शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शरीर व मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 09:31 IST

जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनाचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. शरीराला जेव्हा मनाची जोड लाभते, तेव्हा खरा आनंद निर्माण होऊ शकतो.

जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनाचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. शरीराला जेव्हा मनाची जोड लाभते, तेव्हा खरा आनंद निर्माण होऊ शकतो. शरीराची आणि मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी असते. मानवी मनाचे विश्वचैतन्य अनुभवण्यासारखे असते. शरीर आणि मनासह अंतर्बाह्य चैतन्याचा संवाद हा अध्यात्माचा गाभा असतो. मनाच्या प्रगल्भ विचारांनी जगता जगता जीवनाच्या वाटेवरचा आनंद उपभोगता येतो.

मनामध्ये निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या कल्पना आश्चर्यकारक असतात. मनामध्ये केव्हाही, कुठल्याही कल्पना येऊ शकतात. उदा. नैसर्गिक-अनैसर्गिक, श्लील-अश्लील इ., पण मनाला सात्त्विकतेमुळे चैतन्यत्व प्राप्त होते. त्यामुळे मन धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते. मग मान-अपमान यामुळे मन दुखावले जात नाही. मोठ्या ताकदीने आणि आत्मशक्तीने कुठलेही दु:ख पेलण्याला ते समर्थ बनते. मग स्वत:च स्वत:च्या आनंदात रममाण होते. आपल्यामध्येच ते स्वत:ला शोधत असते. एका नव्या शोधामध्ये ते राहते. आव्हानात्मक गोष्टी स्वीकारते. ते मन जगण्याचे सर्व सोहळे पूर्ण करते. त्याला रुचेल, पचेल तेवढेच ते स्वीकारते. वेगवेगळे प्रयोग राबविते. त्यामुळे मन प्रफुल्लित होते. तत्त्वज्ञानात्मक बनते. मनाप्रमाणे ती व्यक्ती त्याच्या प्रत्येक कामातून, वागण्यातून कळते. बऱ्या वाईटाचा परिणाम काय होतो याचा विचार मन करते.

मन नेहमीच स्वत:चा मार्ग, स्वत:चे अस्तित्व शोधत असते. अशा मनात अध्यात्माची बिजे सापडतात. व्यक्तिगत जीवनात विचार न अनुभवता मन त्याचे रूपांतर एका शुद्ध अनुभूतीमध्ये करते. मनाचे उत्कट अनुभव जीवनाचे सुंदर, संवेदनक्षम पदर उलगडून दाखविते. त्यामुळे मनात आणि शरीरामध्ये जेवढे स्मरण आतून येते, ती मनाच्या शुद्धतेची पावती असते. कारण आपण जे अनुभवतो, ते मनापासून. आपण त्या गोष्टीत रमलेलो असतो तेव्हा आपले मन आपल्या जगण्याशी एकरूप झालेले असते. त्यामधूनच आपला आशय बनत असतो. मन त्या व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. आतून, बाहेरून ते त्या व्यक्तीला कृतिशील बनविते. असे कृतिशील मनच मनुष्याला योग्य दिशेला नेण्याचे काम करीत असते.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक