शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोमल वाणी दे रे रामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 2:49 AM

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारकाही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले. चौकीदार बोलणे सहन करू शकला नाही व त्याने त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्या गृहस्थाला अटक झाली व पुढे तुरुंगात रवानगी झाली. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात.कोमल वाणी दे रे रामा ।विमल करणी दे रे रामा ।।संत तुकाराम महाराज म्हणतात,बोलावे बरे । बोलावे खरे ।कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।।म्हणजेच बोलताना शब्दाबाबत आपण अत्यंत जागरूक असणे आवश्यक असते. बरेचदा जीवनात घटना खूप क्षुल्लक असतात, पण आपण त्याला धारधार शब्दांनी चिघळून टाकतो. शब्दाला धार नसावी तर शब्द हे आधार देणारे असावेत कारण धारधार शब्द मन कापतात तर आधार देणारे शब्द मन जोडतात. जेव्हा आपण धारधार शब्द वारंवार बोलण्यात वापरतो तेव्हा ते आपल्या संस्काराचा भाग बनतात मग थोडंसुद्धा मनाविरुद्ध झालं की आपोआप धारधार शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात. त्यामुळे आपली इच्छा जरी चांगले शब्द वापरण्याची असेल तरी ते वापरणे आपल्या नियंत्रणात राहत नाही मग आपण म्हणतो की मला चांगलंच बोलायचं होत. पण माझ्या मुखातून वाईटच शब्द बाहेर पडतात. आपण या सवयीचे एवढे आहारी जातो की घरी व दारी असेच शब्द वापरायला लागतो. त्यामुळे आपले व परके असे सर्वच संबंध धारधार शब्दांमुळे संपुष्टात येतात. बरेचदा शब्द हे कृतीपेक्षाही जास्त घायाळ करतात. जेव्हा आपण दुसऱ्याला आपल्या शब्दांनी किंवा कृतींनी दु:खी करतो तेव्हा आपल्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण होते व ती आपल्याला स्वत:ला घातक ठरते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥म्हणजेच सारासार विचार केल्याशिवाय बोलू नये. कार्य सुरू करताना सर्वांगीण बाजूंचा विचार केल्याशिवाय कार्य सुरू करू नये. नीती अनीतीचा विचार केल्याशिवाय हालचाल करू नये.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक