शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

आनंद तरंग - देशाबद्दल कृतज्ञता हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 01:49 IST

सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ‘राष्ट्रप्रेमाशिवाय राष्ट्रशिस्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. पारतंत्र्यात असताना कितीतरी सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम केले

राष्ट्रभक्ती म्हणजे आपलं आपल्या राष्ट्रावर मनापासून प्रेम हवं. जसं गणपती तुम्हाला प्रिय आहे, तितकाच भारत देशही प्रिय असायला हवा. देशावर प्रेम करायचं म्हणजे फक्त १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला तिरंग्याबद्दल आदर व्यक्त करायचा असं नाही, तर आयुष्यभर देशाबद्दल कृतज्ञता हवी. यासाठी देशाबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी कटाक्षाने पाळून ही कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. वास्तविक, राष्ट्रध्वज हा स्वतंत्र भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याचा मान राखणं म्हणजेच देशावरचं प्रेम अन् कृतज्ञता व्यक्त करणं होय.

सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ‘राष्ट्रप्रेमाशिवाय राष्ट्रशिस्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. पारतंत्र्यात असताना कितीतरी सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम केले. देशावर असीम प्रेम केले; पण आज स्वतंत्र भारताचे चित्र मात्र काय सांगते? आपल्या देशावर आपण प्रेम केलं पाहिजे. नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे. हे प्रेम लहानसहान गोष्टींतून व्यक्त होत असतं. सद्गुरू एक उदाहरण नेहमी देत. ‘आपल्याला कितीही राग आला तरी घरातील वस्तू तोडून-फोडून टाकतो का? तर नाही... पण बाहेर एखादी गैरसोय झाली की लगेच तोडफोड करतो. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो. हे नुकसान असतं आपल्याच देशाच्या साधनसंपत्तीचं, पर्यायाने आपलंच.’प्रल्हाद वामनराव पै

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजIndiaभारत