शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

वर्षत सकळ मंगळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:51 IST

संत साहित्याची भव्यता ही संतांचा मानवतावादी विचार आणि त्यांच्या दृष्टीतील मांगल्यात सामावलेली आहे.

-प्रा. शिवाजीराव भुकेलेसंत साहित्याची भव्यता ही संतांचा मानवतावादी विचार आणि त्यांच्या दृष्टीतील मांगल्यात सामावलेली आहे. संतांच्या समोरचा मानवी समूह केवळ प्रादेशिक पातळीवरची अंथरूणे अंथरणारा नव्हता, तर तो वैश्विक परिमाण प्राप्त झालेला होता. संतांनी विश्वातील प्रत्येक प्राणिमात्राकडे तो ईश्वराचा एक अंश आहे या पवित्र दृष्टीने पाहिले. त्यामुळे द्वेषाच्या इंगळ्या त्यांच्या मनाला कधी डसल्या नाहीत. सर्वव्यापी ईश चैतन्य कधी हा जवळचा व तो परका असा आपपरभाव करीत नाही. नीच माणसाला नष्ट करून सज्जनांना जीवनदान द्यावे हे जसे धरतीला माहीत नाही तसे दैनंदिन जीवनात संतांनी विश्वकल्याणाचा विचार येनकेन प्रकारांनी मांडताना म्हटले होते.दिसो परतत्व डोळा । पाहों सुखाचा सोहळा ।रिघों महाबोध सुकाळा । माजी विश्व ॥सारे विश्व चैतन्याने अन् महाबोधाच्या सुकाळाने न्हाऊन निघावे अशी मंगलमय प्रार्थना करण्यासाठी दृष्टीत, विचारात, जगण्यात वा कृतीत पावित्र्य असावे लागते, तरच सारे विश्व सचिदानंदांच्या कंदातील अंश वाटू लागते. ज्ञानदेव आणि नामदेवादिक संतांनी समता, एकता आणि पावित्र्याचा ध्वज तिन्ही लोकी फडकविला तो एवढ्यासाठीच की, समाजाला जर सामर्थ्याचे, सृजनाचे, एकतेचे, समतेचे झरे खळखळत राहिले तरच उद्याचा बलिष्ठ व आत्मनिर्भर समाज निर्माण व्हायचा असेल तर माउलीच्या मांगल्याने समाजाकडे पाहण्याची प्रेममूर्ती गावागावात जन्माला आल्या पाहिजेत. लोकांची मने जोडण्यासाठी हिंंसा, विकार, मोडतोडीचा त्याग करून प्रेमाने, कारुण्याने, शांतीने, वात्सल्याने लोकांची मने जिंंकण्याचे क्षमाशास्त्र संतांनी आत्मसात केले.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक