शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यवान माणसांचा सहवास इतरांसाठी परिसस्पर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 04:32 IST

मळलेली माणसं सत्पुरुषाच्या सहवासात परिष्कृत होतात.

- बा.भो. शास्त्रीस्वच्छ प्रतिमेची सर्वत्रच पूजा होत असते म्हणून विचारी माणसंं प्रतिमा निर्माण करत असतात. कदाचित त्यांंना घर नसतंं पण घरोघर त्यांंचे फोटो आपण पाहतो. त्यांच्याकडे पैसा नसतो, पण समाज पैसा खर्च करून त्यांचे जागोजागी पुतळे उभे करीत असतो. कदाचित त्यांंचे मंंदिरही बांधले जातात. कारण त्या पुरुषांंच्या चित्रात त्यांंचंं निर्मळ चारित्र्य असतं. तेच लोक ग्रंंथात, धर्मात, शब्दांंत दिसतात. मनात वसतात. मरणाला मारून ते आजही जिवंंंत आहेत. मलिन माणसं जे निर्माण करतात ते काळाच्या उदरात गडप होऊन जातं आणि तेजस्वी पुरुषांंचंं कर्तृत्व अमर होतंं. चिरंतन प्रकाश देतंं. चांगल्या वस्तूचंं स्वाभाविक आपल्याला आकर्षण असतं. कुणालाही प्रत्येक वस्तू शुद्ध हवी असते. दुधात, पाण्यात, फळात, विचारात, आचारात व उच्चारात भेसळ नको. फार काय दारू तर नाही पण विषही भेसळीचं नको असतं. पण हाच निकष आपण स्वत:ला कधीच लावत नसतो. सर्वांना सोयीचा माणूस आवडतो. आपण इतरांंच्या सोयीचं होण्याचा कधीच प्रयत्न करीत नाही. चोरी करणंं बेइमानी आहे हे चोरांना पण कळतं. म्हणून तो स्वत:साठी साथीदार इमानदार हवा अशी सगळ्याच चोरांंची अपेक्षा असते. मग माणसंं मळतात कशी? भौतिक जग निर्माण करणारा स्वत:ला का तयार करीत नाही. दुसरा आपल्यासाठी सज्जन असावा ही आपली अपेक्षा रास्त आहे. मग आपण पण याच्यासाठी सज्जन का असू नये? गीता म्हणते,‘‘आत्मौपम्येन सर्वत्र समंं पश्यति योर्जुनसखं वा यदि वा दु:खं स योगी परमो मत:’’स्वत:ला दुसऱ्यात पाहता येतं तो योगी आहे. आपल्याला दु:ख नको. त्यालाही नकोच असतं. आपल्याला सुख हवं तसंं त्यालाही हवं असतं. यालाच दृष्टी म्हणतात. डोळे सगळ्यांनाच आहेत. दृष्टी नाही. पाप व पुण्याचंं मूळ दृष्टीत आहे. बाहेरचं जग डोळ्यातूनच अंंतरात प्रवेश करतंं. दृष्टी व सृष्टीत सतत व्यापार चालत असतो. दृष्टीला नको ते नाकारता आलंं पाहिजे, हवंं ते स्वीकारता आलं पाहिजे. आधी दृष्टीलाच मळ लागतो. नंंतर मनात व्यापतो. मनातून बृद्धी व आत्म्यात पसरत जातो. माणसाचा जन्म होतो तेव्हा तो कोराच असतो. ना हिंंदू, ना मुस्लीम, ना जैन ना बौद्ध एकदम सफेद असते. आम्हीच त्यात जात, धर्म, पंथ व प्रांताचे रंग भरत असतो. जसा आभाळातून पाण्याचा थेंंब पडतो. तसाच स्वच्छ, मधुर, प्रसन्न व थंड असतो हा माणूस. बाळाचे डोळे पाहा, किती सुंंदर दिसतात. ते विकार विकल्परहित असतात. कवी भास्कर म्हणतात,‘‘जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्नतैसे रजस्तमी विहिन मन निर्मळ होआवे’’जमिनीतल्या वस्तूंंच्या गुणधर्माची जशी संगत मिळते तसं पाण्याचंं रंंगरूप बदलतंं. थेंंब आगीत पडला की जळतो. मातीत मुरतो, शिंंपल्यात मोती होतो, सागरात खारा होतो, दारूत दारू तर आमरसात अमृत होतो. गोड, खारट, तिखट, आंंबट, संजीवनी व विष ही त्याचेच बदललेली रूपं आहेत. हा सगळा संगीताचा परिणाम आहे. असंच आहे माणसाचं रेखाचित्र. त्यात आपणच रंग भरत असतो. कधी आईबाप, कधी शिक्षक, कधी मित्र, कधी नातेगोते यांच्या सहवासात माणसं रंगत जातात. सत्संगात रमून जातात. कुसंगाने भंगून जातात. मन मळतं, बुद्धी मळते, यावर काही उपाय आहे की नाही?हेच श्रीचक्रधर सूत्रातून सांंगतात,‘‘उजळलेयाचेनी संगे मैळला उजळे’’घासनीच्या संगतीने भांंडं उजळतं. तुरटीच्या संगतीने पाणी शुद्ध होतं, अग्नीच्या संगाने लोखंंडाचा जंंग जातो. साबणीच्या संगतीत वस्त्र स्वच्छ होतं. अशीच मळलेली माणसं सत्पुरुषाच्या सहवासात परिष्कृत होतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक