शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

संतांची संगती हा भगवंत प्राप्तीचा चांगला मार्ग 

By appasaheb.patil | Published: February 16, 2019 7:07 PM

सोलापूर :  माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये ही मूळ भावना संत साहित्यात दिसून येते. संतांची संगती हा भगवंत प्राप्तीचा ...

ठळक मुद्देभगवान वेदव्यासांइतके मानवी कल्याणासाठी मोठे कार्य इतर कोणीही केले नाहीज्ञान जगाच्या मांगल्याकरिता उपयोगात आणले तरच ते खरे ज्ञान असते

सोलापूर :  माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये ही मूळ भावना संत साहित्यात दिसून येते. संतांची संगती हा भगवंत प्राप्तीचा चांगला मार्ग आहे. यावेळी भगवान वेदव्यास आणि महर्षी नारद यांचा संवाद सांगताना भगवंताच्या दर्शनाची ओढ लागली कि भक्तीचे बीज रुजले असे समजावे असे आचार्य किशोरजी व्यास म्हणाले.

संत साहित्य हे सर्वश्रेष्ठ साहित्य आहे. महाभारतासारखा अजोड ग्रंथ भगवान वेदव्यास यांनी लिहिला. महर्षी व्यास हे जगातील साहित्यिकांचे मेरूमणी आहेत असे प्रतिपादन आचार्य किशोरजी व्यास यांनी केले.

श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे प. पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज उपाख्य आचार्य किशोरजी व्यास यांच्या भागवत कथेचे आयोजन पर्ल गार्डन येथे करण्यात आले आहे. यात मंगळवारी त्यांनी श्रीमद भागवत महात्म्य, कथारंभ मुनीजिज्ञासा, श्री नारद व्यास संवाद आणि सद्यस्थिती विस्ताराने सांगितली.

आचार्य किशोरजी व्यास म्हणाले, कलियुगातही वेदांचे रक्षण व्हावे असे विचार महर्षी वेदव्यास यांनी केला. कलियुगात धारणाशक्ती कमी होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी मार्गदर्शन केले. प्रगतीच्या गप्पा आपण मारतो. परंतु समाजाची अधोगतीच अधिक होत आहे. खाण्यापेक्षा औषधांचा खर्च अधिक होण्याला आपण प्रगती संबोधत आहोत.

भगवान वेदव्यासांइतके मानवी कल्याणासाठी मोठे कार्य इतर कोणीही केले नाही. त्यांनी जगाला खरे ज्ञान दिले. सध्या किडनी स्कॅडल चालविणाºयांना ही ज्ञान असतेच. परंतु ज्ञान जगाच्या मांगल्याकरिता उपयोगात आणले तरच ते खरे ज्ञान असते. संत साहित्याने जगाला खरे ज्ञान दिले़

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक