शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तन संसार का नियम है... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 01:24 IST

जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य व परिवर्तनशील आहे 

डॉ. दत्ता कोहिनकर -   

जगात कुठेतरी सकाळ होते तर कुठेतरी रात्र..  उजेड आणि अंधाराचा खेळ कित्येक वर्ष सुरूय.. माणूस आणि निसर्ग त्याच्या अंतरंगात समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकाने आपआपलं जीवन हे वर्षानुवर्षे, शतकानुशतके या दिनचर्येला वाहून घेतल्या आहेत. ही सर्व मंडळी निसर्गाच्या अधीन आहेत हे त्रिकालबाधित सत्य आहे. पण माणूस नावाच्या प्राण्याला त्याच्या उत्पत्तीपासूनच गर्वाचा मुकुट मिळाला आहे. म्हणून मग तो सातत्याने निसर्गावर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करत असतो.पण निसर्ग त्याची सर्व बालिश रूपे पाहतो पाहतो आणि फारच डोक्यावरून पाणी जायला लागले एकच आपत्ती अशी उभी करतो व ती त्याच्या अहंकार जिरवण्यासाठी पुरेशी ठरते. याहून काय ती वेगळी परिस्थिती सध्या अवतीभवती नाही. ज्यावेळी आपल्याकडचे सर्व प्रयत्न कमी पडू ;लागतात तेव्हा  वेळ आणि निसर्गाच्या कलेने घेणेच केव्हाही शहाणपणाचे ठरते. नाहीतर पूर्णपणे उध्वस्त होण्याला एक पाऊल पण फार होते. या घडीला वेळ मजबूत परिस्थितीत आहेत आणि आपण हतबल.. पण वेळ सिकंदर जरी  तिला अस्थिरतेचा शाप आहे. म्हणून थोडा संयम ठेवूया.. परिवर्तन सृष्टीचा नियम आहेच.. 

मित्रांनो, लक्षात ठेवा एक छोटे छिद्र मोठ्या जहाजाला बुडवते. म्हणून वेळीच सावध व्हा. सदैव जागरुक रहा. आपल्या एका क्षुल्लक चुकीमुळे आपल्या कुटुंबाची व आपल्या समाजाची प्रचंड हानी होऊ शकते हे लक्षात असू द्या.मित्रांनो ज्या घरात बसून तुम्ही वैतागला आहात ,त्या घरात जाण्यासाठी लोक हजारो किलोमीटर मुलाबाळांसह पायी प्रवास करत आहेत. शासन या लोकांना दिसतील त्या ठिकाणी क्वारंटाईन करत आहे. म्हणून घरी रहा. सुरक्षित रहा. बाहेरच्या लोकांना, मित्रमंडळींना ,पाहुण्यांना घरी बोलावू नका .आता पुन्हा एकदा सांगतो काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही.

 सध्याची वेळ खतरनाक आहे. म्हणतात ना कालाय तस्मै नम : अशावेळी आपण सर्वजण भाजी दूध, मेडिकल सेवा ,व काहीजणांना अत्यावश्यक सेवेतील नोकरी करण्यासाठी बाहेर जावे लागते.अशा या महत्त्वाच्या कारणांसाठी आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवाची आज बाजी लावतोय. हे सर्व करत असताना मित्रांनो खूप काळजी घ्या. बाहेर खूप भयानक अवस्था आहे. कोणीतरी संक्रमित व्यक्ती कधी तुमच्या संपर्कात येईल व कधी तुम्हाला लक्षणे जाणवतील काहीही सांगता येत नाही.शासकीय यंत्रणा , पोलीस , डॉक्टर , अनेक संस्था आपल्या साठी जीवाची बाजी लावत आहे . आपण फक्त घरात थांबा व नियमांच पालन करा .या जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य व परिवर्तनशील आहे .

गीतेत सांगितलं आहे , परिवर्तन संसार का नियम है.  कोरोनाची ही महामारी पण जाणारच आहे पण ती लवकर घालवण्यासाठी आपण सर्वांनी शासकीय नियमांच पालन केले तर महामारी गायब होऊन लवकरच लॉकडाऊन खुले होईल . भारत संकटाला त्वरित चारी मुंड्या चीत करु शकतो, हे जगाला दाखवून देऊया. कारण भारत हा ऋषीमुनी, संत, बुध्दांचा देश आहे . 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकcorona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवार