शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

शरीर व मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 09:31 IST

जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनाचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. शरीराला जेव्हा मनाची जोड लाभते, तेव्हा खरा आनंद निर्माण होऊ शकतो.

जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनाचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. शरीराला जेव्हा मनाची जोड लाभते, तेव्हा खरा आनंद निर्माण होऊ शकतो. शरीराची आणि मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी असते. मानवी मनाचे विश्वचैतन्य अनुभवण्यासारखे असते. शरीर आणि मनासह अंतर्बाह्य चैतन्याचा संवाद हा अध्यात्माचा गाभा असतो. मनाच्या प्रगल्भ विचारांनी जगता जगता जीवनाच्या वाटेवरचा आनंद उपभोगता येतो.

मनामध्ये निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या कल्पना आश्चर्यकारक असतात. मनामध्ये केव्हाही, कुठल्याही कल्पना येऊ शकतात. उदा. नैसर्गिक-अनैसर्गिक, श्लील-अश्लील इ., पण मनाला सात्त्विकतेमुळे चैतन्यत्व प्राप्त होते. त्यामुळे मन धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते. मग मान-अपमान यामुळे मन दुखावले जात नाही. मोठ्या ताकदीने आणि आत्मशक्तीने कुठलेही दु:ख पेलण्याला ते समर्थ बनते. मग स्वत:च स्वत:च्या आनंदात रममाण होते. आपल्यामध्येच ते स्वत:ला शोधत असते. एका नव्या शोधामध्ये ते राहते. आव्हानात्मक गोष्टी स्वीकारते. ते मन जगण्याचे सर्व सोहळे पूर्ण करते. त्याला रुचेल, पचेल तेवढेच ते स्वीकारते. वेगवेगळे प्रयोग राबविते. त्यामुळे मन प्रफुल्लित होते. तत्त्वज्ञानात्मक बनते. मनाप्रमाणे ती व्यक्ती त्याच्या प्रत्येक कामातून, वागण्यातून कळते. बऱ्या वाईटाचा परिणाम काय होतो याचा विचार मन करते.

मन नेहमीच स्वत:चा मार्ग, स्वत:चे अस्तित्व शोधत असते. अशा मनात अध्यात्माची बिजे सापडतात. व्यक्तिगत जीवनात विचार न अनुभवता मन त्याचे रूपांतर एका शुद्ध अनुभूतीमध्ये करते. मनाचे उत्कट अनुभव जीवनाचे सुंदर, संवेदनक्षम पदर उलगडून दाखविते. त्यामुळे मनात आणि शरीरामध्ये जेवढे स्मरण आतून येते, ती मनाच्या शुद्धतेची पावती असते. कारण आपण जे अनुभवतो, ते मनापासून. आपण त्या गोष्टीत रमलेलो असतो तेव्हा आपले मन आपल्या जगण्याशी एकरूप झालेले असते. त्यामधूनच आपला आशय बनत असतो. मन त्या व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. आतून, बाहेरून ते त्या व्यक्तीला कृतिशील बनविते. असे कृतिशील मनच मनुष्याला योग्य दिशेला नेण्याचे काम करीत असते.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक