळे माणसाच्या मनात साचलेले पापकर्मही धुवून निघतात.  ‘मघा’रूपातील सासूंच्या व ‘पूर्वा फाल्गुनी’ रूपातील सुनांच्या सरींमुळे वातावरणात आणखी वेगळेपणा येऊ लागतो.श्रावण देतो उमेद नवनिर्माणाचे छंदकार्यात चेतना अन्भरारी घेण्या स्वछंद     श्रावणाचा आनंद केवळ मानवालाच होतो असं नाही. झाडे, वेली, पशुपाखरे साºयांना श्रावण हर्षोल्लित करत असतो. चिखलात पाय रूतल्याने माणसाच्या हव्यासाची शिकार होऊ शकतो याची भीती असूनही रानोमाळ विहरणाºया हरणांना, सशाला पाहून मन गलबलून आल्याशिवाय राहत नाही. आपल्या मधूर स्वराने गाणे गात अवघी सृष्टी किलबिलाटाने जीवंत ठेवणाºया पाखरांचा आनंद गगनात मावेनासा होतो. एवढे दिवस बंद कळ्यात बंदीवान असलेल्या गंधाला मुक्त उधळणाºया सुमनांच्या प्रांजळ मनाचेही देखावे याच दिवसात अधिक प्रकर्षाने जाणवतात.-आनंद घोडके

टॅग्स :SolapurसोलापूरShravan Specialश्रावण स्पेशलAdhyatmikआध्यात्मिक