शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

आनंद तरंग - देशाबद्दल कृतज्ञता हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 01:49 IST

सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ‘राष्ट्रप्रेमाशिवाय राष्ट्रशिस्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. पारतंत्र्यात असताना कितीतरी सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम केले

राष्ट्रभक्ती म्हणजे आपलं आपल्या राष्ट्रावर मनापासून प्रेम हवं. जसं गणपती तुम्हाला प्रिय आहे, तितकाच भारत देशही प्रिय असायला हवा. देशावर प्रेम करायचं म्हणजे फक्त १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला तिरंग्याबद्दल आदर व्यक्त करायचा असं नाही, तर आयुष्यभर देशाबद्दल कृतज्ञता हवी. यासाठी देशाबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी कटाक्षाने पाळून ही कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. वास्तविक, राष्ट्रध्वज हा स्वतंत्र भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याचा मान राखणं म्हणजेच देशावरचं प्रेम अन् कृतज्ञता व्यक्त करणं होय.

सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ‘राष्ट्रप्रेमाशिवाय राष्ट्रशिस्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. पारतंत्र्यात असताना कितीतरी सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम केले. देशावर असीम प्रेम केले; पण आज स्वतंत्र भारताचे चित्र मात्र काय सांगते? आपल्या देशावर आपण प्रेम केलं पाहिजे. नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे. हे प्रेम लहानसहान गोष्टींतून व्यक्त होत असतं. सद्गुरू एक उदाहरण नेहमी देत. ‘आपल्याला कितीही राग आला तरी घरातील वस्तू तोडून-फोडून टाकतो का? तर नाही... पण बाहेर एखादी गैरसोय झाली की लगेच तोडफोड करतो. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो. हे नुकसान असतं आपल्याच देशाच्या साधनसंपत्तीचं, पर्यायाने आपलंच.’प्रल्हाद वामनराव पै

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजIndiaभारत