शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जात विचारू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:15 IST

जातीपातीच्या मगरमिठीत अडकलेल्या भारतीय समाजाची या मगरमिठीतून मुक्तता करून किमान पारमार्थिक क्षेत्रात तरी आध्यात्मिक लोकशाहीचं ताबडं फुटावं म्हणून कर्नाटकात बसवेश्वरांनी, उत्तरेत संत कबीर, रोहिदासांनी, पंजाबात गुुरुनानकांनी, महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेव, चोखोबा, तुकोबा आदी प्रांतोप्रांतीच्या संतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले

- प्रा. शिवाजीराव भुकेलेजातीपातीच्या मगरमिठीत अडकलेल्या भारतीय समाजाची या मगरमिठीतून मुक्तता करून किमान पारमार्थिक क्षेत्रात तरी आध्यात्मिक लोकशाहीचं ताबडं फुटावं म्हणून कर्नाटकात बसवेश्वरांनी, उत्तरेत संत कबीर, रोहिदासांनी, पंजाबात गुुरुनानकांनी, महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेव, चोखोबा, तुकोबा आदी प्रांतोप्रांतीच्या संतांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि समाजजीवनात आत्मजाणिवेची नवी पहाट उजाडली. शिक्षणाचा प्रसार, पुरोगामी परंपरा, आधुनिकतेची कास या सगळ्याचा परिपाक म्हणून संतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार होणे अभिप्रेत होते. परंतु, आम्ही हुशार भारतीय माणसांनी जे युगप्रवर्तक संत जात आणि वर्णव्यवस्थेची उतरंड नष्ट करण्यासाठी आले, त्यांनाच जाती आणि वर्णाच्या चौकटीत बसविले. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावाने जाती-जातीत आणि प्रांता-प्रांतात खूप मोठा संघर्ष निर्माण झाला. कुठल्याही लाभ-लोभावाचून साऱ्या जगावर निष्काम भावनेने प्रेम करावे आणि सर्व जाती-धर्मांत आनंदाचे आवार मांडावे हीच साधुसंतांची खरी जात. आपल्या आयुष्यातील अधिकाधिक दिवस जातिव्यवस्थेच्या उतरंडीला नष्ट करण्यासाठी साधुसंतांना खर्ची घालावे लागले आणि त्यानंतर अध्यात्मविद्येचा दीप घरोघरी उजळावा लागला. संत कबिराला तर जातीबरोबरच औरस-अनौरस या बेगडी उत्पत्तीबरोबरही प्रचंड संघर्ष करावा लागला. तेव्हा संत कबिराने जातीच्या बाह्यरूपाचे खंडन करताना म्हटले होते -जाति न पूछो साधु की, पूढ लिजिए ज्ञानमोल करों तलवार का, पडा रहनें दो म्यान ।साधुसंतांचे मोठेपण तो कुठल्या जातीत जन्माला आला यावरून ठरू नये, तर त्याच्या डोक्यातील ज्ञान आणि कर्मातील महानतेवरून ठरविण्यात यावे, यासाठी संत कबिराने खूपच सुंदर दृष्टांत दिला आहे. एखाद्या तलवारीची म्यान हिरे, माणिके, रत्नाने सजविलेली असली, पण आतली तलवार जर गंजलेली असेल तर सुंदर म्यानाचा काहीच उपयोग नाही; तद्वतच जातीय अभिनिवेशाच्या नावाखाली एखाद्याकडे साधुत्व चालत आले, पण डोक्यात भाव-भक्ती, कर्म, समता, ममता यापैकी कुठलाच विचार नसेल तर त्यांचा काहीच उपयोग नाही. इकडे महाराष्ट्रातही ज्ञानोबा, तुकोबांनी‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्मभेदा-भेद अमंगल’चा समतावादाचा उद्घोष केला. चातुवर्ण्य व्यवस्था जरी त्यांना समूळ नष्ट करता आली नाही, तरी या व्यवस्थेला खिळखिळीत करण्याचे प्रयत्न मात्र भारतातील सर्वच संतांनी केले. पण त्यांचे निरामय, निराभिमानी, जातीरहित, वर्णरहित समाजव्यवस्थेचे स्वप्न आम्हास पचलेच नाही. मानवतेची खरी शिकवण आम्हाला समजलीच नाही. खरा देव कुठे असतो, याचा विचार कधी आम्ही केला नाही. माणसात देव पाहा, या संतांच्या शिकवणीचा सगळ्यांना विसर पडला. कुणीही अनोळखी व्यक्ती भेटली की आधी तो कोणत्या जातीचा या प्रश्नाची भुणभुण डोक्यात सुरू होते. त्यावरून मग पुढील आडाखे बांधले जातात. जग पुढे जात असताना आम्ही मात्र असे मागेमागे जात आहोत. जातिवादाच्या हरळीचे मूळ आजच्या ग्लोबल इंडियामध्येसुद्धा एवढे हिरवेगार आणि ताजे टवटवीत आहे की आम्ही माणसाकडे माणूस म्हणून पाहतच नाही, तर जात हीच माणसाची खरी ‘आयडेंटी’ झाली आहे. जातीसाठी जन्मणे, जातीसाठी भांडणे, जाती-जातीत होळी पेटवून आपली पोळी भाजून घेणे हाच आमचा जीवन धर्म झाला आहे. जातीसाठी खावी माती, हे म्हणताना वैषम्य वाटण्याऐवजी अभिमान वाटू लागतो, हे खरे दुर्दैव.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रMaharashtraमहाराष्ट्र