शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जाळं या कोळ्याचं नि जाळं त्या कोळ्याचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 16:40 IST

या कोळ्याच्या जाळ्याचं नि त्या मासे मारणाऱ्या कोळ्याच्या जाळ्याचं एक वैशिष्ट्य समान असतं. कोणताही एक धागा ओढला तरी साऱ्या जाळ्यात ताण जाणवतो. इतकं ते जाळं आतून घट्ट जोडलेलं असतं.

- रमेश सप्रेतुमच्या मनात आलंच असेल ‘हा कोळी कोण नि तो कोळी कोण?’खरंच आहे. हा कोळी म्हणजे आपल्या घरातला कोळी-स्पायडर! आणि तो कोळी म्हणजे मासे मारणारा कोळी-फिशरमन. मराठीत दोन्ही कोळ्यांचं ‘जाळं’ असलं तरी इंग्रजीत मात्र घरातल्या कोळ्याच्या जाळ्याला म्हणतात ‘वेब’ तर मासेमारी करणा-या कोळ्याच्या जाळ्याला म्हणतात ‘नेट’.दत्तगुरूंनी घरातल्या कोळ्याला गुरू केलं. त्याच्याकडून अलिप्तता, कशातही न अडकणे हा गुण घेतला. बघा ना, कोळी जाळं बांधण्यासाठी बाहेरचा कोणताही पदार्थ वा आपल्यासारखं दगड-विटा-सिमेंट असं साहित्य वापरत नाही. त्याच्या नाभीतून जो स्नव (चिकट द्रव पदार्थ) बाहेर पडतो त्यापासून अतिशय सूक्ष्म असा धागा बनवून त्यापासून कोळी आपलं जाळं विणतो. त्यात सुखरूप इकडून तिकडे अलगद प्रवास करतो. स्वत: कधीही आपल्या जाळ्यात अडकत नाही वा घसरून पडत नाही. इतर बारके कीटक जाळ्यात सापडतात तेच या कोळ्याचं भक्ष्य. कोळ्याला संस्कृतमध्ये ‘ऊर्णनाभी’ म्हणजे नाभीतून तंतू बाहेर काढणारा असा शब्द आहे.काही जातीच्या  कोळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य दत्तात्रेयांच्या ध्यानात आलं, ते म्हणजे त्या कोळ्याला आपल्या मृत्यूची पूर्वसूचना मिळते. त्याप्रमाणे आपलं जाळं आपणच गिळून तो खाली पडतो. मरतो नि मातीत मिसळून जातो. स्वत:ची कोणतीही वस्तू वा खूण मागे ठेवत नाही. असं मरण तर एखाद्या मुक्त होणाऱ्या योग्यालाच लाभतं. हे सारं पाहून दत्तगुरूंनी त्याला गुरू मानून मनोमन नमस्कार केला.या कोळ्याच्या जाळ्याचं नि त्या मासे मारणाऱ्या कोळ्याच्या जाळ्याचं एक वैशिष्ट्य समान असतं. कोणताही एक धागा ओढला तरी साऱ्या जाळ्यात ताण जाणवतो. इतकं ते जाळं आतून घट्ट जोडलेलं असतं.हे साम्य सोडलं तर या दोन्ही जाळ्यात खूप महत्त्वाचे भेद आहेत. एक म्हणजे या कोळ्याचं जाळं (नेट) हे कृत्रिम असतं. तयार करण्यासाठी त्याला पूर्वी सुताचा दोरा आता नायलॉनचा धागा लागतो. या जाळ्याचा उपयोग मासे पकडण्यासाठी केला जातो. म्हणजे तसं हेही जाळं उदरनिर्वाहासाठीच वापरलं जातं. फक्त आवश्यकतेपेक्षा अधिक पैसा मिळाल्यामुळे व्यवसायाचं जाळं, शाखा वाढू लागतात. इतक्या की त्यात तो कोळीच अडकून पडतो.कोळी हे एक उदाहरण आहे. कोणताही व्यावसायिक एकापेक्षा अनेक ठिकाणी गुंतून पडतो. मन:शांती तर सोडाच शांत होण्यासाठी त्याच्याकडे वेळ उरत नाही. एखाद्या यंत्रासारखा तो आपल्या जाळ्याचा विस्तार (नेटवर्क) वाढवत राहतो नि त्यात अडकून त्याचा गुलाम बनून जीवनातील स्वातंत्र्य, उत्स्फूर्तता गमावून बसतो. एवढा अशांती, अतृप्ती, असमाधानाचा अनुभव येऊनही त्याचं व्याप वाढवणं थांबत नाही. स्वत:च्याच कृतीचा तो गुलाम बनतो.