शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

जाळं या कोळ्याचं नि जाळं त्या कोळ्याचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 16:40 IST

या कोळ्याच्या जाळ्याचं नि त्या मासे मारणाऱ्या कोळ्याच्या जाळ्याचं एक वैशिष्ट्य समान असतं. कोणताही एक धागा ओढला तरी साऱ्या जाळ्यात ताण जाणवतो. इतकं ते जाळं आतून घट्ट जोडलेलं असतं.

- रमेश सप्रेतुमच्या मनात आलंच असेल ‘हा कोळी कोण नि तो कोळी कोण?’खरंच आहे. हा कोळी म्हणजे आपल्या घरातला कोळी-स्पायडर! आणि तो कोळी म्हणजे मासे मारणारा कोळी-फिशरमन. मराठीत दोन्ही कोळ्यांचं ‘जाळं’ असलं तरी इंग्रजीत मात्र घरातल्या कोळ्याच्या जाळ्याला म्हणतात ‘वेब’ तर मासेमारी करणा-या कोळ्याच्या जाळ्याला म्हणतात ‘नेट’.दत्तगुरूंनी घरातल्या कोळ्याला गुरू केलं. त्याच्याकडून अलिप्तता, कशातही न अडकणे हा गुण घेतला. बघा ना, कोळी जाळं बांधण्यासाठी बाहेरचा कोणताही पदार्थ वा आपल्यासारखं दगड-विटा-सिमेंट असं साहित्य वापरत नाही. त्याच्या नाभीतून जो स्नव (चिकट द्रव पदार्थ) बाहेर पडतो त्यापासून अतिशय सूक्ष्म असा धागा बनवून त्यापासून कोळी आपलं जाळं विणतो. त्यात सुखरूप इकडून तिकडे अलगद प्रवास करतो. स्वत: कधीही आपल्या जाळ्यात अडकत नाही वा घसरून पडत नाही. इतर बारके कीटक जाळ्यात सापडतात तेच या कोळ्याचं भक्ष्य. कोळ्याला संस्कृतमध्ये ‘ऊर्णनाभी’ म्हणजे नाभीतून तंतू बाहेर काढणारा असा शब्द आहे.काही जातीच्या  कोळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य दत्तात्रेयांच्या ध्यानात आलं, ते म्हणजे त्या कोळ्याला आपल्या मृत्यूची पूर्वसूचना मिळते. त्याप्रमाणे आपलं जाळं आपणच गिळून तो खाली पडतो. मरतो नि मातीत मिसळून जातो. स्वत:ची कोणतीही वस्तू वा खूण मागे ठेवत नाही. असं मरण तर एखाद्या मुक्त होणाऱ्या योग्यालाच लाभतं. हे सारं पाहून दत्तगुरूंनी त्याला गुरू मानून मनोमन नमस्कार केला.या कोळ्याच्या जाळ्याचं नि त्या मासे मारणाऱ्या कोळ्याच्या जाळ्याचं एक वैशिष्ट्य समान असतं. कोणताही एक धागा ओढला तरी साऱ्या जाळ्यात ताण जाणवतो. इतकं ते जाळं आतून घट्ट जोडलेलं असतं.हे साम्य सोडलं तर या दोन्ही जाळ्यात खूप महत्त्वाचे भेद आहेत. एक म्हणजे या कोळ्याचं जाळं (नेट) हे कृत्रिम असतं. तयार करण्यासाठी त्याला पूर्वी सुताचा दोरा आता नायलॉनचा धागा लागतो. या जाळ्याचा उपयोग मासे पकडण्यासाठी केला जातो. म्हणजे तसं हेही जाळं उदरनिर्वाहासाठीच वापरलं जातं. फक्त आवश्यकतेपेक्षा अधिक पैसा मिळाल्यामुळे व्यवसायाचं जाळं, शाखा वाढू लागतात. इतक्या की त्यात तो कोळीच अडकून पडतो.कोळी हे एक उदाहरण आहे. कोणताही व्यावसायिक एकापेक्षा अनेक ठिकाणी गुंतून पडतो. मन:शांती तर सोडाच शांत होण्यासाठी त्याच्याकडे वेळ उरत नाही. एखाद्या यंत्रासारखा तो आपल्या जाळ्याचा विस्तार (नेटवर्क) वाढवत राहतो नि त्यात अडकून त्याचा गुलाम बनून जीवनातील स्वातंत्र्य, उत्स्फूर्तता गमावून बसतो. एवढा अशांती, अतृप्ती, असमाधानाचा अनुभव येऊनही त्याचं व्याप वाढवणं थांबत नाही. स्वत:च्याच कृतीचा तो गुलाम बनतो.या जाळ्यातून व्याप, उपद्व्याप यांच्या चक्रातून सुटायचं असेल तर काय करायचं? स्वामी रामकृष्ण परमहंसांची एक बोधकथा या संदर्भात खूप प्रभावी आहे.कोळी जलाशयात जाऊन दूरवर जाळं फेकतो. काही वेळ तसंच ठेवून ते ओढून घेतो. तेव्हा दूरचे मासे जाळ्यात अडकतात. फक्त तेच मासे जाळ्याच्या कक्षेत असूनही जाळ्यात सापडत नाहीत जे जाळं फेकणा-या कोळ्याच्या पायाजवळ असतात. याचप्रमाणे सद्गुरू किंवा परमेश्वराच्या पायाशी रमणारे भक्त मात्र संसारातील सारी कर्तव्यं असतानाही प्रपंचात गुरफटत नाहीत, संसारातील देहभोगात गुंतून पडत नाहीत. आणखी एक जाळं सध्या खूप म्हणजे खूपच लोकप्रिय आहे. अनेक संगणक (कॉम्प्युटर्स) एकमेकाला जोडून तंत्रज्ञानानं एक महाजाल (इंटरनेट) तयार केलंय. अक्षरश: जीवनाच्या सर्व अंगाशी संबंधित असलेल्या सर्व विषयांची, क्षेत्रांची, इतिहास-संस्कृतीची, विज्ञान-तंत्रज्ञानाची सर्व माहिती या महाजालामुळे उपलब्ध झालीय. एका क्लिकमध्येही ही माहिती कुणालाही मिळू शकते. आजच्या माहिती युगाचं अवतरण या महाजालातील माहिती ज्ञानाच्या आदान प्रादानानं शक्य झालंय. एक वाईट गोष्ट म्हणजे नातवंडांपासून-आजी आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील असंख्य माणसं यात उपलब्ध असलेल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रॉम अशा समाज माध्यमात आकंठ बुडून गेली आहेत. त्यातून वाईट, ईल माहितीच्या विळख्यात सर्व मानवजात अडकलीय असं म्हणणं गैर होणार नाही. अर्थात विधायक, विकास घडवायला उपयुक्त असलेली माहितीही अनेक जण मिळवतात. स्मार्ट फोनच्या द्वारा अक्षरश: ‘सारी दुनिया मेरी मुठ्ठीमें ’ हे नुसतं जाहिरातीतलं घोषवाक्य नाही तर आजच्या जीवनशैलीचं प्रतीक बनलं आहे. या जाळ्याची (इंटरनेटची) अतिव्यसनाधीनता (अॅडिक्शन) झालेली उदाहरणं गल्लोगल्लीतच नव्हे तर घरोघरीही पाहण्यात येऊ लागलीयत. ‘संगणक महाजाल (इंटरनेट) हा मित्र की शत्रू यावर अजूनही वाद होतातच. प्रत्यक्षात कोणत्याही वैज्ञानिक शोधाचे उपयोग नि दुरुपयोग असतातच. म्हणून महत्त्व येतं ते ही साधनं वापरणा-या व्यक्तीलाच. आपण संयमपूर्वक विधायक कामांसाठी महाजालाचा उपयोग करायला हवा. जीवनाच्या विध्वंसासाठी नव्हे.एक विशेष गोष्ट अशी की आपण जरी माहितीसाठी नेट (इंटरनेट) वापरत असू तरी प्रत्यक्ष माहिती मिळते ‘वेब (वर्ल्ड वाइडवेब www) मधूनच. नेटपेक्षा वेब महत्त्वाचं आहे हेच खरं. प्रसिद्ध वैज्ञानिक विचारवंत काप्रा यांचं एक पुस्तक आहे ‘वेब ऑफ लाईफ’ जीवनाचं जाळं- विशेषत: आपल्या घरातील संबंधांचं असं जाळं, असा गोफ विणला तर शांती, आनंद यांचा नित्य अनुभव येईल. ज्ञानोबांचं पसायदान प्रत्यक्षात साकारेल-भूतां परस्परें जडो मैत्र जीवांचे।