शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

आनंदाचे डोही आनंद तरंग -  माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:30 PM

भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे.

- डॉ.रामचंद्र देखणे- (प्रवचन व कीर्तनकार )पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर पांडुरंगरूपी नाव पुंडलिकाच्या द्वारात कटेवर हात ठेवून उभी आहे आणि तुम्हाला उभ्याउभ्याच बोलावत आहे. फक्त त्याच्या पायांना मिठी घाला. पैलतीरावर आपोआप जाल. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी पंढरीनाथाच्या पायी मिठी घातली आणि त्याचे सुंदर ते ध्यान आठवीत ते म्हणू लागले, ह्यह्यतुज पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया, पंढरीच्या श्रीविठ्ठलाला पाहिले की त्याच्या सुंदर स्वरुपाचे वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द सरसावतात आणि परब्रह्मरूपातील तत्त्ववेत्त्यांचे हे दर्शन दृश्यस्वरूपात येते. भक्त किंवा संत हे तात्त्विक पातळीवर अद्वैतात जातात. पण भावानिक पातळीवर द्वैतातच. ज्याने द्वैताचे द्वैत मोडते ते हे रूप इतके मनोहर आहे, की ब्रह्मभावात गेलेले संत पुन्हा स्वरूपस्थितीला येऊन वर्णन करू लागतात.       सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,         कर कटवरी ठेवोनिया.विटेवरी उभा आहे, कटावर हात आहेत, कानात मकरकुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभमण्याचा हार आहे, दंडावर, मनगटावर बाजूबंद आणि मणिबंध आहेत, कमरेला तिहेरी पितांबर आहे. समचरण विटेवर ठेवून हे सुंदर ते ध्यान भक्तिसुखाची शोभा वाढवित आहे. विठ्ठलाचे हे वर्णन म्हणजे मूर्तिविज्ञान, तर त्यातील रूपक हे मूर्तिज्ञान होय. कारण संतांनी चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूनेही न्याहाळून हे वर्णन केले आहे. कटेवरील हात हे तर तत्त्वदर्शी असे सुंदर रुपक आहे. शंकराचार्यांनी पांडुरंगाचे वर्णन करताना विधातुवसत्यै असा शब्दप्रयोग केला आहे. विधातु म्हणजे ब्रह्मदेव आणि वसत्यै म्हणजे वसतिस्थान. ब्रह्मदेवाचे वसतिस्थान म्हणजे सत्यलोक आणि आपण यामध्ये  फक्त दहा बोटांचा फरक आहे. ह्या भवसागराचे पाणी कमरेपर्यंतच आहे हेच कटेवर हात ठेवून ते सुचवित आहेत. संतश्रेष्ठ तुकाराममहाराज म्हणतात, भवसागर तरता, कारे करितसे चिंता,    पैल उभा दाता, कटी कर ठेवुनिया...भवसागर तरून जाण्याची चिंता का करता, पलीकडे कटीवर हात ठेवून तो उभा आहे. भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे. नित्यानित्यवस्तुविवेक इहफलभोगाविराग, अमुत्रफलभोगाविराग, शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुता ही पाच बोटे आहेत. ह्या दहा बोटांनी जीवनाचा खेळ खेळला तर भवसागरही कमरेएवढाच आहे, तर सत्यालोकही फक्त दहा बोटावरच आहे. 

टॅग्स :PuneपुणेPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAdhyatmikआध्यात्मिक