या जाळ्यातून व्याप, उपद्व्याप यांच्या चक्रातून सुटायचं असेल तर काय करायचं? स्वामी रामकृष्ण परमहंसांची एक बोधकथा या संदर्भात खूप प्रभावी आहे.कोळी जलाशयात जाऊन दूरवर जाळं फेकतो. काही वेळ तसंच ठेवून ते ओढून घेतो. तेव्हा दूरचे मासे जाळ्यात अडकतात. फक्त तेच मासे जाळ्याच्या कक्षेत असूनही जाळ्यात सापडत नाहीत जे जाळं फेकणा-या कोळ्याच्या पायाजवळ असतात. याचप्रमाणे सद्गुरू किंवा परमेश्वराच्या पायाशी रमणारे भक्त मात्र संसारातील सारी कर्तव्यं असतानाही प्रपंचात गुरफटत नाहीत, संसारातील देहभोगात गुंतून पडत नाहीत. आणखी एक जाळं सध्या खूप म्हणजे खूपच लोकप्रिय आहे. अनेक संगणक (कॉम्प्युटर्स) एकमेकाला जोडून तंत्रज्ञानानं एक महाजाल (इंटरनेट) तयार केलंय. अक्षरश: जीवनाच्या सर्व अंगाशी संबंधित असलेल्या सर्व विषयांची, क्षेत्रांची, इतिहास-संस्कृतीची, विज्ञान-तंत्रज्ञानाची सर्व माहिती या महाजालामुळे उपलब्ध झालीय. एका क्लिकमध्येही ही माहिती कुणालाही मिळू शकते. आजच्या माहिती युगाचं अवतरण या महाजालातील माहिती ज्ञानाच्या आदान प्रादानानं शक्य झालंय. एक वाईट गोष्ट म्हणजे नातवंडांपासून-आजी आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील असंख्य माणसं यात उपलब्ध असलेल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रॉम अशा समाज माध्यमात आकंठ बुडून गेली आहेत. त्यातून वाईट, ईल माहितीच्या विळख्यात सर्व मानवजात अडकलीय असं म्हणणं गैर होणार नाही. अर्थात विधायक, विकास घडवायला उपयुक्त असलेली माहितीही अनेक जण मिळवतात. स्मार्ट फोनच्या द्वारा अक्षरश: ‘सारी दुनिया मेरी मुठ्ठीमें ’ हे नुसतं जाहिरातीतलं घोषवाक्य नाही तर आजच्या जीवनशैलीचं प्रतीक बनलं आहे. या जाळ्याची (इंटरनेटची) अतिव्यसनाधीनता (अॅडिक्शन) झालेली उदाहरणं गल्लोगल्लीतच नव्हे तर घरोघरीही पाहण्यात येऊ लागलीयत. ‘संगणक महाजाल (इंटरनेट) हा मित्र की शत्रू यावर अजूनही वाद होतातच. प्रत्यक्षात कोणत्याही वैज्ञानिक शोधाचे उपयोग नि दुरुपयोग असतातच. म्हणून महत्त्व येतं ते ही साधनं वापरणा-या व्यक्तीलाच. आपण संयमपूर्वक विधायक कामांसाठी महाजालाचा उपयोग करायला हवा. जीवनाच्या विध्वंसासाठी नव्हे.एक विशेष गोष्ट अशी की आपण जरी माहितीसाठी नेट (इंटरनेट) वापरत असू तरी प्रत्यक्ष माहिती मिळते ‘वेब (वर्ल्ड वाइडवेब www) मधूनच. नेटपेक्षा वेब महत्त्वाचं आहे हेच खरं. प्रसिद्ध वैज्ञानिक विचारवंत काप्रा यांचं एक पुस्तक आहे ‘वेब ऑफ लाईफ’ जीवनाचं जाळं- विशेषत: आपल्या घरातील संबंधांचं असं जाळं, असा गोफ विणला तर शांती, आनंद यांचा नित्य अनुभव येईल. ज्ञानोबांचं पसायदान प्रत्यक्षात साकारेल-भूतां परस्परें जडो मैत्र जीवांचे।