शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

परिवर्तन संसार का नियम है... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 01:24 IST

जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य व परिवर्तनशील आहे 

डॉ. दत्ता कोहिनकर -   

जगात कुठेतरी सकाळ होते तर कुठेतरी रात्र..  उजेड आणि अंधाराचा खेळ कित्येक वर्ष सुरूय.. माणूस आणि निसर्ग त्याच्या अंतरंगात समाविष्ट असलेल्या प्रत्येक घटकाने आपआपलं जीवन हे वर्षानुवर्षे, शतकानुशतके या दिनचर्येला वाहून घेतल्या आहेत. ही सर्व मंडळी निसर्गाच्या अधीन आहेत हे त्रिकालबाधित सत्य आहे. पण माणूस नावाच्या प्राण्याला त्याच्या उत्पत्तीपासूनच गर्वाचा मुकुट मिळाला आहे. म्हणून मग तो सातत्याने निसर्गावर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करत असतो.पण निसर्ग त्याची सर्व बालिश रूपे पाहतो पाहतो आणि फारच डोक्यावरून पाणी जायला लागले एकच आपत्ती अशी उभी करतो व ती त्याच्या अहंकार जिरवण्यासाठी पुरेशी ठरते. याहून काय ती वेगळी परिस्थिती सध्या अवतीभवती नाही. ज्यावेळी आपल्याकडचे सर्व प्रयत्न कमी पडू ;लागतात तेव्हा  वेळ आणि निसर्गाच्या कलेने घेणेच केव्हाही शहाणपणाचे ठरते. नाहीतर पूर्णपणे उध्वस्त होण्याला एक पाऊल पण फार होते. या घडीला वेळ मजबूत परिस्थितीत आहेत आणि आपण हतबल.. पण वेळ सिकंदर जरी  तिला अस्थिरतेचा शाप आहे. म्हणून थोडा संयम ठेवूया.. परिवर्तन सृष्टीचा नियम आहेच.. 

मित्रांनो, लक्षात ठेवा एक छोटे छिद्र मोठ्या जहाजाला बुडवते. म्हणून वेळीच सावध व्हा. सदैव जागरुक रहा. आपल्या एका क्षुल्लक चुकीमुळे आपल्या कुटुंबाची व आपल्या समाजाची प्रचंड हानी होऊ शकते हे लक्षात असू द्या.मित्रांनो ज्या घरात बसून तुम्ही वैतागला आहात ,त्या घरात जाण्यासाठी लोक हजारो किलोमीटर मुलाबाळांसह पायी प्रवास करत आहेत. शासन या लोकांना दिसतील त्या ठिकाणी क्वारंटाईन करत आहे. म्हणून घरी रहा. सुरक्षित रहा. बाहेरच्या लोकांना, मित्रमंडळींना ,पाहुण्यांना घरी बोलावू नका .आता पुन्हा एकदा सांगतो काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही.

 सध्याची वेळ खतरनाक आहे. म्हणतात ना कालाय तस्मै नम : अशावेळी आपण सर्वजण भाजी दूध, मेडिकल सेवा ,व काहीजणांना अत्यावश्यक सेवेतील नोकरी करण्यासाठी बाहेर जावे लागते.अशा या महत्त्वाच्या कारणांसाठी आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवाची आज बाजी लावतोय. हे सर्व करत असताना मित्रांनो खूप काळजी घ्या. बाहेर खूप भयानक अवस्था आहे. कोणीतरी संक्रमित व्यक्ती कधी तुमच्या संपर्कात येईल व कधी तुम्हाला लक्षणे जाणवतील काहीही सांगता येत नाही.शासकीय यंत्रणा , पोलीस , डॉक्टर , अनेक संस्था आपल्या साठी जीवाची बाजी लावत आहे . आपण फक्त घरात थांबा व नियमांच पालन करा .या जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य व परिवर्तनशील आहे .

गीतेत सांगितलं आहे , परिवर्तन संसार का नियम है.  कोरोनाची ही महामारी पण जाणारच आहे पण ती लवकर घालवण्यासाठी आपण सर्वांनी शासकीय नियमांच पालन केले तर महामारी गायब होऊन लवकरच लॉकडाऊन खुले होईल . भारत संकटाला त्वरित चारी मुंड्या चीत करु शकतो, हे जगाला दाखवून देऊया. कारण भारत हा ऋषीमुनी, संत, बुध्दांचा देश आहे . 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकcorona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवार