शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

साधकावस्थेचा गाभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 00:45 IST

पार्था, ह्या मानवी विश्वात आपण कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहोत हा भाव आपल्यापाशी असता कामा नये. मानी स्वभावाचा पूर्ण अभाव म्हणते अमानित्व.

- वामनराव देशपांडेअमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।आचार्योपासनं शौचंंं स्थैर्यमात्मविनिग्रह: ।।गीता:१३:७।।पार्था, ह्या मानवी विश्वात आपण कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहोत हा भाव आपल्यापाशी असता कामा नये. मानी स्वभावाचा पूर्ण अभाव म्हणते अमानित्व. आपल्यापाशी ढोंंगीपणा असू नये. अदम्भित्व म्हणजे दिखाऊपणाने जगण्याचा पूर्ण अभाव. हिंसक मनोवृत्ती असू नये. अहिंंसा हा साधकावस्थेचा गाभा आहे. मन, वाणी आणि शरीर बलाने कुणालाही न दुखवणे, कुणाच्याही मनाला यत्किंंचितही इजा न करणे म्हणजे अहिंसा. क्षान्ति म्हणजे अपूर्व अशी क्षमावृत्ती. सरळ विनम्रवृत्ती, आर्जवी मनोवृत्ती, आपल्या सद्गुरूंच्या ज्ञानभारल्या आज्ञेत राहणे, गुरूसेवेत गर्क होणे, अंतर्बाह्य शुद्ध आचरण, विलक्षण स्थैर्य आणि मनावर पूर्ण ताबा हे गुण महत्त्वाचे आहेत. भगवंतांनी प्रस्तूत श्लोकातून सर्वच साधक भक्तांंना, साधकाचे एकूण व्यक्तिमत्त्व कसे असावे, त्याची मनोवृत्ती कशी असावी, भगवंतांशी तादात्म्य पावण्यात देहबुद्धी जी आड येते, तिला दूर कसे लोटावे, यावर उपदेश करताना, अगदी सहजपणे देहबुद्धीने जगणाऱ्या साधकांंना घेरून बसलेल्या दोषांंवर जणू प्रकाशच टाकला आहे. एकदा का प्रसिद्धीच्या झोतात माणूस आला की, मानीपणा अंगात संचारतो. तो नष्ट होण्यासाठी सत्पुरुषाचा सहवास लाभणे अत्यंत आवश्यक आहे. कारण संतपुरुषांना कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा नसते. त्यांच्यापाशीच अमानित्व नांंंंदत असते. अशी श्रेष्ठ संंतमंडळी इतरांचा सन्मान करण्यात धन्यता मानतात. अशा श्रेष्ठ पुरुषांंच्या सहवासात दीर्घकाळ राहिले तरच स्वत:मधले मानीपण लोप पावते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक