शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 4

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:21 PM

आमच्या राष्ट्रात दु:ख का याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक मुख्य कारण  म्हणजे लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ.भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण देखील लोकसंख्येत वाढ हेच आहे.

- सदगुरू श्री वामनराव पैदारिद्रयाइतका मोठा शाप दुसरा नाहीआमच्या राष्ट्रात दु:ख का याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक मुख्य कारण  म्हणजे लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ.भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण देखील लोकसंख्येत वाढ हेच आहे. लोकसंख्या जितकी वाढेल तितका भ्रष्टाचार देखील वाढत जाईल.मागणी व पुरवठा हा जो अर्थशास्त्राचा एक नियम आहे त्याप्रमाणे मागणी जास्त व पुरवठा जर कमी असेल तर तिथे भ्रष्टाचार सुरू होतो.आमच्या तरुणपणी तरुण मुलांना कॉलेजमध्ये या म्हणून बोलवत असत.आता 90 टक्के असतील तरी या नाहीतर येऊ नका असे म्हटले जात.लोकसंसख्या एवढी वाढलेली आहे की त्यामुळे भ्रष्टाचार देखील वाढतो आहे.भ्रष्टाचार होतो असे म्हणत असताना तो का होतो याच्या मुळाशी आपण जात नाही.त्यामुळे आज समाजात जे प्रॉब्लेम्स आहेत त्यापेक्षा अधिक प्रॉब्लेम्स भविष्यात वाढत जातील.मग कुणी कितीही आश्वासने दिली तरी त्याची पूर्तता करणे केवळ अशक्य होईल.जीवनविद्या सांगते दु:ख का निर्माण होते याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी दारिद्रय हे प्रमुख कारण आहे.दारिद्रयाइतका मोठा शाप दुसरा  कोणताही नाही.हे दारिद्रय कमी करण्यासाठी मुख्य उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रित करणे हा होय.एकदा का इथे नियंत्रण आले की पुढील सर्व गोष्टी आपोआप नियंत्रणात येतील.लोकांना खायला अन्न मिळेल,लोकांना रहायला घरे मिळतील,आज लोकांना रहायला घर नाही हयाचे कारण काय? एखादी बिल्डिंग उभी केली व अर्ज मागवले तर त्यासाठी लाखोनी अर्ज येतात.थोडक्यात मागणी जास्त व घरे लिमिटेड आहेत.यासाठी लोकांनी शहाणपणाने वागले पाहिजे व सरकारने देखील आपले धोरण बदलले पाहिजे.हयाला काय वाटेल त्याला काय वाटेल असे म्हणत राहिले तर पुढच्या  पिढया तुम्हांला कधीच क्षमा करणार नाहीत.एक काळ असा होता की विवाहित स्त्रीला “अष्टपुत्र सौभाग्यवती भव” असा आर्शिवाद दिला जायचा.अष्टपुत्र म्हणजे आठ मुलगे व  आणखी मुली देखील म्हणजे एकूण डझनाच्या खाली काही बोलायचे नाही.तुम्ही म्हणाल त्यावेळी वामनराव असे कसे होत होते हो. किंवा त्यावेळी हा आर्शिवाद बरोबर होता का? सांगतो…त्यावेळी काय होते आपला शेतीप्रधान देश होता त्यामुळे अन्नाचा पुरवठा मुबलक होता व दुसरे म्हणजे युध्द वरचेवर व्हायची त्यामुळे युद्धामध्ये माणसे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडायची.घर चालविण्यासाठी शेती करावी लागे व शेतीसाठी घरात माणसे भरपूर असावित म्हणून अष्टपुत्र व्हावेत असा आर्शिवाद दिला जात असे.त्यावेळी घरातील स्त्रीया घर सांभाळायच्या व पुरुषांनी शेती सांभाळायची म्हणजे थोडक्यात ही एक प्रकारे केलेली समान श्रमविभागणी होती. त्यामुळे त्या काळी लोकसंख्या वाढली तरी चालत असे.लोकसंख्या वाढली तरी ती युध्द-लढाया यामुळे माणसांची संख्या कमी होत असे.असं म्हणतात की आपण दु:ख ओढवून घेतो व सुखाला दूर फेकतो.पण खरंतर सुखाला जवळ करायचे व दु:खाला फेकून द्यायचे  असते.आता या दु:खाला जवळ करायचे व सुखाला फेकून दयायचे की सुखाला जवळ करायचे व दु:खाला दूर करायचे हे तू ठरवायचे आहेस कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार|