शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जात विचारू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:15 IST

जातीपातीच्या मगरमिठीत अडकलेल्या भारतीय समाजाची या मगरमिठीतून मुक्तता करून किमान पारमार्थिक क्षेत्रात तरी आध्यात्मिक लोकशाहीचं ताबडं फुटावं म्हणून कर्नाटकात बसवेश्वरांनी, उत्तरेत संत कबीर, रोहिदासांनी, पंजाबात गुुरुनानकांनी, महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेव, चोखोबा, तुकोबा आदी प्रांतोप्रांतीच्या संतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले

- प्रा. शिवाजीराव भुकेलेजातीपातीच्या मगरमिठीत अडकलेल्या भारतीय समाजाची या मगरमिठीतून मुक्तता करून किमान पारमार्थिक क्षेत्रात तरी आध्यात्मिक लोकशाहीचं ताबडं फुटावं म्हणून कर्नाटकात बसवेश्वरांनी, उत्तरेत संत कबीर, रोहिदासांनी, पंजाबात गुुरुनानकांनी, महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेव, चोखोबा, तुकोबा आदी प्रांतोप्रांतीच्या संतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि समाजजीवनात आत्मजाणिवेची नवी पहाट उजाडली. शिक्षणाचा प्रसार, पुरोगामी परंपरा, आधुनिकतेची कास या सगळ्याचा परिपाक म्हणून संतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार होणे अभिप्रेत होते. परंतु, आम्ही हुशार भारतीय माणसांनी जे युगप्रवर्तक संत जात आणि वर्णव्यवस्थेची उतरंड नष्ट करण्यासाठी आले, त्यांनाच जाती आणि वर्णाच्या चौकटीत बसविले. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावाने जाती-जातीत आणि प्रांता-प्रांतात खूप मोठा संघर्ष निर्माण झाला. कुठल्याही लाभ-लोभावाचून साऱ्या जगावर निष्काम भावनेने प्रेम करावे आणि सर्व जाती-धर्मांत आनंदाचे आवार मांडावे हीच साधुसंतांची खरी जात. आपल्या आयुष्यातील अधिकाधिक दिवस जातिव्यवस्थेच्या उतरंडीला नष्ट करण्यासाठी साधुसंतांना खर्ची घालावे लागले आणि त्यानंतर अध्यात्मविद्येचा दीप घरोघरी उजळावा लागला. संत कबिराला तर जातीबरोबरच औरस-अनौरस या बेगडी उत्पत्तीबरोबरही प्रचंड संघर्ष करावा लागला. तेव्हा संत कबिराने जातीच्या बाह्यरूपाचे खंडन करताना म्हटले होते -जाति न पूछो साधु की, पूढ लिजिए ज्ञानमोल करों तलवार का, पडा रहनें दो म्यान ।साधुसंतांचे मोठेपण तो कुठल्या जातीत जन्माला आला यावरून ठरू नये, तर त्याच्या डोक्यातील ज्ञान आणि कर्मातील महानतेवरून ठरविण्यात यावे, यासाठी संत कबिराने खूपच सुंदर दृष्टांत दिला आहे. एखाद्या तलवारीची म्यान हिरे, माणिके, रत्नाने सजविलेली असली, पण आतली तलवार जर गंजलेली असेल तर सुंदर म्यानाचा काहीच उपयोग नाही; तद्वतच जातीय अभिनिवेशाच्या नावाखाली एखाद्याकडे साधुत्व चालत आले, पण डोक्यात भाव-भक्ती, कर्म, समता, ममता यापैकी कुठलाच विचार नसेल तर त्यांचा काहीच उपयोग नाही. इकडे महाराष्ट्रातही ज्ञानोबा, तुकोबांनी‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्मभेदा-भेद अमंगल’चा समतावादाचा उद्घोष केला. चातुवर्ण्य व्यवस्था जरी त्यांना समूळ नष्ट करता आली नाही, तरी या व्यवस्थेला खिळखिळीत करण्याचे प्रयत्न मात्र भारतातील सर्वच संतांनी केले. पण त्यांचे निरामय, निराभिमानी, जातीरहित, वर्णरहित समाजव्यवस्थेचे स्वप्न आम्हास पचलेच नाही. मानवतेची खरी शिकवण आम्हाला समजलीच नाही. खरा देव कुठे असतो, याचा विचार कधी आम्ही केला नाही. माणसात देव पाहा, या संतांच्या शिकवणीचा सगळ्यांना विसर पडला. कुणीही अनोळखी व्यक्ती भेटली की आधी तो कोणत्या जातीचा या प्रश्नाची भुणभुण डोक्यात सुरू होते. त्यावरून मग पुढील आडाखे बांधले जातात. जग पुढे जात असताना आम्ही मात्र असे मागेमागे जात आहोत. जातिवादाच्या हरळीचे मूळ आजच्या ग्लोबल इंडियामध्येसुद्धा एवढे हिरवेगार आणि ताजे टवटवीत आहे की आम्ही माणसाकडे माणूस म्हणून पाहतच नाही, तर जात हीच माणसाची खरी ‘आयडेंटी’ झाली आहे. जातीसाठी जन्मणे, जातीसाठी भांडणे, जाती-जातीत होळी पेटवून आपली पोळी भाजून घेणे हाच आमचा जीवन धर्म झाला आहे. जातीसाठी खावी माती, हे म्हणताना वैषम्य वाटण्याऐवजी अभिमान वाटू लागतो, हे खरे दुर्दैव.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रMaharashtraमहाराष्ट्र