शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अजुनी येतो वास फुलांना, अजुनी माती लाल चमकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 1:48 AM

अगदी काल-परवाच शरीराला दरदरून घाम फोडणारी, मनाला आतून हादरवून टाकणारी आणि जगण्या-मरण्याच्या सीमारेषा पुसट करणारी घटना माझ्या मित्रांच्या जीवनात घडली.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

अगदी काल-परवाच शरीराला दरदरून घाम फोडणारी, मनाला आतून हादरवून टाकणारी आणि जगण्या-मरण्याच्या सीमारेषा पुसट करणारी घटना माझ्या मित्रांच्या जीवनात घडली. मित्राची समजूत नेमकी कशी काढावी हे मलाही सुचेनासे झालेय. त्याच्या एकुलत्या एक ‘अमर’ नावाच्या मुलाने आपल्या हॉस्टेलवरील राहत्या खोलीत आत्महत्या केली अन् पाटील कुटुंबीयांच्या जीवनात अंधार दाटून आला. अमर स्कॉलर होता, शालीन होता. हरहुन्नरी होता. प्रेम प्रकरण वगैरे गोष्टीत तितकासा रस घेणारा नव्हता. फक्त खूपच मनस्वी होता.

दारिद्र्याचे आकाश माथ्यावर पेलणाऱ्या त्याच्या बाबाने व दुसºयाच्या शेतात मोलमजुरी करणा-या आईने अमरला डॉक्टर करायचेच, असा संकल्प केला होता. अमरही तसा प्रतिसाद देत होता. मग असे अचानक काय झाले की, अमरचा आयुष्यावरचा विश्वासच उडून गेला. तर म्हणे अमरचा त्या दिवशी मित्रांच्याकडून ‘शेळपट आयुष्य जगणारी शेळी’ अशा शेलक्या शब्दांत अपमान झाला, म्हणून अमरने असा टोकाचा निर्णय घेतला. एक अमर एकदाच गेला, पण असे हजारो अमर आयुष्याकडे अत्यंत अल्प दृष्टीने पाहत आहेत. त्यामुळे अकाली आयुष्याचा अंत करीत आहेत.

आयुष्याच्या वाटेवरून चालता-चालता पाय रक्तबंबाळ झाले, तरी तुकोबासारखे आनंदयात्री म्हणत होते,दिले इंद्रिय हात पाय कान। डोळामुख बोलाया वचन।जेणे तू जोडीसी नारायण।नासे जीवपण भवरोग।।आपले आयुष्य हीच विद्या त्याने दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. हा संतांचा मनोमन विश्वास होता, म्हणूनच आपल्या दीर्घ दृष्टीने ते समाजावर दीर्घकाल टिकणारे संस्कार करू शकले. वाºयाच्या एका झुळकेबरोबर प्राजक्ताच्या फांद्या हलाव्यात अन् अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडावा, तसे दुसºयाच्या जीवनात सुगंध पसरविणारे जिणं ज्ञानेश्वर, बुद्ध, कबीर, तुकाराम, महावीर, विवेकानंद यांच्या वाट्याला आले. कवितेच्या एका-एका कडव्यातील आनंदाने बेभान होत जाऊन द्रष्ट्या कवीने दुसºयाच्या जीवनात आनंदाचे चांदणे शिंपीत जावे, तसे हे सारे युगा-युगाचे आनंदयात्री आमच्या आयुष्यात आनंदाचे चांदणे शिंपीत गेले, पण आम्ही मात्र अल्प दृष्टीची माणसे जीवनातील अल्पविरामाकडेच पाहात बसलो. त्याची दीर्घता आमच्या लक्षात आणून देण्यासाठीच मर्ढेकर म्हणाले होते,अजुनी येतो वास फुलांना, अजुनी माती लाल चमकते।अजुनी सुरट्या बांधावरती। चढुनी बकरी पाला खाते।।

दारिद्र्य व सामाजिक उपेक्षेचे वाळवंट तुडवीत असतानासुद्धा संत नामदेवांसारखे आंतरभारतीचे जनक आपले आयुष्य म्हणजेच विधात्याने दिलेला प्रसाद आहे, असे मानत होते. म्हणूनच नामदेवांनी पंजाबमध्येसुद्धा भक्तिभावाची प्रसन्न पौर्णिमा सर्वसामान्यांच्या जीवनात निर्माण केली. माणसाचं जगणं हाच मुळात ऊन -पावसाच्या चैत्रपालवीचा खेळ आहे. कधी ते सुखाच्या सागराने हिंदोळे घेऊ लागते, तर कधी दु:खाचे वैराण वाळवंट तुडवावे लागते; परंतु यातही जगण्याची एक रग आहे. नवनिर्मितीची धग आहे, म्हणून बहिणाबाई म्हणाल्या होत्या,जग जग माझ्या जीवा। असं जगणं मोलाचं ।।उच्च गगनासारखं। धरतीच्या र तोलाचं।।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक