शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

वर्षत सकळ मंगळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:51 IST

संत साहित्याची भव्यता ही संतांचा मानवतावादी विचार आणि त्यांच्या दृष्टीतील मांगल्यात सामावलेली आहे.

-प्रा. शिवाजीराव भुकेलेसंत साहित्याची भव्यता ही संतांचा मानवतावादी विचार आणि त्यांच्या दृष्टीतील मांगल्यात सामावलेली आहे. संतांच्या समोरचा मानवी समूह केवळ प्रादेशिक पातळीवरची अंथरूणे अंथरणारा नव्हता, तर तो वैश्विक परिमाण प्राप्त झालेला होता. संतांनी विश्वातील प्रत्येक प्राणिमात्राकडे तो ईश्वराचा एक अंश आहे या पवित्र दृष्टीने पाहिले. त्यामुळे द्वेषाच्या इंगळ्या त्यांच्या मनाला कधी डसल्या नाहीत. सर्वव्यापी ईश चैतन्य कधी हा जवळचा व तो परका असा आपपरभाव करीत नाही. नीच माणसाला नष्ट करून सज्जनांना जीवनदान द्यावे हे जसे धरतीला माहीत नाही तसे दैनंदिन जीवनात संतांनी विश्वकल्याणाचा विचार येनकेन प्रकारांनी मांडताना म्हटले होते.दिसो परतत्व डोळा । पाहों सुखाचा सोहळा ।रिघों महाबोध सुकाळा । माजी विश्व ॥सारे विश्व चैतन्याने अन् महाबोधाच्या सुकाळाने न्हाऊन निघावे अशी मंगलमय प्रार्थना करण्यासाठी दृष्टीत, विचारात, जगण्यात वा कृतीत पावित्र्य असावे लागते, तरच सारे विश्व सचिदानंदांच्या कंदातील अंश वाटू लागते. ज्ञानदेव आणि नामदेवादिक संतांनी समता, एकता आणि पावित्र्याचा ध्वज तिन्ही लोकी फडकविला तो एवढ्यासाठीच की, समाजाला जर सामर्थ्याचे, सृजनाचे, एकतेचे, समतेचे झरे खळखळत राहिले तरच उद्याचा बलिष्ठ व आत्मनिर्भर समाज निर्माण व्हायचा असेल तर माउलीच्या मांगल्याने समाजाकडे पाहण्याची प्रेममूर्ती गावागावात जन्माला आल्या पाहिजेत. लोकांची मने जोडण्यासाठी हिंंसा, विकार, मोडतोडीचा त्याग करून प्रेमाने, कारुण्याने, शांतीने, वात्सल्याने लोकांची मने जिंंकण्याचे क्षमाशास्त्र संतांनी आत्मसात केले.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक