शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:31 IST

समजा एखादे लहान मूल हिंदुच्या घरात जन्माला आले व ते पळवले गेले आणि ख्रिश्चन माणसाच्या घरात जाऊन पडले तर ते भविष्यात स्वत:ला ख्रिश्चन म्हणवणार. पण जर ते हिंदूच्या घरीच वाढले असते तर ते स्वत:ला हिंदू म्हणवणार. म्हणजे या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत.

- सदगुरू श्री वामनराव पै

कल्पनेने धुमशान घातलेले आहे

समजा एखादे लहान मूल हिंदुच्या घरात जन्माला आले व ते पळवले गेले आणि ख्रिश्चन माणसाच्या घरात जाऊन पडले तर ते भविष्यात स्वत:ला ख्रिश्चन म्हणवणार.पण जर ते हिंदूच्या घरीच वाढले असते तर ते स्वत:ला हिंदू म्हणवणार.म्हणजे या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहेत.लहान मुलाला लहानपणी जात,धर्म, वर्ण हे काहीच नसते पण आपण समाज त्याला ते सर्व चिकटवितो व हे लहानपणीच चिकटविल्यामुळे ते त्याच्या अंतर्मनात जाते.लहानपणी मुलांचे बहिर्मन हे अगदीच शून्य असते व अंतर्मन कार्यरत असते. त्यामुळे आपण लहानपणी जे काही मुलांना शिकवितो ते ती चटकन शिकतात.लहान मुले नवीन भाषा चटकन शिकतात पण मोठयांना एखादी नवीन भाषा शिकायला वेळ लागतो.आमच्या बंधूची केरळला बदली झाली होती तेव्हा तिथे आमची पुतणी तिकडची भाषा चटकन शिकली.कारण ती तेव्हा लहान होती.आमचा नातू लहानपणी कॅनडाहून भारतात आला तेव्हा त्याची भाषा जवळजवळ इंग्लिशच होती व त्यानंतर ते ते गोव्याला स्थायिक झाले तेव्हा तो कोंकणी भाषा देखील चटकन शिकला. आता मी हे का सांगतो आहे कारण मला तुम्हाला हे सांगायचे आहे की लहान मुले तुम्ही जे शिकवाल ते चटकन शिकतात.त्याचे कारण लहान मुलाचे बहिर्मन हे अगदीच शून्य असते व अंतर्मन मात्र कार्यरत असते.त्यामुळे तुम्ही त्याला जे काही लहाणपणी सांगता व शिकवता ते त्याच्या सोबत आयुष्यभर कायम स्वरूपी असते.कारण ते तेव्हा त्याच्या अंतर्मनात गेलेले असते.आपण महाराष्ट्र गुजरात किंवा महाराष्ट्र कर्नाटक असा सीमाप्रश्न असे म्हणतो आणि महाराष्ट्रातून गुजरात मध्ये प्रवेश केला असे म्हणतो पण जमिनीला विचारलेत तर ती म्हणेल कसला गुजरात.जमिनीला हे नाव वगैरे काहीच ठाऊक नसते.तिला ही नावे माणसाने दिलेली आहेत.हे ही काल्पनिक आहे हे लक्षांत घेतले तर या कल्पनेचा इतका प्रभाव आहे की या कल्पनेनेच सर्व गोंधळ घातलेला आहे.कोकणी भाषेत सांगायचे तर अक्षरश: धुमशान घातलेले आहे.कल्पनेने धुमशान घातलेले आहे.त्यामुळेच जगात हाणामारी दंगेधोपे हे सगळे चाललेले असते.मानवजात हया काल्पनिक गोष्टींमुळे विभागली गेलेली आहे.जात, धर्म, वर्ण, कुळ, गोत्र हया सर्व गोष्टी त्याला चिकटल्या गेलेल्या आहेत.जीवनविद्या काय सांगते लहान मुलाला मानवी संस्कृतीचे संस्कार द्या.आज त्याला निरनिरळ्या संस्कॄतीचे संस्कार दिले जाता.हिंदु संस्कृती, मुस्लीम संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, पारशी संस्कृती, बौध्द संस्कृती अशा निरनिराळ्या संस्कृतीचे संस्कार त्याला दिले गेल्यामुळे मानवजात आज विभागली गेलेली आहे.त्यातून पुढे माणूस विभागला जातो.हे विभाजन काल्पनिक असले तरी माणूस विभागला जातो हे मात्र  खरे.वर्णामुळे प्रांतामुळे,राष्ट्रामुळे माणूस विभागला जातो.मानवजातीची ही जी विभागणी झालेली आहे ती सोयीसाठी केली गेली हे ठीक आहे किंबहूना ती सोयीसाठीच आहे पण आज ती गैरसोय झालेली आहे.