शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वर्षत सकळ मंगळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:51 IST

संत साहित्याची भव्यता ही संतांचा मानवतावादी विचार आणि त्यांच्या दृष्टीतील मांगल्यात सामावलेली आहे.

-प्रा. शिवाजीराव भुकेलेसंत साहित्याची भव्यता ही संतांचा मानवतावादी विचार आणि त्यांच्या दृष्टीतील मांगल्यात सामावलेली आहे. संतांच्या समोरचा मानवी समूह केवळ प्रादेशिक पातळीवरची अंथरूणे अंथरणारा नव्हता, तर तो वैश्विक परिमाण प्राप्त झालेला होता. संतांनी विश्वातील प्रत्येक प्राणिमात्राकडे तो ईश्वराचा एक अंश आहे या पवित्र दृष्टीने पाहिले. त्यामुळे द्वेषाच्या इंगळ्या त्यांच्या मनाला कधी डसल्या नाहीत. सर्वव्यापी ईश चैतन्य कधी हा जवळचा व तो परका असा आपपरभाव करीत नाही. नीच माणसाला नष्ट करून सज्जनांना जीवनदान द्यावे हे जसे धरतीला माहीत नाही तसे दैनंदिन जीवनात संतांनी विश्वकल्याणाचा विचार येनकेन प्रकारांनी मांडताना म्हटले होते.दिसो परतत्व डोळा । पाहों सुखाचा सोहळा ।रिघों महाबोध सुकाळा । माजी विश्व ॥सारे विश्व चैतन्याने अन् महाबोधाच्या सुकाळाने न्हाऊन निघावे अशी मंगलमय प्रार्थना करण्यासाठी दृष्टीत, विचारात, जगण्यात वा कृतीत पावित्र्य असावे लागते, तरच सारे विश्व सचिदानंदांच्या कंदातील अंश वाटू लागते. ज्ञानदेव आणि नामदेवादिक संतांनी समता, एकता आणि पावित्र्याचा ध्वज तिन्ही लोकी फडकविला तो एवढ्यासाठीच की, समाजाला जर सामर्थ्याचे, सृजनाचे, एकतेचे, समतेचे झरे खळखळत राहिले तरच उद्याचा बलिष्ठ व आत्मनिर्भर समाज निर्माण व्हायचा असेल तर माउलीच्या मांगल्याने समाजाकडे पाहण्याची प्रेममूर्ती गावागावात जन्माला आल्या पाहिजेत. लोकांची मने जोडण्यासाठी हिंंसा, विकार, मोडतोडीचा त्याग करून प्रेमाने, कारुण्याने, शांतीने, वात्सल्याने लोकांची मने जिंंकण्याचे क्षमाशास्त्र संतांनी आत्मसात केले.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक