शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

लोभ सर्प डंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 5:38 AM

एखाद्या निसर्ग चमत्काराचा मोह होणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे.

एखाद्या निसर्ग चमत्काराचा मोह होणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. जीवनाचे गीत गाणाऱ्या खळखळणाºया सलीलाचा, उंच-उंच डोंगरकड्यांवरून कोसळणाºया धबधब्याचा, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी मांडवाखाली पिसारा फुलविणाºया मयूराचा आनंदोत्सव पाहत राहणे हा माणसाच्या अंत:करणातील केवळ मोहच नाही, तर त्याच्या रसिक प्रवृत्तीचे शुभ लक्षण आहे. अशा काही स्वाभाविक मोहामुळे माणूस आतून निरोगी होतो व निकोप प्रवृत्तीने जगाकडे पाहू लागतो. जे आपले आहे, त्याला चिकटून बसणे आणि जे आपले नाही, ते ओरबाडण्यासाठी संपूर्ण समाज जीवनाला भयग्रस्त करणे, हेच खरे विकारी मनोवृत्तीचे लक्षण आहे. ही मोहग्रस्ताची जमात केवळ आजच वळवळ करत आहे असे नाही, तर अगदी महाभारताच्या कालखंडापासूनही धृतराष्ट्री प्रवृत्ती थैमान घालत आहे. या मोहरूपी सर्पाचे वर्र्णन करताना निर्मोही संत एकनाथ महाराज म्हणाले होते,लोभ सर्प डंखला करू काय?स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय।गुरू गारुडी आला धावुनीविवेक अंजन घातले नयनी वों ॥गुरू नावाचा गारुडी जोपर्यंत डोळ्यांत विचारांचे अंजन घालत नाही, तोपर्यंत डोक्यात सद्विचारांचे संवर्धन होत नाही आणि जोपर्यंत विचारांच्या खºया-खुºया परमार्थाचे जल समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झुळझुळत नाही, तोपर्यंत स्वार्थ आणि संपत्तीच्या बाजारात हजारो पामरे रडतच राहतात. हे काम समाजातील ज्या कर्णधाराकडे आहे, तेच आज दुर्दैवाने मोहफणीने ग्रस्त होऊन रम, रमा, रमीमध्ये रममाण होत आहेत. अंगावर एक लंगोटी, झोपायला धरतीचे आसन, पांघरायला आकाशाचे पांघरुण आणि खायला चार घरांतील भिक्षा एवढीच ज्याची संपत्ती असावी, असा साधू, संत आज आकाश पुष्पाप्रमाणे दुर्मीळ होत आहे.- प्रा. शिवाजीराव भुकेलें