शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 20:54 IST

रेडिओवर छान गाणं लागलं होतं, हँसते हँसते कट जाये रस्ते-जिंदगी यूँ ही चलती रहे. मीही गुणगुणत प्रसन्न होऊन गेलो. खरोखर लोक आज नैसर्गिक हास्य विसरले आहेत...

- डॉ. दत्ता कोहिनकर

डोंट वरी, बी हॅपी हे हॅपी नावाचं औषध शोधण्यासाठी लोक जगभर फिरतात. खरंतर ते आपल्या मनातच असतं. नव्वद टक्के आजार मानसिक असतात. नकारात्मक विचार हे त्याचं मूळ असतं. एक राक्षस लोकांना  छळायचा. एकदा डेव्हिड हा पोरगेलासा मेंढपाळ त्या खेड्यातील नातेवाइकांना भेटायला आला. त्यानं विचारलं, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? भयग्रस्त गावकरी म्हणाले, खूपच मोठ्या आकाराचा आणि बलाढ्य आहे तो. यावर डेव्हिड म्हणाला,खूप मोठ्या आकारमानामुळे नेम धरण्याची आवश्यकता नाही. कसेही दगड, विटा, सळया भिरकावल्या, तरी त्याला लागतीलच.गावकऱ्यांनी दगडफेक, भालाफेक करून राक्षसाला ठार मारले. राक्षसाच्या प्रचंड आकारमानाकडे डेव्हिड वेगळ्या दृष्टिकोनातून पाहात होता, म्हणून त्या संकटाचं निराकरण झालं.यशस्वी व्हायचं असेल, तर विचारांच्या सकारात्मकतेची प्रचंड गरज असते, असे विख्यात मानसशास्त्रज्ञ कार्ल जुंग यांनी म्हटले आहे. सकारात्मक व नकारात्मक हे दोन्ही विचार संसर्गजन्य आहेत. या विचारांचा आपल्यावर व आपल्या सहवासात येणा?्यांवर परिणाम होतो. सकारात्मक माणसाभोवती विशिष्ट वलय निर्माण होत असल्यामुळे ते इतरांना आकर्षित करतात. असा माणूस आनंदी, प्रसन्न असतो. आपण स्वत:शी काय बोलतो यावर आपले भवितव्य अवलंबून असते, त्यालाच ' सेल्फ टॉक'  म्हणतात. नकारात्मक विचार करणाऱ्याच्या आयुष्यात नेहमी दु:ख व नैराश्यच येते, म्हणून नेहमी स्वत:बद्दल सकारात्मक बोला. सकारात्मक विचार करणारा माणूस बंद घड्याळाकडेही दिवसातून दोन वेळा अचूक वेळ दाखवणारे घड्याळ या दृष्टिकोनातून पाहतो. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश ही यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचार करणाऱ्याला तेच अपयश मार्गातील अडथळा वाटतो. डॉ. जॉईस ब्रदर्स म्हणतात, की यश ही मानसिक स्थिती आहे. तुम्हाला यश हवं असेल, तर तुम्ही यशस्वी झाला आहात असा विचार करा. सकारात्मक विचारसरणी ही उज्ज्वल भवितव्याचा दाखला असतो. आनंदी  माणूस हा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे आनंदी नसतो, तर स्वत:ची विशिष्ट मनोवृत्ती, विचारांमुळे आनंदी असतो. मन सकारात्मक व निर्मल करण्यासाठी रोज सकाळी - संध्याकाळी १० ते १५ मिनिटे मांडी घालून ध्यान करा. आपल्या श्वासाचे तटस्थपणे निरीक्षण करा, म्हणजेच डोळे बंद करून त्याला जाणत राहा; त्याला कुठलाही अंक, मंत्र न जोडता नैसर्गिक श्वासाला जाणता-जाणता मन एकाग्र व शुद्ध करा. सकारात्मक विचार प्रबळ करण्यासाठी व नकारात्मकता धुवून काढण्यासाठी एवढंच म्हणा- 'येरे घना येरे घना ,न्हाऊ घाल माझ्या मना' यासाठी रोज ध्यान कर 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना