शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

त्यागावाचून वैराग्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 5:19 AM

मध्ययुगीन संत लौकिकात जन्माला आले, लौकिकात वाढले, पण मुक्कामी पोहोचताना मात्र पारलौकिकाच्या चिरंतन स्थानातील मुक्कामापर्यंत पोहोचले.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमध्ययुगीन संत लौकिकात जन्माला आले, लौकिकात वाढले, पण मुक्कामी पोहोचताना मात्र पारलौकिकाच्या चिरंतन स्थानातील मुक्कामापर्यंत पोहोचले. सच्चिदानंदाच्या कंदातील ब्रह्मानंदाचा अशब्द अनुभव स्वत: चाखता-चाखता ‘सेवितो हा रस वाटितो आणिका’ या नम्र भावनेने आपल्या अनुभवाचे प्रकटीकरण जनता जनार्दनासमोर केले. हे सारे करीत असताना संतांनी प्रथम समाजाची मनोभूमिका तयार करण्याचे कठीण कार्य केले अन् मगच त्यावर उदात्त जीवनमूल्यांचे संस्कार केले. समता, ममता, मानवतावाद, विश्वबंधुत्व यांसारखी जीवनमूल्ये जर समाज जीवनात रुजायची झाली, तर वैराग्यसंपन्न वा अपरिग्रही सत्पुरुषांची समाजाला गरज आहे. वैयक्तिक पातळीवरील पारमार्थिक हित जर साध्य करायचे असेल, तरीही अपग्रह अथवा त्यागाची गरज आहे. अनुकूल सुखाच्या भोगांचा जाणीवपूर्वक त्याग करण्याच्या मनोवृत्तीला आध्यात्मिक परिभाषेत ‘वैराग्य’ म्हणून संबोधण्यात येते. परमार्थाच्या क्षेत्रात साधकास अधिकारी होण्यासाठी विवेक, वैराग्य, भक्ती, शांती, दमन, बोधवृत्ती, ईश्वरप्रीती आदी सद्गुणांची कास धरावीच लागेल. परमार्थाच्या क्षेत्रात साधकास अधिकाराची पायरी न चढताच, केवळ टिळे, टोपी, माळा यांची भाऊगर्दी वाढू लागली, तर या गर्दीस केवळ देवत्वाचाच नव्हे, तर साध्या मनुष्यत्वाचासुद्धा विसर पडतो. भोगलालसेने बरबटलेला दुसऱ्याच्या श्रमावर डोळा ठेवून श्रम न करताच गर्भश्रीमंत होणारा, ‘न बाप बडा न भैय्या, सबसे बडा रुपय्या’ असे जीवन जगणाºयास अत्यंत पारमार्थिक विचारांचे शोधन तर सोडाच, साधे संसारातसुद्धा सन्मानाने जगता येत नाही. साधकाच्या साधन मार्गाच्या जीवनसूत्रीचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणाले होते,त्यागेवीण विरक्ति । प्रेमा वाचुनि भक्ति ।शांती नसता ज्ञाप्ती । शोभा न पवे ।दमने वाचुनि यति । मानावीण भूमिपती ।युगी नसता युक्ति । शोभा न पवे ।बहिर्मुख कविमती । नेमावाचुनि कृति ।बोधेवीण महंती । शोभा न पवें ।।जोपर्यंत निस्सीम भावाचा ज्ञानबोध फळाला येत नाही, तोपर्यंत महंतपदास कधीच शोभा येऊ शकत नाही. यासाठीच तर साधकास काही अनुकूल भोगाचा जाणीवपूर्वक त्याग करावा लागतो. कारण त्यागाशिवाय ज्ञानाला काडीचाही अर्थ शिल्लक राहत नाही. यासाठी गरज आहे ती वैराग्य भावनेची.