शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आनंद तरंग - आनंद पुढे ढकलू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 06:41 IST

प्रत्येक जीवमात्राला आनंद हवा असतो. पैसा असो, अधिकार असो की शरीरसुख असो, हे सगळे आनंदासाठीच केले जाते. काही लोक तर दुर्दशेतही खूश असतात.

श्री.श्री. रविशंकर

प्रत्येक जीवमात्राला आनंद हवा असतो. पैसा असो, अधिकार असो की शरीरसुख असो, हे सगळे आनंदासाठीच केले जाते. काही लोक तर दुर्दशेतही खूश असतात. कारण त्यात त्यांना आनंद मिळतो. आनंदी होण्यासाठी तुम्ही कारण शोधत असता आणि ते मिळाले, तरीही तुम्ही खूश नसता. शाळेत जाणाऱ्या मुलाला वाटते की, तो कॉलेजमध्ये जाऊ लागला की, जास्त स्वातंत्र मिळेल आणि तो जास्त आनंदी होईल. कॉलेजमध्ये जाणाºया मुलाला विचारले की, तो आनंदी आहे का, तर त्याला वाटते की, त्याला चांगली नोकरी मिळाली की तो आनंदी होईल. नोकरीधंद्यात नीट स्थिरस्थावर झालेल्या एखाद्याशी बोललात, तर तुमच्या लक्षात येईल की, आनंदी होण्यासाठी तो एखाद्या उत्तम जोडीदाराची वाट पाहात असतो आणि तसा उत्तम जोडीदार मिळाला की, मग आनंदी होण्यासाठी तो एक बाळ होण्याची वाट पाहात असतो. मुले असलेल्या एखाद्याला विचारा ते खूश आहेत का? तर ते म्हणतात, मुलांना चांगले शिक्षण देऊन ती नीट मोठी होऊन त्यांच्या पायावर उभी राहिल्याशिवाय त्यांना स्वस्थता कशी मिळणार? निवृत्त झालेल्या, सर्व जबाबदाºया पार पाडलेल्यांना विचारा की, ते आनंदात आहेत का? तर ते म्हणतात की, त्यांच्या तरुणपणीचे दिवस किती छान होते!

संपूर्ण आयुष्य भविष्यात कधीतरी आनंदी होण्याच्या तयारीतच निघून जाते. हे म्हणजे असे झाले की, संपूर्ण रात्र अंथरुण नीट घालण्यातच निघून गेली आणि झोपायला वेळच मिळाला नाही. तुमच्या आयुष्यातही किती मिनिटे, तास, दिवस तुम्ही खरोखर आतून आनंदी राहण्यात घालविली आहेत? बस, तेवढेच क्षण तुम्ही खरे आयुष्य जगलात. तो कदाचित तुम्ही अगदी लहान असतानाचा काळ असेल, जेव्हा तुम्ही एकदम खूश, आनंदी किंवा काही क्षणी खूप त्रासात असाल, पोहत असाल किंवा डोंगरावर चढत असाल, पण वर्तमान क्षणात जगून मजा करत असाल. जीवनाकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे असा विचार करणे की ‘एखादे विशिष्ट ध्येय साध्य झाल्यावर मी आनंदी होईन.’ आणि दुसरा म्हणजे, ‘काहीही झाले, तरी मी आनंदीच आहे.’ तुम्हाला कोणत्या पद्धतीने जगायचे आहे? जीवन म्हणजे ८०% आनंद आणि २०% दु:ख आहे, पण तुम्ही त्या २० टक्क्यांना धरून ठेवता आणि त्याला २००% बनविता. हे मुद्दाम केले जात नाही, पण आपोआप घडते. आनंदाने, जागृतपणे, सावधपणे आणि ममतेने वर्तमान क्षणात राहून जगणे यातच ज्ञानप्राप्ती आहे. लहान बालकासारखे असणे यातच ज्ञानप्राप्ती आहे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक